शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी राष्ट्रवादीचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 23:32 IST

जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर व जनसामान्यांच्या मागण्यांसाठी भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देनिवेदन : मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन

आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर व जनसामान्यांच्या मागण्यांसाठी भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार मधुकर कुकडे, प्रदेश प्रतिनिधी धनंजय दलाल, कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे, महिला व बालकल्याण सभापती शुभांगी रहांगडाले, दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी यांच्या नेतृत्वात हा हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. मागील तीन वर्षापासून सत्तेतील भाजप सरकार सर्वसामान्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने केला.शेतकरी, शेतमजूर कामगार, लहान व्यवसायीक यांच्यात सरकारप्रती असंतोष असून नोटबंदी व जीएसटीचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. हल्लाबोल आंदोलनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. या आंदोलनात विजय डेकाटे, नरेंद्र झंझाड, नितीन तुमाने, तोमेश्वर पंचभाई, डॉ.जगदीश निंबार्ते, अविनाश ब्राम्हणकर, विठ्ठलराव कहालकर, शैलेश मयूर, राजकुमार माटे, वासुदेव बांते, अंगराज समरीत, धनू व्यास, देवचंद ठाकरे, महेंद्र गडकरी, उर्मिला आगाशे, रेखा ठाकरे, जि.प. सदस्य उत्तम कळपाते, विवेकानंद कुर्झेकर, गीता माटे, प्रेरणा तुरकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलनकर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा, धानाला खोडकिडा व करपा लागल्याने शेतकºयांचे नुकसान झाले असून प्रतिहेक्टर २५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, आत्महत्याग्रस्त शेतकरी व शेतमजुरांच्या तथा फवारणीमुळे बळी पडलेल्या कुटुंबियांना १० लाखांची आर्थिक मदत देऊन मुलामुलींच्या शिक्षणाची मोफत व्यवस्था करावी, मध्यप्रदेश राज्याच्या धर्तीवर जाहीर हमीभाव द्यावा, दुग्ध व्यवसाय तोट्यात गेल्यामुळे गाईच्या दुधाला ४० रुपये तर म्हशीच्या दुधाला ५० रुपये खरेदीदर द्यावे, स्वामीनाथन आयोग लागू करावा, नुकसानग्रस्त शेतीचा सर्वे करून पीकविम्याचा मोबदला द्यावा यासह असंख्य मागण्यांना घेऊन हा हल्लाबोल आंदोलन केले.