शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

काँग्रेसच्या अविश्वासाने राष्ट्रवादीचे बहिर्गमन

By admin | Updated: April 17, 2016 00:20 IST

जिल्हा परिषदेत सत्ताधारी काँग्रेसचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता प्रत्येक कामातून डावलत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

स्थायी समितीची सभा : जिल्हा परिषदेत रंगतोय कलगीतुराभंडारा : जिल्हा परिषदेत सत्ताधारी काँग्रेसचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता प्रत्येक कामातून डावलत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे काही दिवसांपासून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यामंध्ये अंतर्गत धूसफुस सुरू झाली आहे. परिणामी शनिवारला स्थायी समितीच्या सभेतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बहिर्गमन करून काँग्रेसच्या धोरणांचा विरोध केला.जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या रूग्ण कल्याण समितीवर दोन अशासकीय सदस्यांची निवड करावयाची असते. त्यासाठी काँग्रेसने एक व राष्ट्रवादी काँग्रेसने एक असे दोन सदस्य पाठविण्याचे ठरविण्यात आले. मात्र, काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला डावलून मर्जीतील दोन सदस्यांना नामनिर्देशित केले. ही बाब काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दडवून ठेवली होती. आज शनिवारला स्थायी समितीच्या सभाध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कक्षात सुरू झाली. यावेळी समितीच्या सदस्यांचे नामनिर्देशन झाल्याची माहिती नसल्यामुळे जिल्हा परिषद सदस्य तथा रूग्ण कल्याण समितीचे सदस्य धनंजय तुरकर यांनी अध्यक्षांना सभा सुरू होताच हा प्रश्न विचारला. त्यावर अध्यक्षांनी समिती सदस्यांची नावे काही दिवसापूर्वीच पाठविली असून त्यात एक जिल्हा परिषद सदस्य तर साकोली येथील एक कार्यकर्ता असल्याचे सांगितले. त्यानंतर संतप्त झालेले कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे यांनी आक्षेप नोंदविला. सत्ताधारी असतानाही राष्ट्रवादी काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता समिती सदस्यांची परस्पर नामनिर्देशन केल्यामुळे संताप व्यक्त करून ते सभागृहातून बाहेर पडले. हा प्रकार उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांना खटकल्यामुळे ते संताप व्यक्त करीत महिला व बाल विकास सभापती शुभांगी रहांगडाले व अन्य सदस्यांसह सभेतून बाहेर पडले. (शहर प्रतिनिधी)मनधरणीचा प्रयत्न दोनदा फसलाराष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सभेतून बहिर्गमन केल्यानंतर सर्व सदस्य सभापती नरेश डहारे यांच्या कक्षात पुढील रणनीती ठरविण्यासाठी बसले. यावेळी काँग्रेसकडून त्यांची मनधरणीची दोनदा प्रयत्न करण्यात आला. मात्र, कामात विश्वासात घेत नाही, असा आरोप करीत मनधरणीचा प्रयत्न फेटाळून लावला. त्यामुळे स्थायी समितीची आजची सभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशिवाय पार पडली. काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी आहे. त्यामुळे प्रत्येक कामे विश्वासात घेऊनच करण्यात येतात. शासन परिपत्रकाप्रमाणे या समितीसाठी नावे पाठविण्यात आली. त्यात गैरसमज करण्याचे कारण नाही.- भाग्यश्री गिलोरकर, अध्यक्ष, जि.प. भंडारा.सत्तास्थापन करताना काँग्रेसने जो विश्वास दाखविला होता. तो आता त्यांनी तोडला आहे. केवळ दिखावा करण्यासाठी युती आहे. सत्तेत सहकारी असताना प्रत्येक कामातून डावलण्यात येत आहे. - राजेश डोंगरे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, भंडारा.काँग्रेसने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करण्याऐवजी अविश्वासाची भूमिका घेत आहे. विकासकामे असो किंवा नियोजन असो प्रत्येक कामातून डावलण्याच्या भूमिकेने सत्ता आत्मविश्वासाने चालत नाही.- नरेश डहारे, सभापती, कृषी व पशुसंवर्धन, भंडारा.