शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

पाण्यासाठी राष्ट्रवादीचे आंदोलन पेटणार

By admin | Updated: April 19, 2016 00:32 IST

तालुक्यात पडलेल्या कमी पावसामुळे तालुक्यात कोरड्या दुष्काळाचे सावट पसरले आहे.

बावनथडीचे पाणी सोडण्याची मागणी : बालाघाटच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही देणार निवेदनतुमसर : तालुक्यात पडलेल्या कमी पावसामुळे तालुक्यात कोरड्या दुष्काळाचे सावट पसरले आहे. त्यातच वाढत्या उष्णतेमुळे जलपातळीने तळ गाठल्यामुळे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. धरणात जलसाठा उपलब्ध असताना धरणाचे पाणी सोडल्या जात नाही आहे. परिणामी पाण्यावाचून सर्व शेतपिके नष्ट होत आहेत. ते रोखण्याकरिता राष्ट्रवादीतर्फे आंदोलन पुकारले जात असून ते पेटण्याचे चिन्ह दिसत आहेत. तालुक्यातील आष्टी, चिखला व गर्रा बघेडा जि.प. क्षेत्रात अत्यल्प पाऊस पडल्याने ऐन पावसाळ्यात विहीर, तलाव कोरडे पडले होते. परिणामी शेतकऱ्यांनी हजारो हेक्टर जमिन पडीतच ठेवल्या होत्या व अनेक गावांची आणेवारी ५० पैशापेक्षा कमी झाली. मात्र त्यात फक्त १२ गावांचा समावेश करण्यात आला. परंतु त्या शेतकऱ्यांना कसलीही मदत अजूनपर्यंत मिळाली नाही. शेतकरी खचून न जाता त्यांनी बावनथडी नदीच्या काठावरील शेतीचे उसाचे उत्पादन घेतले. मात्र नदी कोरडी पडली असून नदीची जलपातळीही कमी झाल्याने नदीतल्या विहिरी आटल्या. त्यामुळे ऊसाच्या शेतीला पाणी मिळणे कठीण झाल्याने ऊसाचे पिक करपले आहेत. पावसाने दगा दिल्याने आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना बावनथडी धरणात पाण्याचा साठा उपलब्ध असताना ते शेतकऱ्यांकरिता सोडल्या जात नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्येस प्रवृत्त होत असल्याचे चित्र परिसरातील चांदमारा, लोभी, नाकाडोंगरी, आष्टी, पाथरी, धुटेरा, कवलेवाडा, चिखला, सीतसावंगी, हमेशा, घानोड, चिचोली, मोकोटोला, सोदेपूर, गोबरवाही, पवनारखारी, सुंदरटोला, येदरबुची या गावात दिसून येत आहे.गोबरवाहीची पाणी पुरवठ्याचा जलसाठाही आटला. सन १९६९-७० मध्ये बावनथडी नदीत पाथरी घाटावरजि.प. भंडारा तर्फे गोबरवाही प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरु करण्यात आली. या योजनेमार्फत नाकाडोंगरी, राजापूर, हमेशा, सीतासावंगी, सुंदरटोला, पवनारखारी, हमेशा, गोबरवाही आदी गावांना ३७ वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र यावर्षी पडलेला कमी पावसामुळे वाढलेल्या उष्णतेमुळे नदी कोरडी पडल्याने एप्रिल महिन्याच्या मध्यंतरीच ३ टक्के जलसाठा उपलब्ध असल्यामुळे मे मध्ये पिण्याचे पाणी मिळणेही कठीण होणार आहे. जर बावनथडी धरणाचे पाणी सोडल्यास पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागणार नाही. मात्र धरणाचे पाणी सोडण्याचे चिन्ह दिसत नसल्यामुळे राष्ट्रवादीतर्फे जि.प. सदस्य संगीता मुंगुसमारे, संगीता सोनवाने व शुभांगी रहांगडाले या रनरागिणी बनून पुढे येत त्यांनी आंदोलनाची चेतावनी दिली. मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सोपवून तेथील शेतकऱ्यांनाही आंदोलनात सहभागी करणार असल्याचे राष्ट्रवादीतर्फे आंदोलन पेटणार एवढे मात्र निश्चित. (शहर प्रतिनिधी)