शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
5
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
6
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
7
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
8
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
9
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
10
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
11
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
12
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
13
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
14
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
15
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
16
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
17
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
18
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
19
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
20
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?

नैसर्गिक पद्धतीची शेती बनतेय काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 21:52 IST

जिल्ह्यात धानपिकाचे पारंपारिक उत्पादन घेतल्याने रासायनिक खताच्या भडीमारामुळे धानपिकाच्या जमनीची ताकद कमी होवून उत्पादनात घट होत आहे. त्यासाठी शेतीचा विसावा मिळाला पाहिजे.हिरवळीच्या खतांचा शेतकऱ्यांनी वापर वाढवणे गरजेचे असल्याचे मत उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी सांगितले.

ठळक मुद्देझिरो बजेटसाठी कृषी विभागाचा पुढाकार : हिरवळीचे खत वापरा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात धानपिकाचे पारंपारिक उत्पादन घेतल्याने रासायनिक खताच्या भडीमारामुळे धानपिकाच्या जमनीची ताकद कमी होवून उत्पादनात घट होत आहे. त्यासाठी शेतीचा विसावा मिळाला पाहिजे.हिरवळीच्या खतांचा शेतकऱ्यांनी वापर वाढवणे गरजेचे असल्याचे मत उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी सांगितले.शेतीला शेणखत, शेळी, मेंढी खत, हिरवळीची खते, ताग यासारख्या खतांनी जमीनीचा पोत सुधारण्यासाठी हिरवळीच्या खतांची मात्रा देणे गरजेचे आहे, असे केलेतरच जमीन भुसभुसीत, उत्पादनास अनुकूल अशी राहिल. शेणखत, मेंढीखत, गांढूळखत, ताग हिरवळीचे खत ही जमिनीची पोषण आहार असून त्यांचा उत्पादन वाढीसाठी फायदा होतोरासायनिक खताचा दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होत असल्याने अलिकडील काळात अनेक शेतकऱ्यांचा कल सेंद्रिय शेतीकडे वळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यासाठी परसोडी मुख्यालयातील चिखली येथे सेंद्रीय पध्दतीच्या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांनी शेती करायला सुरुवात केली आहे. अनुभव आलेले अनेक शेतकरी स्वयंस्फूर्तीने सेंद्रीय शेती करु लागले आहेत.चिखली येथे कृषी सहायक रेणुका दराडे यांच्या मार्गदर्शनातून तानाजी गायधने यांनी सेंद्रीय शेतीसाठी पुढाकार घेतला आहे. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी मिलिंद लाड यांनी त्यांच्या शेतावर भेट देवून पाहणी केली. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांना देशी गाईबद्दल माहिती देवुन त्यातून होणाऱ्या फायद्याची आणि नवनवीन उत्पादनाबद्दलची यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. या भेटीदरम्यान कृषी अधिकारी मिलिंद, कृषी सहायक रेणुका दराडे, शेतकरी तानाजी गायधने, गावातील महिला शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी कृषीमित्र शाम आकरे व प्रगतशील शेतकरी यांना नवनवीन योजनांचा लाभ घेण्यासाठी आवाहन करण्यात आले. तसेच परिसरातील पाणीटंचाई लक्षात घेता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ठिंबक सिंचन, तुषार सिंचन यासारख्या सिंचनाच्या सुविधांची साधने वाढविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.अभ्यास दौऱ्यातील आलेले अनुभव महिला शेतकऱ्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले. शेतकऱ्यांनीही एकत्र येत गटशेतीसाठी पुढाकार घेण्याचा मनोदय व्यक्त केला. महिला शेतकºयांसह प्रगतशील शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थिती होती.कमी खर्चात जमिनीची सुपिकताजमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना कमी खर्चात ताग, शेणखत, हिरवळीच्या खतांची मदत होते. नैसर्गिक साधनांचा वापर करुन कमीत कमी खर्चात नैसर्गिक शेती कशी करावी यांची मार्गदर्शन होणार आहे. गोमुत्र, शेण, जीवामृत, बीजमृत घरच्या घरी बनवून शेतकऱ्यांना त्यांचा वापर प्रत्यक्ष शेतीत कसा करावा, पाण्याचे नियोजन वेगवेगळ्या हंगामात आलटून पालटून पिके शकी घ्यावी, कमी जागेत जास्त उत्पादन कसे घ्यावे याबाबतही शेतकºयांना खरीप संभामधून मार्गदर्शन होणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती