शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

कुट्टू पारधीच्या कबुलीनंतर उलगडले वाघाच्या हत्येचे रहस्य

By admin | Updated: April 21, 2017 00:42 IST

वाघांच्या शिकारीकरिता कुप्रसिद्ध तस्कर कुट्टू पारधी ने सीबीआय व मेळघाट सायबर सेलला वायगाव जंगलातील वाघाच्या हत्येची कबुली दिली नसती तर

प्रकरण वायगाव जंगलातील : ‘जय’चा थांगपत्ता नाहीपवनी : वाघांच्या शिकारीकरिता कुप्रसिद्ध तस्कर कुट्टू पारधी ने सीबीआय व मेळघाट सायबर सेलला वायगाव जंगलातील वाघाच्या हत्येची कबुली दिली नसती तर हे गुढच राहिले असते. येथे वनविभागाला व कोणालाही कुट्टू पारधीची टोळी येथे येऊन राहिली व या टोळीने वाघाची हत्या केली , याबाबत काहीही माहिती नव्हती. दोन वर्षानंतर वाघाच्या हत्येची घटना उघडकीस आली होती.जंगलात वाघांना मारण्यासाठी शिकारी शिरल्याची माहिती मिळाल्यामुळे एप्रिल मे २०१३ मध्ये ताडोबा अंधारी, नवेगाव, नागझिरा, पेंच, मेळघाट आदी व्याघ्र प्रकल्पात व अभयारण्यात रेड अलर्टची घोषणा करण्यात आली होती. कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. कुट्टू पारधीच्या टोळीने ओळखले होते की या जंगलात गेलो तर आपण पकडले जाऊ. त्यामुळे ही टोळी वाघाच्या शिकारीसाठी सुरक्षित जंगलाचा शोध घेत होती.पवनीच्या वनक्षेतातील जंगलात अनेक वाघ असल्याची माहिती कुट्टू पारधीला मिळाल्याची शक्यता होती. येथील जंगलाची संपूर्ण माहिती घेऊनच हे जंगल वाघाच्या हत्येसाठी सुरक्षित असल्यामुळे या जंगलाची निवड केली होती. ही टोळी पवनी परिसरात अनेक दिवस थांबली होती. तेथेच त्यांनी वाघाच्या हत् येची योजना तयार केली होती. सर्व व्याघ्र प्रकल्पात व अभयारण्यात कडक सुरक्षा व्यवस्था होती. पण येथील जंगलात काहीही सुरक्षा व्यवस्था नव्हती. कोणीही अनोळखी व्यक्ती जंगलात जावू शकत होता. यामुळेच कुट्टू पारधीची टोळी या जंगलात वाघाची शिकार करण्यात यशस्वी ठरली होती. सीबीआयने कुट्टू पारधीला अटक केल्यामुळे वाघाच्या हत्येचे गुढ उकलले गेले. २०१३ मध्ये येथील जंगलात अनेक वाघ होते. प्रसिद्ध जय वाघाचे याच काळात आगमन झाले होते. या वाघाच्या हत्येपासून वनविभागाने काही बोध घेण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)