शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
4
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
5
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
6
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
7
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
8
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
9
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
10
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
11
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
12
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
13
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
14
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
15
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
16
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
17
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
18
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
19
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
20
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं

तुमसर राष्ट्रीय महामार्गाची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:48 IST

तुमसर-गोंदिया-रामटेक राष्ट्रीय महामार्ग चिखलमय व खड्डेमय बनला आहे. सिमेंट रस्ता बांधकामाचा फटका सध्या बसत असून लहान व मोठे पुलाचे रपटे धोकादायक बनले आहेत. देव्हाडी शिवारातील पूल पाण्याखाली गेला होता. महामार्ग प्राधीकरणाचे येथे दुर्लक्ष दिसत असून पावसात महामार्ग बंद होणार आहे.

ठळक मुद्देचिखलमय व खड्डेमय रस्ता : पावसाळ्यात पूल पाण्याखाली येत असल्याने वाढला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर-गोंदिया-रामटेक राष्ट्रीय महामार्ग चिखलमय व खड्डेमय बनला आहे. सिमेंट रस्ता बांधकामाचा फटका सध्या बसत असून लहान व मोठे पुलाचे रपटे धोकादायक बनले आहेत. देव्हाडी शिवारातील पूल पाण्याखाली गेला होता. महामार्ग प्राधीकरणाचे येथे दुर्लक्ष दिसत असून पावसात महामार्ग बंद होणार आहे.रस्ते विकासाचे सशक्त माध्यम आहे. रामटेक-तुमसर-गोंदिया राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देवून सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम सुरू करण्यात आले. दुपदरीकरण रस्ता असून दुसरा रस्ता खड्डेमय झाला आहे. किमान एका बाजुचा सिमेंट रस्ता येथे युद्धस्तरावर पूर्ण करण्याची गरज होती. सिमेंट रस्ता बांधकामापुर्वी महामार्ग प्राधीकरणाने लहान व मोठे पूल पाडले, परंतु तेच पूल आता डोकेदुखी बनले आहे. सदर महामार्गावर कुठे मोठे तर कुठे लहान पूल मोठ्या प्रमाणात आहेत. पावसाळ्यात या रपटे व ओढ्यांना तीव्र गतीने पाणी ओसंडून वाहत असतात. पर्यायी पोचमार्ग गुणवत्तापूर्ण नाही. त्यामुळे पहिल्याच पावसात रपटा अनेक ठिकाणी वाहून गेला. जड वाहतुकीची प्रचंड वर्दळ या मार्गावर आहे. पोचमार्ग सध्या चिखलमय बनले आहे. दुचाकी चालक सध्या येथे जीव मुठीत घालून वाहने चालवित आहेत.महामार्गाचे बांधकाम अतिशय संथगतीने सुरू आहे. उन्हाळ्यात अनेक ठिकाणी कामे बंद होती. पाणी, रेती, मुरूमाची टंचाई निर्माण झाली होती. मुरूमाऐवजी लाल मातीचा उपयोग पोचमार्गावर करण्यात आला. पावसाळ्यात ही बऱ्याच ठिकाणी वाहून गेली. त्यामुळे चिखल व खड्डे पडले आहेत. महामार्गाचे बांधकाम पावसाळ्यात सुरु असल्याने मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.'लोकमत'चे भाकीत खरे ठरले'लोकमत'ने १८ जुलै रोजी 'तर महामार्ग होणार बंद' या शिर्षकाखाली वृत्त छापून संबंधित विभागाचे लक्ष वेधले होते, परंतु महामार्ग प्राधीकरणाने लक्ष दिले नाही. देव्हाडी येथील रपटा पाण्याखाली गेला होता. तर सरांडी येथील रपटा वाहून गेला होता. सध्या सदर महामार्ग अतिशय धोकादायक ठरले आहे.