शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

साकाेली नगर परिषदेतून सेंदूरवाफा वगळण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:29 IST

साकाेली : साकाेली ग्रामपंचायतीचे पाच वर्षापूर्वी नगर परिषदेत रूपांतर झाले. सर्व प्रक्रिया व्यवस्थित सुरू असताना आता सेंदूरवाफावासीयांमध्ये नाराजीचा सूर ...

साकाेली : साकाेली ग्रामपंचायतीचे पाच वर्षापूर्वी नगर परिषदेत रूपांतर झाले. सर्व प्रक्रिया व्यवस्थित सुरू असताना आता सेंदूरवाफावासीयांमध्ये नाराजीचा सूर ऐकू येत आहे. नगर परिषदेत समाविष्ट झालेल्या सेंदूरवाफाच्या विकास कामात दुर्लक्ष हाेत असल्याचा आराेप केला जात आहे. त्यामुळे आता साकाेली नगर परिषदेतून सेंदूरवाफा गाव वगळण्याच्या कामाला वेग आला आहे. शेकडाे नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हापासून सेंदूरवाफा ग्रामपंचायत अस्तित्वात आहे. मात्र २०१६ मध्ये साकाेली नगर परिषदेत ग्रामपंचायतचा समावेश करण्यात आला. यासाठी शासकीय स्तरावरुन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मात्र नागरिकांचे मत जाणून घेण्यात आले नव्हते. केवळ राजकीय फायद्यासाठी मूठभर लाेकांनी नगर परिषदेला हाेकार दर्शविला, असा नागरिकांचा आराेप आहे. सेंदूरवाफा गावाची लाेकसंख्या १० हजारापेक्षा अधिक असताना फक्त १२१ लाेकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन नगर परिषद निर्मितीची प्रक्रिया करण्यात आली हाेती. विशेष म्हणजे साकाेली ग्रामपंचायत असताना असलेल्या १७ सदस्यांएवढीच सेंदूरवाफाची सदस्या संख्या हाेती. असे असताना सेंदूरवाफावासीयांची दिशाभूल करण्यात आली. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीतर्फे मिळणारे लाभही मिळत नाही.

बाॅक्स

विकास कामात दुजाभाव

विकासकामात साकाेलीला प्राधान्य देऊन सेंदूरवाफाला दुय्यम स्थान दिले जाते. नाव देतानाही साकाेली सेंदूरवाफा असे नाव देण्याचे ठरले हाेते. परंतु साकाेली नगर परिषद असेच नाव देण्यात आले. उलट नगर परिषदेमार्फत वेगवेगळे शुल्क आकारण्यात येते. सेंदूरवाफा गावातील राेजमजुरी करणाऱ्या नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागताे. नगर परिषद स्थापन हाेऊन पाच वर्षे झाली तरी अद्याप सेंदूरवाफाचा विकास दिसत नाही. त्यामुळे आता साकाेली नगर परिषदेतून वेगळे हाेण्याचा निर्णय गावकरी घेत आहेत.