शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

भंडारा जिल्ह्यातील दोन वाघांच्या मृत्यूचे गूढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 15:16 IST

उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील दोन वाघांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात वन्यजीव विभागाला अद्यापही यश आले नाही.

ठळक मुद्देआरोपींचा थांगपत्ता नाहीव्हिसेरा भारतीय पशुचिकित्सा अनुसंधान संस्थेकडे

ज्ञानेश्वर मुंदेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील दोन वाघांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात वन्यजीव विभागाला अद्यापही यश आले नाही. फॉरेन्सिक रिपोर्टमधून काहीही हाती लागलेले नसल्याने आता वाघांच्या अवयवाचे नमुने (व्हिसेरा) उत्तरप्रदेशातील इज्जतपूरच्या भारतीय पशुचिकित्सा अनुसंधान संस्थेकडे पाठविण्यात आले आहे. अद्यापपर्यंत या प्रकरणात वन्यजीव विभाग कोणत्याच ठोस निर्णयापर्यंत पोहोचले नसून आरोपींचाही थांगपत्ता नाही.सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात उमरेड-पवनी- कऱ्हांडला अभयारण्याच्या पवनी गेट कक्ष क्रमांक २२६ मध्ये दोन वाघांचा मृत्यू झाला होता. ३० डिसेंबर रोजी टी-१ अर्थात चार्जर आणि दुसऱ्या दिवशी ३१ डिसेंबरला टी-४ अर्थात राही वाघीणीचा मृतदेह आढळला होता. या घटनेने संपूर्ण पेंच वन्यजीव विभाग हादरुन गेला होता. या वाघांच्या मृत्यूच्या कारणाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. शवविच्छेदनानंतर तीन नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले. दुसरीकडे वन्यजीव विभागाने श्वान पथकाच्या मदतीने जंगल पालथे घातले. सुरुवातीला या वाघांवर विषप्रयोग झाल्याचे पुढे आले. शिकारीसाठी टाकलेले विषयुक्त गोळे रानडुकरांनी खाल्ले. त्यातून मृत्यूमुखी पडलेल्या रानडुकरांचे मांस या दोन वाघानी खाल्याने त्यांचा मृत्यू झालाचा प्राथमिक अंदाज काढण्यात आला. परिसरातील नागरिकांची चौकशी करण्यात आली. माहिती देणाºयास बक्षीस घोषित करण्यात आले. परंतु वन्यजीव विभागाच्या हाती काहीच लागले नाही.दरम्यान फॉरेन्सिक विभागाचा अहवाल प्राप्त झाला. मात्र यातून काहीच निष्पन्न होत नसल्याने तपास थंडावला आहे. आता उत्तरप्रदेशातील इज्जतपूरच्या भारतीय पशुचिकित्सा अनुसंधान संस्थेत या वाघाच्या अवयवाचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहे. त्याठिकाणी ‘इस्टोपॅथॉलॉजी’ आणि ‘टॉक्झीकोलॉजी’ या तपासण्या होऊन त्यात या वाघांच्या मृत्यूचे खरे कारण पुढे येईल, अशी अपेक्षा आहे. मात्र सध्यातरी या वाघांच्या मृत्यूचे गूढ वन्यजीव विभागाला उकलण्यात अपयश आले, असेच म्हणावे लागेल.अभयारण्याची सुरक्षा वाऱ्यावरवाघांचे वास्तव्य असलेल्या अभयारण्यात सुरक्षेच्या व्यापक उपाययोजना करणे आवश्यक असते. मात्र उमरेड- पवनी- कऱ्हांडला अभयारण्यात अशा कोणत्याही खास उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे दिसून येते. दोन वाघांच्या मृत्यूने वन्यजीव विभागाची मोठी हानी झाली. आता अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढले जात आहे. या अभयारण्यात कर्मचाºयांची साधी गस्तही नसल्याचे या दोन वाघांच्या मृत्यूनंतर पुढे आले.उमरेड-पवनी-कºहांडला अभयारण्यातील दोन वाघांचा मृत्यूचा तपास युध्दस्तरावर सुरु आहे. वाघांच्या अवयवाचे नमुने उत्तरप्रदेशात पाठविण्यात आले आहे. तसेच अभयारण्याशेजारी गावातील संशयीतांची चौकशी केली जात आहे. या वाघांच्या मृत्यूचे कारण लवकरच स्पष्ट होईल आणि आरोपी जेरबंद होतील.- राहूल गवई,विभागीय वनअधिकारी, पेंच वाघ्र प्रकल्प

टॅग्स :Tigerवाघ