शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन महत्त्वाचे

By admin | Updated: June 19, 2017 00:39 IST

अनेक वर्षापासून रेंगाळलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलने केली जातात. हे आजवर पाहण्यात आले. मात्र तुमसर तालुक्यात चित्र वेगळेच आहे.

ठाकचंद मुंगुसमारे यांची माहिती : श्रेयासाठी केविलवाणी धडपड लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : अनेक वर्षापासून रेंगाळलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलने केली जातात. हे आजवर पाहण्यात आले. मात्र तुमसर तालुक्यात चित्र वेगळेच आहे. जी कामे अगोदरच झाले आहेत त्याच कामासाठी सत्तेत सहभागी असणारे आंदोलने करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार करीत आहे, अशी माहिती जिल्हा रायुकाँ कोषाध्यक्ष ठाकचंद मुंगुसमारे यांनी दिलीे. गत काही दिवसांपूर्वी तालुक्यातील नाकाडोंगरी येथे शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यात आष्टी जि.प. क्षेत्रातील झालेल्या कामांची परत मागणी करण्यात आली. जिल्ह्यात त्यांच्याच पक्षांचा पालकमंत्री असताना सहज कामे करता येत असताना यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. आंदोलने व्हायलाच पाहिजे. मात्र कोणती मागणी करायला पाहिजे वा कोणती नाही याचे भान असणे आवश्यक आहे. केवळ जनतेची दिशाभूल करून आपल्यामुळेच शक्य झाले असा सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरु आहे. आष्टी जि.प. क्षेत्रातील ज्या मागण्यांसाठी आंदोलने झाले. ते पाणी करसाठी झाले. परंतु या अगोदरच जि.प. सदस्या संगिता ठाकचंद मुंगुसमारे, संगीता सोनवाने, सभापती शुभांगी राहांगडाले यांच्या संयुक्त प्रयत्नाने जि.प. मध्ये ठराव घेवून शासनाकडून अनुदान मिळविण्यासाठी सन २०१५-२०१६ चे गोबरवाही प्रादेशिक नळ पाणी पुरवठाचे बिले हे १८०० रुपयाऐवजी १३२० रुपये प्रमाणे पाणी पट्टी कर घेण्यात आले. तसेच संपूर्ण जि.प. क्षेत्रात दर सोमवार एच.पी. गॅस ही सिहोरा येथील एजंसीकडून पुरविण्यात यते. पाथरी ते धुटेरा व लोभी ते चांदमारा रस्ता मंजुरीकरिता संगिता मुंगुसमारे यांनी क्षेत्राचे आमदार चरण वाघमारे यांच्याकडे सतत पाठपुरावा केले. आमदार वाघमारे यांनी त्या कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समाविष्ठ करून प्रस्ताव मंजुरीसाठी शासनास पाठविले आहे. ते लवकरच मंजूर होणार असल्याचे आश्वासन आ.वाघमारे यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे आष्टी ते आंजनबिहरी व धुटेरा ते पुलपुट्टा या दोन्ही ठिकाणी बावनथडी नदीवर पुल बांधण्यासंदर्भातही शासन दरबारी प्रस्ताव पाठविला आहे. हे सर्व असताना याच मुद्यांना उपस्थित करून आंदोलन केले गेले. शासनात हे सत्तेत सहभागी आहेत. मात्र शासनाचे सर्व यांचेच असताना या अगोदरच सर्व समस्या सोडवून घ्यायला पाहिजे होते. जे कामे झाले आहेत किंवा होण्याच्या मार्गावर असताना आंदोलनाचा पिल्लू बाहेर काढून ती कामे आम्हीच केली हे भासवून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. श्रेय जर लाटायचेच असतील तर आधी ते कार्य करून दाखवावे असा टोला ठाकचंद मुंगुसमारे यांनी लावला आहे.