शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

राष्ट्रीय महामार्ग १८ तासापासून जाम; भंडारा-नागपूर-लाखनी वाहतूक खोळंबलेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 14:07 IST

डिझेलचा टँकर आणि कंटेनरची धडक बसल्यानंतर टँकर फाटून या दोन्ही वाहनांची पेट घेतला होता.

- गोपालकृष्ण मांडवकर

भंडारा : मुंबई-कोलकता या ५३ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर भंडारापासून ६ किलोमीटर अंतरावर गुरूवारी रात्री झालेल्या अपघाताच्या १८ तासानंतरही हा राष्ट्रीय महामार्ग जाम आहे. परिणामत: नागपूर-भंडारा-लाखनी या दरम्यान वाहतूक खोळंबली असून रात्रभरापासून महामार्गावर वाहनांच्या रांगा कायम आहेत.

गुरूवारी रात्री पाऊणेआठ वाजताच्या दरम्यान, डिझेलचा टँकर आणि कंटेनरची धडक बसल्यानंतर टँकर फाटून या दोन्ही वाहनांची पेट घेतला होता. ऐन पुलावर झालेल्या या अपघातामुळे दोन्ही बाजुंची वाहतूक ठप्प झाली होती. रात्री उशिरा आग विझविल्यानंतर मार्ग मोकळा करण्यात आला. मात्र दुतर्फा अडलेल्या वाहनांच्या मोठ्या प्रमाणावरील संख्येमुळे रात्रीपासून वाहतुकीची समस्या कायमच आहे. परिणामत: हा राष्ट्रीय महामार्ग ठप्प पडल्यासारखी स्थिती मागील १८ तासांपासून आहे. या महामार्गचे काम सुरू असल्याने अरूंद पुलावरील मार्गावरून वाहतूक सुरू आहे. दुहेरी वाहतुकीचा मार्ग नसल्याने वाहतुकीला प्रचंड अडथळा होत आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजतासुद्धा हीच परिस्थिती कायम होती. अनेक वाहने अडलेली होती. असा झाला होता अपघात

भंडारापासून ६ किलोमीटर अंतरावरील भिलेवाडा ते पलाडी दरम्यान एआर पेट्रोल पंपाजवळ गुरूवारी रात्री ७:४५ वाजताच्या दरम्यान ही दुर्घटना घडली होती. या राष्ट्रीय महामार्गावर भिलेवाडा ते पलाडी दरम्यान महामार्गाचे काम सुरू आहे. या मार्गावरील पुलावरून ही दोन्ही वाहने समोरासमोरून येताना टँकरला कंटेनरची मागून घडक बसली. यामुळे टँकर फुटून डिझेल बाहेर आले आणि दोन्ही वाहनांना आग लागली. यात कंटेनरमधील एकाचा आत फसून जळून मृत्यू झाला होता. तब्बल दोन तासांनंतर दोन अग्नीशामक वाहनांच्या माध्यमातून ही आग विझविण्यात यश आले होते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी