शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर राष्ट्रीय महामार्गाची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:48 IST

तुमसर-गोंदिया-रामटेक राष्ट्रीय महामार्ग चिखलमय व खड्डेमय बनला आहे. सिमेंट रस्ता बांधकामाचा फटका सध्या बसत असून लहान व मोठे पुलाचे रपटे धोकादायक बनले आहेत. देव्हाडी शिवारातील पूल पाण्याखाली गेला होता. महामार्ग प्राधीकरणाचे येथे दुर्लक्ष दिसत असून पावसात महामार्ग बंद होणार आहे.

ठळक मुद्देचिखलमय व खड्डेमय रस्ता : पावसाळ्यात पूल पाण्याखाली येत असल्याने वाढला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर-गोंदिया-रामटेक राष्ट्रीय महामार्ग चिखलमय व खड्डेमय बनला आहे. सिमेंट रस्ता बांधकामाचा फटका सध्या बसत असून लहान व मोठे पुलाचे रपटे धोकादायक बनले आहेत. देव्हाडी शिवारातील पूल पाण्याखाली गेला होता. महामार्ग प्राधीकरणाचे येथे दुर्लक्ष दिसत असून पावसात महामार्ग बंद होणार आहे.रस्ते विकासाचे सशक्त माध्यम आहे. रामटेक-तुमसर-गोंदिया राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देवून सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम सुरू करण्यात आले. दुपदरीकरण रस्ता असून दुसरा रस्ता खड्डेमय झाला आहे. किमान एका बाजुचा सिमेंट रस्ता येथे युद्धस्तरावर पूर्ण करण्याची गरज होती. सिमेंट रस्ता बांधकामापुर्वी महामार्ग प्राधीकरणाने लहान व मोठे पूल पाडले, परंतु तेच पूल आता डोकेदुखी बनले आहे. सदर महामार्गावर कुठे मोठे तर कुठे लहान पूल मोठ्या प्रमाणात आहेत. पावसाळ्यात या रपटे व ओढ्यांना तीव्र गतीने पाणी ओसंडून वाहत असतात. पर्यायी पोचमार्ग गुणवत्तापूर्ण नाही. त्यामुळे पहिल्याच पावसात रपटा अनेक ठिकाणी वाहून गेला. जड वाहतुकीची प्रचंड वर्दळ या मार्गावर आहे. पोचमार्ग सध्या चिखलमय बनले आहे. दुचाकी चालक सध्या येथे जीव मुठीत घालून वाहने चालवित आहेत.महामार्गाचे बांधकाम अतिशय संथगतीने सुरू आहे. उन्हाळ्यात अनेक ठिकाणी कामे बंद होती. पाणी, रेती, मुरूमाची टंचाई निर्माण झाली होती. मुरूमाऐवजी लाल मातीचा उपयोग पोचमार्गावर करण्यात आला. पावसाळ्यात ही बऱ्याच ठिकाणी वाहून गेली. त्यामुळे चिखल व खड्डे पडले आहेत. महामार्गाचे बांधकाम पावसाळ्यात सुरु असल्याने मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.'लोकमत'चे भाकीत खरे ठरले'लोकमत'ने १८ जुलै रोजी 'तर महामार्ग होणार बंद' या शिर्षकाखाली वृत्त छापून संबंधित विभागाचे लक्ष वेधले होते, परंतु महामार्ग प्राधीकरणाने लक्ष दिले नाही. देव्हाडी येथील रपटा पाण्याखाली गेला होता. तर सरांडी येथील रपटा वाहून गेला होता. सध्या सदर महामार्ग अतिशय धोकादायक ठरले आहे.