शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
3
Operation Sindoor : राजनाथ सिंह घेणार मोठी बैठक, तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस राहणार उपस्थित!
4
India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाला! भारताच्या कारवाईदरम्यान मोठा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी
5
४१ वर्षीय मराठमोळा अभिनेता करतोय परिक्षेची तयारी, काही दिवसांनी आहेत पेपर, म्हणतो - "मला चांगलं करायचं आहे…"
6
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
7
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
8
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
9
Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!
10
Mother's Day 2025: आईला द्या ५ स्कीममध्ये गुंतवणूक करुन गिफ्ट; लोकही म्हणतील, मुल असावं तर असं!
11
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
12
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
13
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
14
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
16
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
17
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
18
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
19
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
20
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त

तुमसर बाजार समितीवर प्रशासक नेमणुकीच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:36 IST

मोहन भोयर तुमसर : बाजार समितीच्या पोटनियमानुसार सोपविलेली जबाबदारी व कर्तव्य पार पाडण्यात हेतुपुरस्सर व जाणीवपूर्वक कसूर करीत आपल्या ...

मोहन भोयर

तुमसर : बाजार समितीच्या पोटनियमानुसार सोपविलेली जबाबदारी व कर्तव्य पार पाडण्यात हेतुपुरस्सर व जाणीवपूर्वक कसूर करीत आपल्या अधिकारपदाचा दुरुपयोग करण्याच्या ठपका तुमसर बाजार समिती संचालक मंडळावर ठेवण्यात आला आहे. प्रशासकाची नेमणूक का करण्यात येऊ नये, अशी विचारणा जिल्हा उपनिबंधकांनी केली आहे. सात विविध मुद्द्यांवर आक्षेप नोंदविण्यात आले असून, बाजार समिती बरखास्त करून प्रशासक नेमणुकीच्या हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे.

बाजार समितीच्या ओपन शेड बांधकामाकरिता राज्य पणन मंडळ पुणे यांनी मंजूर निविदेला जादा अंदाजपत्रकीय रकमेस या अटी व शर्थीस अधीन राहून मान्यता दिली; परंतु कंत्राटदाराने बांधकाम मुदतीत पूर्ण केले नाही. मुदतवाढीसाठी कंत्राटदाराने समितीकडे विनंती अर्ज केला. त्यानंतर संचालक मंडळाने कंत्राटदारास मुदतवाढ दिली. मात्र त्यासाठी राज्य कृषी मंडळाची मंजुरी घेतली नाही. बाजार समितीने तीन हजार शाली खरेदी केल्या. सदर शालींची किंमत तीन लाख ६६ हजार इतकी आहे. या शाली सहकारी संस्थांचे पदाधिकारी व शेतकऱ्यांना शेतकरी मेळाव्यात व सर्वसाधारण सभेत वाटप करण्यात आल्या. मात्र शाली खरेदी करताना निविदा प्रक्रियेचा अवलंब केला नाही तसेच खर्च करण्यास सक्षम अधिकाऱ्यांची परवानगीही घेतली नाही. मिठाई खरेदीसाठी ७७ हजार ४२५ रुपये अदा केले. बाजार समितीने कॅलेंडर छपाईसाठी तीन लाख ३९ हजार रुपये खर्च केला. यात बाजार समिती निधीचा दुरुपयोग झाला. हा खर्च समितीच्या फंडातून करण्यात आला. या खर्चास सक्षम अधिकाऱ्यांची मंजुरी घेतली नसल्याचे दिसून येते. खुल्या ओट्यासाठी एक लाख ६६ हजार ९२१ रुपये इतकी रक्कम जास्त दिलेली आहे. या सर्व खर्चावर लेखापरीक्षकांनी आक्षेप नोंदविला आहे. सिमेंट रोड अंदाजपत्रकात कंत्राटदाराला एक लाख ७१ हजार ३१९ अधिक पैसे देण्यात आले. वाढीव बांधकामास कृषी पणन मंडळाची परवानगी नसल्याचे दिसून येते. आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत तुमसर व मोहाडी तालुक्यातील धान खरेदी केंद्रांना जोडून टोकण देणे, ताडपत्री पुरवठा करणे, शेतकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे, आर्द्रता मापकयंत्र पुरवठा करणे ही जबाबदारी बाजार समितीची आहे. धान्य खरेदी केंद्रांना गावे जोडताना वारंवार गावे जोडणे, मनमर्जीने परत जोडणे यामुळे शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. यावरून सदर बाजार समिती संचालक मंडळाने महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन मुंबई यांनी सोपवलेली जबाबदारी पार पाडण्यात कसूर करीत असल्याचे दिसून येत असल्याचे म्हटले आहे.