शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
2
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
3
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
4
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
5
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
8
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
9
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
10
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
11
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
12
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
13
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
14
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
15
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
16
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
17
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
18
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
19
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
20
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!

भंडारा जिल्ह्यातील दोन वाघांच्या मृत्यूचे गूढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 15:16 IST

उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील दोन वाघांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात वन्यजीव विभागाला अद्यापही यश आले नाही.

ठळक मुद्देआरोपींचा थांगपत्ता नाहीव्हिसेरा भारतीय पशुचिकित्सा अनुसंधान संस्थेकडे

ज्ञानेश्वर मुंदेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील दोन वाघांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात वन्यजीव विभागाला अद्यापही यश आले नाही. फॉरेन्सिक रिपोर्टमधून काहीही हाती लागलेले नसल्याने आता वाघांच्या अवयवाचे नमुने (व्हिसेरा) उत्तरप्रदेशातील इज्जतपूरच्या भारतीय पशुचिकित्सा अनुसंधान संस्थेकडे पाठविण्यात आले आहे. अद्यापपर्यंत या प्रकरणात वन्यजीव विभाग कोणत्याच ठोस निर्णयापर्यंत पोहोचले नसून आरोपींचाही थांगपत्ता नाही.सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात उमरेड-पवनी- कऱ्हांडला अभयारण्याच्या पवनी गेट कक्ष क्रमांक २२६ मध्ये दोन वाघांचा मृत्यू झाला होता. ३० डिसेंबर रोजी टी-१ अर्थात चार्जर आणि दुसऱ्या दिवशी ३१ डिसेंबरला टी-४ अर्थात राही वाघीणीचा मृतदेह आढळला होता. या घटनेने संपूर्ण पेंच वन्यजीव विभाग हादरुन गेला होता. या वाघांच्या मृत्यूच्या कारणाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. शवविच्छेदनानंतर तीन नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले. दुसरीकडे वन्यजीव विभागाने श्वान पथकाच्या मदतीने जंगल पालथे घातले. सुरुवातीला या वाघांवर विषप्रयोग झाल्याचे पुढे आले. शिकारीसाठी टाकलेले विषयुक्त गोळे रानडुकरांनी खाल्ले. त्यातून मृत्यूमुखी पडलेल्या रानडुकरांचे मांस या दोन वाघानी खाल्याने त्यांचा मृत्यू झालाचा प्राथमिक अंदाज काढण्यात आला. परिसरातील नागरिकांची चौकशी करण्यात आली. माहिती देणाºयास बक्षीस घोषित करण्यात आले. परंतु वन्यजीव विभागाच्या हाती काहीच लागले नाही.दरम्यान फॉरेन्सिक विभागाचा अहवाल प्राप्त झाला. मात्र यातून काहीच निष्पन्न होत नसल्याने तपास थंडावला आहे. आता उत्तरप्रदेशातील इज्जतपूरच्या भारतीय पशुचिकित्सा अनुसंधान संस्थेत या वाघाच्या अवयवाचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहे. त्याठिकाणी ‘इस्टोपॅथॉलॉजी’ आणि ‘टॉक्झीकोलॉजी’ या तपासण्या होऊन त्यात या वाघांच्या मृत्यूचे खरे कारण पुढे येईल, अशी अपेक्षा आहे. मात्र सध्यातरी या वाघांच्या मृत्यूचे गूढ वन्यजीव विभागाला उकलण्यात अपयश आले, असेच म्हणावे लागेल.अभयारण्याची सुरक्षा वाऱ्यावरवाघांचे वास्तव्य असलेल्या अभयारण्यात सुरक्षेच्या व्यापक उपाययोजना करणे आवश्यक असते. मात्र उमरेड- पवनी- कऱ्हांडला अभयारण्यात अशा कोणत्याही खास उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे दिसून येते. दोन वाघांच्या मृत्यूने वन्यजीव विभागाची मोठी हानी झाली. आता अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढले जात आहे. या अभयारण्यात कर्मचाºयांची साधी गस्तही नसल्याचे या दोन वाघांच्या मृत्यूनंतर पुढे आले.उमरेड-पवनी-कºहांडला अभयारण्यातील दोन वाघांचा मृत्यूचा तपास युध्दस्तरावर सुरु आहे. वाघांच्या अवयवाचे नमुने उत्तरप्रदेशात पाठविण्यात आले आहे. तसेच अभयारण्याशेजारी गावातील संशयीतांची चौकशी केली जात आहे. या वाघांच्या मृत्यूचे कारण लवकरच स्पष्ट होईल आणि आरोपी जेरबंद होतील.- राहूल गवई,विभागीय वनअधिकारी, पेंच वाघ्र प्रकल्प

टॅग्स :Tigerवाघ