शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जप्तीच्या वाहनांना भंगाराचे स्वरूप

By admin | Updated: December 4, 2014 23:04 IST

जप्त केलेल्या वाहनांवर न्यायालयाचा ताबा असतो. न्यायालयाच्या आदेशानुसार वाहने सोडली जातात. पोलिसच वाहनांची रखवाली करतो. बेवारस वाहने असतील तर त्यांचा लिलाव केला जातो.

भंडारा : जप्त केलेल्या वाहनांवर न्यायालयाचा ताबा असतो. न्यायालयाच्या आदेशानुसार वाहने सोडली जातात. पोलिसच वाहनांची रखवाली करतो. बेवारस वाहने असतील तर त्यांचा लिलाव केला जातो. वेगवेगळ्या गुन्हयांमध्ये पोलिसांनी जप्त केलेली वाहने भंडारा व अन्य पोलिस ठाण्यात गेल्या अनेक वर्षापासून तशीच धूळखात पडून आहेत. वाहनांना गंज लागला असल्याने अनेक वाहने भंगारात जमा झाली असून अनेकांचे स्पेअरपार्ट गायब आहेत. पोलिसांनी अपघात, चोरी इ. वेगवेगळ्या प्रकरणात मुद्देमाल म्हणून वाहने जप्त केली आहेत. २००१ पासून अद्यापपर्यंत जप्त केलेल्या वाहनांची संख्या मोठी आहे. यात दुचाकीचे प्रमाण सर्वाधिक आहे. जप्त केलेल्या वाहनांचे मुळ मालक पोलिसांना अद्याप सापडले नसल्याने व वाहन मालकांनीही वाहने परत आणण्याची तसदी न घेतल्यामुळे ही वाहने पोलिस ठाण्यात गेल्या अनेक वर्षांपासून तशीच पडून आहेत. जप्त केलेली वाहने मुळे मालकाने वाहनांची कागदपत्रे सादर केल्यास न्यायालयाच्या आदेशानुसार दंड भरुन मालकाला परत दिली जातात. परंतु वाहनाचे मुळ मालक न मिळाल्यास न्यायालयाच्या परवानगीने या वाहनांचा लिलाव केला जाऊ शकतो. या लिलावातून शासनाला आर्थिक फायदाही होतो. परंतु या वाहनासंदर्भात संबंधित प्रशासनाकडून तसे काही प्रयत्न झालेले दिसत नाहीत. त्यामुळेच अनेक वर्षापासून तशीच पडून असलेल्या वाहनांना गंज चढला आहे. अनेक दुचाकी व अन्य वाहने गंज लागून जीर्ण होत आहेत. विशेष म्हणजे यातील अनेक वाहनांचे चक्क स्पेअरपार्टच गायब झाले आहेत. पोलिस ठाण्यातून वाहनांचे सुटे भाग कसे काय जातात. असा प्रश्न उपस्थित झाला आहे.वेगवेगळ्या प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेली वाहने परत नेण्याकडे वाहन मालकांचे दुर्लक्ष आहे. अपघात झालेले वाहन अपशकुन समजून ते वाहन परत नेण्यासाठी मालक उत्सुक नसतात. ते वाहन पोलिस ठाण्यात तसेच पडून राहते. चोरीचे वाहन रस्त्यावर तसेच सोडले जाते. बेवारस म्हणून ते ठाण्यात जमा केले जाते. त्याची मालकाला माहिती नसल्याने ते पोलिस ठाण्यात राहते. (प्रतिनिधी)