प्रकरण वायगाव जंगलातील : ‘जय’चा थांगपत्ता नाहीपवनी : वाघांच्या शिकारीकरिता कुप्रसिद्ध तस्कर कुट्टू पारधी ने सीबीआय व मेळघाट सायबर सेलला वायगाव जंगलातील वाघाच्या हत्येची कबुली दिली नसती तर हे गुढच राहिले असते. येथे वनविभागाला व कोणालाही कुट्टू पारधीची टोळी येथे येऊन राहिली व या टोळीने वाघाची हत्या केली , याबाबत काहीही माहिती नव्हती. दोन वर्षानंतर वाघाच्या हत्येची घटना उघडकीस आली होती.जंगलात वाघांना मारण्यासाठी शिकारी शिरल्याची माहिती मिळाल्यामुळे एप्रिल मे २०१३ मध्ये ताडोबा अंधारी, नवेगाव, नागझिरा, पेंच, मेळघाट आदी व्याघ्र प्रकल्पात व अभयारण्यात रेड अलर्टची घोषणा करण्यात आली होती. कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. कुट्टू पारधीच्या टोळीने ओळखले होते की या जंगलात गेलो तर आपण पकडले जाऊ. त्यामुळे ही टोळी वाघाच्या शिकारीसाठी सुरक्षित जंगलाचा शोध घेत होती.पवनीच्या वनक्षेतातील जंगलात अनेक वाघ असल्याची माहिती कुट्टू पारधीला मिळाल्याची शक्यता होती. येथील जंगलाची संपूर्ण माहिती घेऊनच हे जंगल वाघाच्या हत्येसाठी सुरक्षित असल्यामुळे या जंगलाची निवड केली होती. ही टोळी पवनी परिसरात अनेक दिवस थांबली होती. तेथेच त्यांनी वाघाच्या हत् येची योजना तयार केली होती. सर्व व्याघ्र प्रकल्पात व अभयारण्यात कडक सुरक्षा व्यवस्था होती. पण येथील जंगलात काहीही सुरक्षा व्यवस्था नव्हती. कोणीही अनोळखी व्यक्ती जंगलात जावू शकत होता. यामुळेच कुट्टू पारधीची टोळी या जंगलात वाघाची शिकार करण्यात यशस्वी ठरली होती. सीबीआयने कुट्टू पारधीला अटक केल्यामुळे वाघाच्या हत्येचे गुढ उकलले गेले. २०१३ मध्ये येथील जंगलात अनेक वाघ होते. प्रसिद्ध जय वाघाचे याच काळात आगमन झाले होते. या वाघाच्या हत्येपासून वनविभागाने काही बोध घेण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)
कुट्टू पारधीच्या कबुलीनंतर उलगडले वाघाच्या हत्येचे रहस्य
By admin | Updated: April 21, 2017 00:42 IST