शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

नैसर्गिक पद्धतीची शेती बनतेय काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 21:52 IST

जिल्ह्यात धानपिकाचे पारंपारिक उत्पादन घेतल्याने रासायनिक खताच्या भडीमारामुळे धानपिकाच्या जमनीची ताकद कमी होवून उत्पादनात घट होत आहे. त्यासाठी शेतीचा विसावा मिळाला पाहिजे.हिरवळीच्या खतांचा शेतकऱ्यांनी वापर वाढवणे गरजेचे असल्याचे मत उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी सांगितले.

ठळक मुद्देझिरो बजेटसाठी कृषी विभागाचा पुढाकार : हिरवळीचे खत वापरा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात धानपिकाचे पारंपारिक उत्पादन घेतल्याने रासायनिक खताच्या भडीमारामुळे धानपिकाच्या जमनीची ताकद कमी होवून उत्पादनात घट होत आहे. त्यासाठी शेतीचा विसावा मिळाला पाहिजे.हिरवळीच्या खतांचा शेतकऱ्यांनी वापर वाढवणे गरजेचे असल्याचे मत उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी सांगितले.शेतीला शेणखत, शेळी, मेंढी खत, हिरवळीची खते, ताग यासारख्या खतांनी जमीनीचा पोत सुधारण्यासाठी हिरवळीच्या खतांची मात्रा देणे गरजेचे आहे, असे केलेतरच जमीन भुसभुसीत, उत्पादनास अनुकूल अशी राहिल. शेणखत, मेंढीखत, गांढूळखत, ताग हिरवळीचे खत ही जमिनीची पोषण आहार असून त्यांचा उत्पादन वाढीसाठी फायदा होतोरासायनिक खताचा दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होत असल्याने अलिकडील काळात अनेक शेतकऱ्यांचा कल सेंद्रिय शेतीकडे वळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यासाठी परसोडी मुख्यालयातील चिखली येथे सेंद्रीय पध्दतीच्या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांनी शेती करायला सुरुवात केली आहे. अनुभव आलेले अनेक शेतकरी स्वयंस्फूर्तीने सेंद्रीय शेती करु लागले आहेत.चिखली येथे कृषी सहायक रेणुका दराडे यांच्या मार्गदर्शनातून तानाजी गायधने यांनी सेंद्रीय शेतीसाठी पुढाकार घेतला आहे. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी मिलिंद लाड यांनी त्यांच्या शेतावर भेट देवून पाहणी केली. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांना देशी गाईबद्दल माहिती देवुन त्यातून होणाऱ्या फायद्याची आणि नवनवीन उत्पादनाबद्दलची यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. या भेटीदरम्यान कृषी अधिकारी मिलिंद, कृषी सहायक रेणुका दराडे, शेतकरी तानाजी गायधने, गावातील महिला शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी कृषीमित्र शाम आकरे व प्रगतशील शेतकरी यांना नवनवीन योजनांचा लाभ घेण्यासाठी आवाहन करण्यात आले. तसेच परिसरातील पाणीटंचाई लक्षात घेता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ठिंबक सिंचन, तुषार सिंचन यासारख्या सिंचनाच्या सुविधांची साधने वाढविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.अभ्यास दौऱ्यातील आलेले अनुभव महिला शेतकऱ्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले. शेतकऱ्यांनीही एकत्र येत गटशेतीसाठी पुढाकार घेण्याचा मनोदय व्यक्त केला. महिला शेतकºयांसह प्रगतशील शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थिती होती.कमी खर्चात जमिनीची सुपिकताजमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना कमी खर्चात ताग, शेणखत, हिरवळीच्या खतांची मदत होते. नैसर्गिक साधनांचा वापर करुन कमीत कमी खर्चात नैसर्गिक शेती कशी करावी यांची मार्गदर्शन होणार आहे. गोमुत्र, शेण, जीवामृत, बीजमृत घरच्या घरी बनवून शेतकऱ्यांना त्यांचा वापर प्रत्यक्ष शेतीत कसा करावा, पाण्याचे नियोजन वेगवेगळ्या हंगामात आलटून पालटून पिके शकी घ्यावी, कमी जागेत जास्त उत्पादन कसे घ्यावे याबाबतही शेतकºयांना खरीप संभामधून मार्गदर्शन होणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती