शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
3
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
4
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
5
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
6
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
8
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
9
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
10
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
11
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
12
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
13
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
14
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
15
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
16
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
17
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
18
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
19
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
20
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

स्वच्छतेकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 01:04 IST

शासनाकडून स्वच्छ शहर सुंदर शहर संकल्पनेला प्रोत्साहन देण्यात येत असले तरी स्थानिक प्रशासनाकडून मात्र स्वच्छतेला बगल दिल्याचे दिसून येते. पालिकेव्दारा नागरिकांकडून नियमितपणे करवसुली केली जाते. परंतू सुरळीतपणे सेवा मिळत नसल्याने नगरपालीका अपयशी ठरल्याचे दिसून येते.

ठळक मुद्दे नागरिक म्हणतात, सण उत्सवात तरी लक्ष द्या : प्रशासनाकडून विविध उपाययोजनांची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरात ठिकठिकाणी साचत असलेल्या कचऱ्यांच्या ढिगाऱ्यांमुळे शहरातील वातावरण दुषित झाले आहे. पावसाळयाच्या दिवसांतही नगरपरिषदेने कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावली नसल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपालिका प्रशासनाकडून शहरातील कचºयांचा वाढत चालल्याने शहराच्या अनेक भागात स्वच्छतेचे तिनतेरा वाजले आहेत.शासनाकडून स्वच्छ शहर सुंदर शहर संकल्पनेला प्रोत्साहन देण्यात येत असले तरी स्थानिक प्रशासनाकडून मात्र स्वच्छतेला बगल दिल्याचे दिसून येते. पालिकेव्दारा नागरिकांकडून नियमितपणे करवसुली केली जाते. परंतू सुरळीतपणे सेवा मिळत नसल्याने नगरपालीका अपयशी ठरल्याचे दिसून येते. पावसाळयाच्या दिवसांतही ठिकठिकाणी कचºयाचे ढिग दिसत असल्याने शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना दुगंर्धीचा त्रास होत आहे. नगरपालीकेव्दारे शहरातील घनकचरा गोळा करण्यासाठी अनेक ठिकाणी कंटेनर ठेवण्यात आले आहेत परंतू कंटेनर उचलण्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. त्यामुळे बऱ्याच भागात उघड्यावर कचरा टाकला जातो. कचरा टाकण्यासाठी ठेवण्यात आलेल्या प्लास्टिक ड्रमची कधीच वाताहत झाली आहे. पूर्वी सिमेंटच्या बांधलेल्या टाक्यात कचरा टाकला जात होता. त्यानंतर कंटेनरची सोय करण्यात आली. पुढे कंटेनरही नाहिसे झाले. त्याची जागा फिरत्या गाड्यांंनी घेतली. बºयाच वसाहतींमध्ये या फिरत्या गाड्या पोहोचत नसल्याने नागरिकांची ओरड सुरु आहे.काही ठिकाणी नागरिकांचे सहकार्य मिळत नसून अनेकजण कचरा उघड्यावरच टाकतात. ओला कचरा व सुका कचरा एकत्रित आल्याने कचरा टाकल्या जाणाऱ्या परिसरात दुर्गधी पसरत आहे. यासाठी प्रशासनाकडून जनजागृतीची गरज आहे. वाऱ्यामुळे बऱ्याचदा आजूबाजूला हा कचरा पसरत असल्याने व्यापाऱ्यांना देखील त्रास होत आहे. अनेकदा रुमाल लावूनच रस्त्यावरुन चालाव्े लागते.त्यामुळे साथीच्या आजारांत वाढ होण्याची शक्यता आहे. बसस्थानकासह,मोठा बाजार परिसरात कचरा वाढल्याने नागरिकांना भाजीपाला बाजारात जाणे धोकादायक ठरत आहे.त्यामुळे कचऱ्याच्या समस्येकउे पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी होत आहे.कचऱ्याची समस्या वाढलीस्टेट बँकेलगत असलेल्या पालिकेच्या जुन्या शाळेत नागरी आरोग्य केद्र आहे. येथे कचरा टाकण्यासाठी खांबाला लावलेले ड्रम केव्हाच उखडून पडले आहेत. त्यामुळे नागरिक उघडयावर कचरा टाकतात. गांधी चौकात पोहा गल्लीसमोर नाल्यालगत दररोज कचऱ्याचा खच पडलेला असतो.या भागात व्यापारी दुकाने आहेत. पावसामुळे हा कचरा कुजल्याने परिसरात दुर्गधी पसरत आहे. जनावरे अन्नाच्या शोधार्थ फिरत असल्याने हा कचरा रस्त्यावर पसरतो आहे यासाठी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.