शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तनशील भिक्षु निर्माण होण्याची गरज

By admin | Updated: October 16, 2016 00:30 IST

जगात धर्माधर्मामध्ये स्पर्धेची होळ लागलेली आहे. धर्माचे प्रसारक मात्र आपापल्या परिने धर्माच्या चौकटीबाहेर जाऊन कार्य करीत आहे.

राजेदहेगाव येथे धम्म मेळावा : भदन्त सदानंद महास्थवीर यांचे प्रतिपादनभंडारा : जगात धर्माधर्मामध्ये स्पर्धेची होळ लागलेली आहे. धर्माचे प्रसारक मात्र आपापल्या परिने धर्माच्या चौकटीबाहेर जाऊन कार्य करीत आहे. यामुळे नवजीवन निर्माण करणारा समाज भरकटला जात आहे. पंचशील संपादन करण्यासाठी व चांगले सुसंस्कार मुलांमध्ये मानवतावादी विज्ञाननिष्ट विचार फक्त भिक्षू रूजऊ शकतो. यासाठी परिवर्तनशील भिक्षु निर्माण होणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन अखिल भारतीय भिक्खु संघानुशासक भदन्त सदानंद महास्थवीर यांनी केले. भिमगिरी बुद्धीस्ट वेलफेअर सोसायटी अंतर्गत भीमगिरी सार्वजनिक बुद्ध विहार पर्यटनस्थळ राजेदहेगाव येथे धम्मचक्र प्रवर्तनदिन व दीक्षा महोत्सव वर्धापन दिनाप्रित्यर्थ आयोजित भीम बुद्ध धम्म मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात भदन्त सदानंद महास्थवीर बोलत होते. यावेळी उद्घाटन आमदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच रामचंद्र लेंडे, आमदार रामचंद्र असरे, भारतीय बौद्ध महासभाचे राष्ट्रीय महासचिव व्ही.एस. मोखले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, आयुध निर्माणीचे अप्पर महाप्रबंधक सी.एच. बाबू आंबेडकर, एम.एस. मस्के, उपसरपंच सारिका डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य भिमेश ढोबळे, संजय रोडगे, किरण थोटे, वैशाली लेंडे, पुरण लोणारे, युगांतर कांबळे, पंचायत समिती सदस्य अमित वसानी, पोलीस पाटील मधुकर ढोबळे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष दिलीप वैद्य, भिखु संघ उपस्थित होते. यावेळी आमदार कवाडे यांनी, ज्या समाजात माणसांना मानसन्मानाने जगता येत नव्हते, मंदिरात जाण्याचा अधिकार नाही, दरम्यान २० वर्ष तपश्चर्या करून डॉ.बाबासाहेबांनी चक्रवती सम्राट अशोकांच्या रूपाने बुद्ध धम्म दिला. या धम्मरूपी भाकरीचा निटपणे खाऊ देत नाही. यासाठी क्रांतीरुपी धम्माची चळवळ उभारणे आज गरज आहे. आमदार रामचंद्र अवसरे यांनी, शिक्षित तरुणाईने निवड नोकरीच्या मागे न लागता परिवर्तनरुपी उद्योगाकडे वळा, उद्योगशिल बना. डॉ.बाबासाहेबांनी जगाला, बुद्धाच्या मार्गाने चालण्याचा मुल प्रभावी माध्यम दिला. त्यानुसार यशस्वी झालो तर समाज किंबहुना देश विकसीत होईल. तत्पूर्वी सकाळी धम्म ध्वजारोहण भन्ते संघाप्रिय यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक मदनपाल गोस्वामी यांनी केले. संचालन व आभार सिद्धार्थ मेश्राम यांनी केले.