शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी राष्ट्रवादीचे आंदोलन पेटणार

By admin | Updated: April 19, 2016 00:32 IST

तालुक्यात पडलेल्या कमी पावसामुळे तालुक्यात कोरड्या दुष्काळाचे सावट पसरले आहे.

बावनथडीचे पाणी सोडण्याची मागणी : बालाघाटच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही देणार निवेदनतुमसर : तालुक्यात पडलेल्या कमी पावसामुळे तालुक्यात कोरड्या दुष्काळाचे सावट पसरले आहे. त्यातच वाढत्या उष्णतेमुळे जलपातळीने तळ गाठल्यामुळे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. धरणात जलसाठा उपलब्ध असताना धरणाचे पाणी सोडल्या जात नाही आहे. परिणामी पाण्यावाचून सर्व शेतपिके नष्ट होत आहेत. ते रोखण्याकरिता राष्ट्रवादीतर्फे आंदोलन पुकारले जात असून ते पेटण्याचे चिन्ह दिसत आहेत. तालुक्यातील आष्टी, चिखला व गर्रा बघेडा जि.प. क्षेत्रात अत्यल्प पाऊस पडल्याने ऐन पावसाळ्यात विहीर, तलाव कोरडे पडले होते. परिणामी शेतकऱ्यांनी हजारो हेक्टर जमिन पडीतच ठेवल्या होत्या व अनेक गावांची आणेवारी ५० पैशापेक्षा कमी झाली. मात्र त्यात फक्त १२ गावांचा समावेश करण्यात आला. परंतु त्या शेतकऱ्यांना कसलीही मदत अजूनपर्यंत मिळाली नाही. शेतकरी खचून न जाता त्यांनी बावनथडी नदीच्या काठावरील शेतीचे उसाचे उत्पादन घेतले. मात्र नदी कोरडी पडली असून नदीची जलपातळीही कमी झाल्याने नदीतल्या विहिरी आटल्या. त्यामुळे ऊसाच्या शेतीला पाणी मिळणे कठीण झाल्याने ऊसाचे पिक करपले आहेत. पावसाने दगा दिल्याने आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना बावनथडी धरणात पाण्याचा साठा उपलब्ध असताना ते शेतकऱ्यांकरिता सोडल्या जात नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्येस प्रवृत्त होत असल्याचे चित्र परिसरातील चांदमारा, लोभी, नाकाडोंगरी, आष्टी, पाथरी, धुटेरा, कवलेवाडा, चिखला, सीतसावंगी, हमेशा, घानोड, चिचोली, मोकोटोला, सोदेपूर, गोबरवाही, पवनारखारी, सुंदरटोला, येदरबुची या गावात दिसून येत आहे.गोबरवाहीची पाणी पुरवठ्याचा जलसाठाही आटला. सन १९६९-७० मध्ये बावनथडी नदीत पाथरी घाटावरजि.प. भंडारा तर्फे गोबरवाही प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरु करण्यात आली. या योजनेमार्फत नाकाडोंगरी, राजापूर, हमेशा, सीतासावंगी, सुंदरटोला, पवनारखारी, हमेशा, गोबरवाही आदी गावांना ३७ वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र यावर्षी पडलेला कमी पावसामुळे वाढलेल्या उष्णतेमुळे नदी कोरडी पडल्याने एप्रिल महिन्याच्या मध्यंतरीच ३ टक्के जलसाठा उपलब्ध असल्यामुळे मे मध्ये पिण्याचे पाणी मिळणेही कठीण होणार आहे. जर बावनथडी धरणाचे पाणी सोडल्यास पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागणार नाही. मात्र धरणाचे पाणी सोडण्याचे चिन्ह दिसत नसल्यामुळे राष्ट्रवादीतर्फे जि.प. सदस्य संगीता मुंगुसमारे, संगीता सोनवाने व शुभांगी रहांगडाले या रनरागिणी बनून पुढे येत त्यांनी आंदोलनाची चेतावनी दिली. मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सोपवून तेथील शेतकऱ्यांनाही आंदोलनात सहभागी करणार असल्याचे राष्ट्रवादीतर्फे आंदोलन पेटणार एवढे मात्र निश्चित. (शहर प्रतिनिधी)