शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 01:04 IST

शासनाकडून स्वच्छ शहर सुंदर शहर संकल्पनेला प्रोत्साहन देण्यात येत असले तरी स्थानिक प्रशासनाकडून मात्र स्वच्छतेला बगल दिल्याचे दिसून येते. पालिकेव्दारा नागरिकांकडून नियमितपणे करवसुली केली जाते. परंतू सुरळीतपणे सेवा मिळत नसल्याने नगरपालीका अपयशी ठरल्याचे दिसून येते.

ठळक मुद्दे नागरिक म्हणतात, सण उत्सवात तरी लक्ष द्या : प्रशासनाकडून विविध उपाययोजनांची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरात ठिकठिकाणी साचत असलेल्या कचऱ्यांच्या ढिगाऱ्यांमुळे शहरातील वातावरण दुषित झाले आहे. पावसाळयाच्या दिवसांतही नगरपरिषदेने कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावली नसल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपालिका प्रशासनाकडून शहरातील कचºयांचा वाढत चालल्याने शहराच्या अनेक भागात स्वच्छतेचे तिनतेरा वाजले आहेत.शासनाकडून स्वच्छ शहर सुंदर शहर संकल्पनेला प्रोत्साहन देण्यात येत असले तरी स्थानिक प्रशासनाकडून मात्र स्वच्छतेला बगल दिल्याचे दिसून येते. पालिकेव्दारा नागरिकांकडून नियमितपणे करवसुली केली जाते. परंतू सुरळीतपणे सेवा मिळत नसल्याने नगरपालीका अपयशी ठरल्याचे दिसून येते. पावसाळयाच्या दिवसांतही ठिकठिकाणी कचºयाचे ढिग दिसत असल्याने शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना दुगंर्धीचा त्रास होत आहे. नगरपालीकेव्दारे शहरातील घनकचरा गोळा करण्यासाठी अनेक ठिकाणी कंटेनर ठेवण्यात आले आहेत परंतू कंटेनर उचलण्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. त्यामुळे बऱ्याच भागात उघड्यावर कचरा टाकला जातो. कचरा टाकण्यासाठी ठेवण्यात आलेल्या प्लास्टिक ड्रमची कधीच वाताहत झाली आहे. पूर्वी सिमेंटच्या बांधलेल्या टाक्यात कचरा टाकला जात होता. त्यानंतर कंटेनरची सोय करण्यात आली. पुढे कंटेनरही नाहिसे झाले. त्याची जागा फिरत्या गाड्यांंनी घेतली. बºयाच वसाहतींमध्ये या फिरत्या गाड्या पोहोचत नसल्याने नागरिकांची ओरड सुरु आहे.काही ठिकाणी नागरिकांचे सहकार्य मिळत नसून अनेकजण कचरा उघड्यावरच टाकतात. ओला कचरा व सुका कचरा एकत्रित आल्याने कचरा टाकल्या जाणाऱ्या परिसरात दुर्गधी पसरत आहे. यासाठी प्रशासनाकडून जनजागृतीची गरज आहे. वाऱ्यामुळे बऱ्याचदा आजूबाजूला हा कचरा पसरत असल्याने व्यापाऱ्यांना देखील त्रास होत आहे. अनेकदा रुमाल लावूनच रस्त्यावरुन चालाव्े लागते.त्यामुळे साथीच्या आजारांत वाढ होण्याची शक्यता आहे. बसस्थानकासह,मोठा बाजार परिसरात कचरा वाढल्याने नागरिकांना भाजीपाला बाजारात जाणे धोकादायक ठरत आहे.त्यामुळे कचऱ्याच्या समस्येकउे पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी होत आहे.कचऱ्याची समस्या वाढलीस्टेट बँकेलगत असलेल्या पालिकेच्या जुन्या शाळेत नागरी आरोग्य केद्र आहे. येथे कचरा टाकण्यासाठी खांबाला लावलेले ड्रम केव्हाच उखडून पडले आहेत. त्यामुळे नागरिक उघडयावर कचरा टाकतात. गांधी चौकात पोहा गल्लीसमोर नाल्यालगत दररोज कचऱ्याचा खच पडलेला असतो.या भागात व्यापारी दुकाने आहेत. पावसामुळे हा कचरा कुजल्याने परिसरात दुर्गधी पसरत आहे. जनावरे अन्नाच्या शोधार्थ फिरत असल्याने हा कचरा रस्त्यावर पसरतो आहे यासाठी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.