शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

शिक्षा भाेगून येताच मित्रांच्या मदतीने खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2022 05:00 IST

नेहाल नुकत्याच एका प्रकरणात खुनाची शिक्षा भाेगून आला हाेता. मात्र बंटीसाेबत नेहालचा क्षुल्लक कारणावरून वाद पराकाेटीला गेला हाेता. बंटी नेहालला नेहमी धमकवत हाेता, त्यामुळे आपला जीव जाईल या भीतीतून त्याने शिक्षा भाेगून येताच खुनाचा कट रचला. त्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दाेघांना साेबत घेतले आणि गणेशनगरीजवळ शनिवारी खून केला. या प्रकरणात वरठीचे ठाणेदार निशांत मेश्राम यांनी तिघांनाही शुक्रवारी रात्री अटक केली.

लाेकमत न्यूज नेटवर्कवरठी : घरफाेडी प्रकरणात शिक्षा भाेगून येताच मित्राच्या मदतीने रेती व्यावसायिकाचा खून केला. वारंवार हाेणारे वाद आणि त्यातून जिवाची भीती यामुळे मित्राच्या मदतीने धारदार शस्त्राने सपासप २६ वार करून खून केल्याचे पाेलीस तपासात पुढे आले आहे. विशेष म्हणजे मृतक आणि मुख्य आराेपीत घनिष्ठ मैत्रीही हाेती. खुनाची ही घटना भंडारा- वरठी मार्गावर गणेश नगरीसमाेर शुक्रवारी सकाळी घडली हाेती.राहूल उर्फ बंटी लालचंद जयस्वाल (३०) रा. टाकळी असे मृताचे नाव असून ताे मूळचा उत्तरप्रदेशातील गाैरखपूर येथील रहिवासी आहे. ताे गत अनेक वर्षांपासून भंडाराजवळील टाकळी येथे राहत हाेता. त्याच्याकडे ट्रॅक्टर असून ताे रेतीचा व्यवसाय करीत हाेता. नेहाल अण्णाजी राऊत (२५), अमित उर्फ कचरा सुधाकर चाेपकर, विश्वा उर्फ बग्गा रामकृष्ण गाते (१९)  अशी आराेपींची  नावे असून ते कुख्यात गुन्हेगार आहेत. मुख्य आराेपी नेहाल राऊत हा अट्टल घरफाेड्या असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे. कचरू चाेपकरवरही गुन्हे दाखल असून बग्गा गाते याच्यावर खुनाचा गुन्हा आहे.नेहाल नुकत्याच एका प्रकरणात खुनाची शिक्षा भाेगून आला हाेता. मात्र बंटीसाेबत नेहालचा क्षुल्लक कारणावरून वाद पराकाेटीला गेला हाेता. बंटी नेहालला नेहमी धमकवत हाेता, त्यामुळे आपला जीव जाईल या भीतीतून त्याने शिक्षा भाेगून येताच खुनाचा कट रचला. त्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दाेघांना साेबत घेतले आणि गणेशनगरीजवळ शनिवारी खून केला. या प्रकरणात वरठीचे ठाणेदार निशांत मेश्राम यांनी तिघांनाही शुक्रवारी रात्री अटक केली. शनिवारी न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली. अधिक तपास जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार मेश्राम करीत आहेत.

बंटी आणि नेहाल यांची हाेती घट्ट मैत्री- मृतक बंटी जयस्वाल आणि या प्रकरणातील मुख्य आराेपी नेहाल राऊत यांच्यात घट्ट मैत्री हाेती. दाेघात चांगला घराेबा हाेता. नेहालची बंटीच्या घरी नेहमी ये-जा असे. परिवारातील सदस्यांसाेबतही चांगली गट्टी जमली हाेती. दाेघात आर्थिक देवाण-घेवााण हाेत हाेती. - गत आठवड्यात तुमसर येथे एका हाॅटेलसमाेर तरुणाचा तब्बल २६ वार करुन खून करण्याची घटना घडली हाेती. या घटनेचा व्हिडीओ साेशल मीडियावर वायरल झाला हाेता. या घटनेची शाई वाळत नाही ताेच पुन्हा गणेशनगरी जवळ रेती व्यवसायीकाचा २६ वार करुन  खून करण्यात आला.

खून पुर्वनियाेजित- बंटी जयस्वाल याचा खून पुर्व नियाेजित असल्याचे पाेलीस तपसाात पुढे आले आहे. वादातून आपला जीव जाईल या भीतीने नेहाल राऊतने बंटीचा खून करण्याचे ठरविले हाेते. गुरुवारी रात्रभर दारु प्राशन करुन खुनाचा सापळा रचला. गणेशनगरीजवळ सकाळी बंटी येताच त्याच्या डाेळ्यात मिरची पावडर फेकली आणि धारदार शस्त्राने वार केला. बंटी हा आपल्या तिघांनाही भारी पटेल म्हणून प्रथम  डाेळ्यात मिरची पावडर फेकून खुन केला. भर रस्त्यावर ही घटना घडली. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी