शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

अभयारण्यातील वृक्षांना सूचना फलकांसाठी ठोकले खिळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 21:52 IST

कोका अभयारण्यातील रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या झाडांना खिळे ठोकून सुमारे ४०० सूचना फलक लावण्यात आल्याचा गैरप्रकार स्थानिक वनाधिकाऱ्यांच्या आदेशाने करण्यात आला आहे. वन्यजीवांच्या भ्रमंती मार्गावर व चराई क्षेत्रात पर्यटकांना खिळे पडलेले आढळून आल्याने वन्यप्राण्यांच्या जिवीतास धोका संभवत आहे. तसेच पर्यावरण कायद्याला या ठिकाणी ठेंगा दाखविण्यात आल्याने वरिष्ठ वनाधिकारी प्रकरणी दखल घेतील काय, असा प्रश्न पर्यावरण प्रेमीकडून विचारला जात आहे.

ठळक मुद्देपर्यावरणप्रेमींमध्ये रोष : वरिष्ठांनी दखल घेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : कोका अभयारण्यातील रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या झाडांना खिळे ठोकून सुमारे ४०० सूचना फलक लावण्यात आल्याचा गैरप्रकार स्थानिक वनाधिकाऱ्यांच्या आदेशाने करण्यात आला आहे. वन्यजीवांच्या भ्रमंती मार्गावर व चराई क्षेत्रात पर्यटकांना खिळे पडलेले आढळून आल्याने वन्यप्राण्यांच्या जिवीतास धोका संभवत आहे. तसेच पर्यावरण कायद्याला या ठिकाणी ठेंगा दाखविण्यात आल्याने वरिष्ठ वनाधिकारी प्रकरणी दखल घेतील काय, असा प्रश्न पर्यावरण प्रेमीकडून विचारला जात आहे.कोका अभयारण्यात महाशिवरात्रीच्या पुर्वी अभयारण्यातून जाणाºया टेकेपार ते कोका, दुधारा ते सालेहेटी व ढिवरवाडा ते किटाळी मार्गावरील रस्त्याच्या कडेला विविध माहिती देणारे सुचना फलक झाडांना ठोकण्यात आल्याचे दिसून येत आहे. मात्र, सुचना फलक प्लास्टिकचे असतांना त्यांना झाडावर लावतांना मात्र, खिळे ठोकण्यात आले आहेत. एका माहितीनुसार स्थानिक वनाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये सुमारे ४०० लहान प्लास्टिकचे सूचना फलक अभयारण्यातील विविध मार्गावरील झाडांना खिळ्याद्वारे ठोकण्यात आले आहे. शहरात झाडांना जाणते-अजाणतेपणे खिळे ठोकून इजा पोहचविण्याचे प्रकार दिसून येतात. परंतू पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी ज्यावर सोपविलेली आहे. ज्यांना विविध प्रकारचे तंत्रशुध्द प्रशिक्षण देण्यात आले आहेत. त्यांच्याकडून हा गैरप्रकार पहिल्यांदाच होतांना दिसत आहे.मागील वर्षांपर्यंत भंडारा शहरातील राष्टÑीय महामार्गावर असाच प्रकार दिसून यायचा. मात्र, निसर्ग प्रेमींनी झाडांना होणारी इजा व वेदना लक्षात घेत स्वत: खिळेमुक्त झाडे अभियान राबवून झाडांना जीवनदान दिले. ठोकलेले खिळे कालांतराणे गंजतात, तो गंज झाडांच्या खोडात उतरतो. परिणामी झाडे खंगत जातात. त्यांचे आयुष्य कमी होते, शहरी भागात जाहिरात फलक व व्यवसायाची माहिती देण्याची हा गैरप्रकार केला जातो. बहुतेकांना झाडांचे नुकसान होते, याचीही कल्पनाही नसते.अभयारण्यात हार्नबंदी, प्लास्टिक बंदी, स्वच्छता राखा, वेग मर्यादा व प्रवेशास बंदी आदींची माहिती देणार हे सुचना फलक असले तरी ते झाडांवर खिळ्याने ठोकणे योग्य आहे का? खिळे ठोकताना काही खिळे वन्यप्राण्यांच्या भ्रमंतीच्या व चराईच्या क्षेत्रातही पडलेले पर्यटकांना दिसून आले. त्यामुळे एखादा खिळा वन्यजीवांच्या तोंडात जावून त्यांना धोका पोहचवू शकतो. याशिवाय जनावरांच्या पायाखाली आल्यास त्यांना इजा पोहचू शकतो. तसेच झाडे हे सजीव आहेत. त्यानाही यातना होतील, याची थोडी कल्पना वनाधिकारी यांना नाही काय, असे अनेक प्रश्न निसर्ग प्रेमीकडून विचारण्यात येत आहेत.अभयारण्यातील झाडांना खिळे ठोकण्याच्या सूचना दिलेल्या नव्हत्या. ४०० सूचना फलकाचे आॅर्डर दिलेले होते. मात्र, तेवढे लावण्यात आलेले नाहीत. वनकर्मचाºयांना दोºया दिलेल्या होत्या. झाडांना सुचना फलक लावलेले दिसून आले. मात्र, खिळे ठोकलेले दिसून आले नाही. प्रकरणी माहिती घेतली जाईल.- सचिन जाधववनपरिक्षेत्राधिकारी, अभयारण्य कोका