शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा कणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 22:07 IST

लोकशाहीत राजकीय पक्षाची ताकद ही त्यांच्या कार्यकर्त्याच्या क्षमतेवर आहे. पक्षाचे ध्येय धोरण आणि पक्षाच्या सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत नेण्याचे खरे काम हे कार्यकर्ते करतात.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल यांचे प्रतिपादन : वरठीत राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळावा

आॅनलाईन लोकमतवरठी : लोकशाहीत राजकीय पक्षाची ताकद ही त्यांच्या कार्यकर्त्याच्या क्षमतेवर आहे. पक्षाचे ध्येय धोरण आणि पक्षाच्या सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत नेण्याचे खरे काम हे कार्यकर्ते करतात. राष्ट्रवादी कांग्रेस मध्ये काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाची ओळख असून त्यांच्या ताकदीच्या भरवश्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येऊ शकते. पदाधिकारी यांनी सामान्य कार्यकत्यार्ना सोबत घेऊन पक्ष संघटना मजबूत करावी. सामान्य कार्यकर्ता हा पक्षाचा कणाआहे, असे प्रतिपादन खासदार प्रफुल पटेल यांनी केले.वरठी येथे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या तालुका स्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत असताना त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका केली. सरकारच्या चुकीच्या धोरण अंमलबजावणीचा फटक्यांमुळे राज्यातील व्यवस्था व रोजगार संकटात आले असल्याचे सांगितले. चार वर्षात फक्त घोषणांची खैरात वाटून शेतकरी व शेतमजूर त्याबरोबर नौकरी वर्ग व व्यवसायिकीना काहीच मिळाले नसल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवले.यावेळी खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विस्वास ठेवून राष्ट्रवादी कांग्रेसचे तालुका अध्यक्ष राजू कारेमोरे यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील २०० च्या जवळपास इतर पक्षातील कार्यकत्यार्नी पक्षात प्रवेश केला. कार्यकर्ता मेळाव्यात तालुक्यातून पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम सभागृहात जागा अपुरी पडल्यामुळे शेकडो कार्यकर्ते सभागृहाबाहेर उभे राहून प्रफुल पटेलचे भाषण एकात होते. २० मिनिटाच्या भाषणात त्यांनी अनेक मुद्यांना हात घालून मतदारांनी जात धर्मपलीकडे विचार करून मतदान करावे असे आवाहन केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार अनिल बावनकर, जिल्हा अध्यक्ष मधुकर कुकडे, महिला जिल्हा अध्यक्ष कल्याणी भूरे, धनंजय दलाल, सरपंच स्वेता येळणे, तालुका अध्यक्ष संगीता सुखानी, राजू कारेमोरे, सदाशिव ढेंगे, नेरीचे सरपंच आनंद मलेवार उपस्थित होते.यावेळी वरठीच्या सरपंच स्वेता येळणे यांनी पक्ष संघटनेत महिलांचा सहभाग वाढवून पक्षात काम करताना जिल्हा यंत्रणेकडून होणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी सवार्नी एकत्रित लढण्याचे आवाहन त्यांनी केले.संचालन विजय पारधी, प्रास्ताविक राजू कारेमोरे व उपसरपंच सुमित पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला माजी सरपंच संजय मिरासे, रामेश्वर कारेमोरे , दिलीप गजभिये, माजी उपसरपंच मनोज सुखानी, अरविंद येळणे, ग्राम पंचायत सदस्य अतुल भोवते, संघरत्न ऊके, चेतन ठाकुर, ललिता बावणे, सीमा डोंगरे, मंदा साखरवाडे , विठ्ठल काहलकर, विशाल शेंडे, कैलास तितिरमारे, अनिल काळे, चेतन ठाकूर, वासुदेव बांते , किरण अतकरी आदी उपस्थित होते.‘त्या’ कार्यकर्त्यांना पटेलांनी लगावला टोलाप्रफुल पटेल यांनी एकाच पक्षात राहून अनेक पक्षातील मेळाव्यात उपस्थित राहणाºया आणि ‘जाती साठी माती खाण्याचे’ धोरण पाळणाऱ्या कार्यकत्यार्ना खडे बोल सुनावले. दरवेळी आपण इकडे तिकडे उड्या मारतो आणि पुन: कामासाठी इकडे येणाऱ्या माणसांनी खुशाल जा पण इकडे येऊच नका असे सुनावले. यानंतर मी पण पूर्वी प्रमाणे राहणार नसून खऱ्या कार्यकर्त्यांचे काम होणार आणि दलबदलू माणसांना त्यांची जागा दाखवणार असे बोलून कान टोचले. त्यांच्या भाषणातून विरोधीसह पक्षातील काही उड्या बहाद्दरांना अप्रत्येक्ष टोला हाणल्याची चर्चा सुरु होती.