शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
3
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
4
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
5
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
6
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
7
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
8
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
9
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
10
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
11
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
12
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
13
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
14
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
15
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
16
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
17
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
18
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
19
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  

सम्राट अशोक यांचे कार्य समाजात पोहचविण्याची गरज

By admin | Updated: April 12, 2017 00:50 IST

संपूर्ण भारताचा सातबारा ज्याच्या नावाने आहे, ज्याचे चक्र राष्ट्रध्वजावर आहे, ...

श्रीधर साळवे यांचे प्रतिपादन : नाकाडोंगरी येथे भीम सेनेची स्थापनातुमसर : संपूर्ण भारताचा सातबारा ज्याच्या नावाने आहे, ज्याचे चक्र राष्ट्रध्वजावर आहे, सत्यमेव जयते हे ब्रिद वाक्य व त्याच्या सिंहाची प्रतिमा ही देशाची मुद्रा म्हणून स्वीकारली जाते अशा महानतम राजा सम्राट अशोक यांचा इतिहास पुसण्याचा डाव पुरोगामी सत्ताधाऱ्यांनी मांडला आहे. त्यामुळेच की काय या देशात अशोक जयंती साजरी होत नाही. परंतु त्या महान सम्राट अशोकाची समाजात पोहचविण्याचे कार्य भीम सैनिकांनी करावे असे प्रतिपादन भीम सेनेचे संस्थापक श्रीधर साळवे यांनी केले.नाकाडोंगरी येथे भीम सेनेची शाखा उद्घाटन व सम्राट अशोक जयंतीच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी देवेंद्र घरडे, आकाश टेंभुर्णे, राजा नगराळे, पारस पाटील, निशांत नांदगाये, अतुल मेश्राम, गोबरवाहीचे ठाणेदार किशोर सोटींग, प्यारेलाल धारगावे, शेखर कोतपल्लीवार, जितेंद्र सर्याम, उमाकांत भैसारे, दिनेश मेश्राम, रजनी घडले, राजानंद बोरकर उपस्थित होते.यावेळी साळवे म्हणाले, आयोग्यासाठी आरोग्यशाळा, शिक्षणासाठी पाठशाला निर्माण केली. मुलांचे संगोपन ही राज्याची जबाबदारी आहे असा नियम बनविला. असे अनेक कार्य सम्राट अशोकांचे सांगता येतील. मात्र ज्यांच्या नावाचा चिन्हांचा आदी सर्व गोष्टीचा वापर भारताच्या राजमुद्रेवर असताना सरकारला त्यांच्या जयंतीचा विसर पडला आहे. प्रास्ताविक वाचन माणिक नांदगाये यांनी केले. संचालन राहुल भुतांगे यांनी तर आभार रजनी घडले यांनी मानले. कार्यक्रमासाठी सुजित वासनिक, गौतम नंदागवळी, बल्ल मेश्राम, लक्की घडले, निशिकांत वासनिक, विक्की घडले, पारस बोरकर, पाहुल दहाट, जय उके, श्रेयस बोरकर, राकेश मेश्राम, निलेश डोंगरे, विकांत घडले, प्रणय रामटेके, प्रणित गजभिये, पंकज वासनिक, अक्षय दहाट उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)