शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

एड्सग्रस्त रुग्णांकडे बघण्याची मानसिकता बदलण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 21:08 IST

आहार, व्यायाम, व जगण्याच्या आनंदाकडे दुर्लक्ष करणे ही आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. माणूस आरोग्याकडे गांर्भियाने पहात नाही. नेहमी आरोग्य गृहीत धरल्या जाते. शरीर ही देवाने मानवाला दिलेली देणगी आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांचे प्रतिपादन : जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आहार, व्यायाम, व जगण्याच्या आनंदाकडे दुर्लक्ष करणे ही आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. माणूस आरोग्याकडे गांर्भियाने पहात नाही. नेहमी आरोग्य गृहीत धरल्या जाते. शरीर ही देवाने मानवाला दिलेली देणगी आहे. आजार हे केवळ आरोग्याशी संबंधित असून कुठल्याही रुग्णाचा तिरस्कार न करता त्याला केवळ रुग्ण म्हणून पहावे. आपल्याकडे एड्स या आजाराविषयी अनेक संभ्रम आहेत. एड्सग्रस्त रुग्णाकडे पाहण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले.सामान्य रुग्णालयाच्या वतीने जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवीशेखर धकाते, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिता बढे, माहिती व विस्तार अधिकारी भगवान मस्के, पत्रकार विजय खंडेरा उपस्थित होते.या कार्यक्रमात उपस्थितांना जिल्हाधिकारी यांनी एड्स दिनानिमित्त शपथ दिली. सकाळी रुग्णालयाच्या वतीने शहरातून एड्स जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. १९८६ पासून एड्स या विषयावर आपल्या देशात काम सुरु आहे. यात मोठया प्रमाणात यश प्राप्त झाले आहे. तरी सुध्दा आजही एड्स विषयी अनेक संभ्रम आहे. हे संभ्रम दूर होणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. माणूस नेहमी स्वत:च्या आरोग्याचे व मनाचे काळजी घेत नाही. मन व शरीर यांना चांगल्या सवयी लावणे गरजेचे आहे. सकस आहार, नियमित व्यायाम, चांगले वाचन या सवयी केवळ अंगिकारुन चालत नाही तर त्या निरंतर जपाव्या लागतात, असे जिल्हाधिकारी म्हणाले. कंटाळा हा आजाराचे मुळ असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, चांगले चित्रपट, चांगले मित्र, चांगली पुस्तकं माणसाला नेहमी आनंदी रहायला शिकवतात. प्रत्येक चांगल्या गोष्टीचा आनंद घ्यायला शिकल्यास आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. चांगले आरोग्य हा आपला अधिकार असून यासाठी जागृत राहणे काळाची गरज आहे.एड्स विषयी समाजात जनजागृती करतांना एड्स रुग्णांना माणूस म्हणून मानाचे स्थान मिळवून दिल्यास यापेक्षा मोठा आनंद नाही, असे ते म्हणाले. नेहमी विजयी मानसिकता ठेवा व चांगल्या जगण्याची सवय स्व:ताला लावा म्हणजे आपोआपच निरोगी जीवन प्राप्त होईल, असा सल्ला त्यांनी दिला.यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक रविशेखर धकाते म्हणाले, नागरिकांनी आरोग्यदूत म्हणून काम करणे गरजेचे आहे. रुग्णाशी माणूसकीचा व्यवहार झाल्यास रुग्णांना आपण समाजाचे घटक आहोत याविषयीची खात्री पटेल. एड्स हा मैत्री करण्याने, हात मिळविल्याने, संसर्गित व्यक्ती सोबत जेवल्याने किंवा त्याची भांडी व कपडी वापरल्याने होत नाही. एड्स हा रक्त, असुरक्षित संबंध, संसर्गित सुईचा वापर व संसर्गित रक्त वापरल्यामुळेच होतो. त्यामुळे समाजाने आपले गैरसमज दूर ठेवून रुग्णांशी मानवतावादी व्यवहार ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांचे हस्ते जनजागृती साहित्याचे प्रकाशन व समुपदेशन केंद्राचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमास शालेय विद्यार्थी, अधिकारी व परिचारीका उपस्थित होते.