शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी राजकारणात उतरणे गरजेचे

By admin | Updated: September 1, 2016 00:46 IST

विदर्भ हे काँग्रेसच्या राजकारणाचे केंद्र राहिले होते व त्यांचा प्रभाव काही प्रमाणात दिसतो आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी आता राजकारणात उतरण्याची आवश्यकता आहे,

श्रीहरी अणे : भंडारा येथे जाहीर सभेत आवाहनभंडारा : विदर्भ हे काँग्रेसच्या राजकारणाचे केंद्र राहिले होते व त्यांचा प्रभाव काही प्रमाणात दिसतो आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी आता राजकारणात उतरण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन माजी महाधिवक्ता अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी केले.विदर्भ राज्य आघाडीतर्फे विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये राजकीय जनजागृती अभियान सुरू असून सार्वजनिक वाचनालयात आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.पद्माकर टेंभुर्णीकर होते. यावेळी अनिल जवादे, अ‍ॅड.निरज खांदेवाले, अ‍ॅड.सुरेन पारधी, जिल्हा संघटक रमाकांत पशिने, अविनाश पनके, प्रा.सुधाकर वडेटवार, केशव हुड, अरविंद ढोमणे, मार्कंड नंदेश्वर, अ‍ॅड.जयेश बोरकर, रामदास महाकाळकर, देवदास गभणे, माधव तिरपुडे, प्रणाली कटकवार, मधुबाला पशिने, अ‍ॅड.प्रमोद काटेखाये, अ‍ॅड.सतीश ठवकर, डॉ.गोविंद कोडवानी, छैलबिहारी अग्रवाल, गुरमित सिंग चावला, राहुल बडोले, संजय निनावे, मोरेश्वर कारेमोरे, अ‍ॅड.एम.एल. भुरे उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, काँग्रेस, भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भाला सहकार्य मिळत नाही. शिवसेनेचा विदर्भासाठी कायम विरोध असला तरी त्याला फारसे महत्व नाही. शिवसेनेचे प्रस्थ मुंबईपुरते सिमीत आहे आणि विदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दुसरा पर्याय नसल्याने नाईलाजास्तव काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीला निवडून देण्याविषयी वैदर्भीय जनतेला पर्याय नसतो. जेव्हा जनतेसमोर या पक्षांना विदर्भवादी वेगळा पर्याय देतील तेव्हा निश्चितच विदर्भातील जनता, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना यांना बाहेरचा रस्ता दाखविल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास आहे. यावेळी अ‍ॅड.पद्माकर टेंभुर्णीकर म्हणाले, आता अंताची लढाई आहे हे सरकारने तसेच विरोधकांनी समजून घ्यावे. वातावरण तापले आहे. केवळ ठिणगी पडणे बाकी आहे. आम्ही सनदशीर मार्गाने विदर्भाचा लढा चालवित आहेत. परंतु त्यालाही काही मर्यादा व सीमा आहे. ज्यावेळेस या सीमा तुटून पडतील तेव्हा होणाऱ्या परिणामास विरोधक व सरकार स्वत:च जबाबदार राहतील हे सत्ताधाऱ्यांनी समजून घ्यावे, असे आव्हान अ‍ॅड.टेंभुर्णीकर यांनी केले. संचालन जिल्हा सचिव केशव हुड यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.सुधाकर वडेटवार यांनी केले. (नगर प्रतिनिधी)