शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन महत्त्वाचे

By admin | Updated: June 19, 2017 00:39 IST

अनेक वर्षापासून रेंगाळलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलने केली जातात. हे आजवर पाहण्यात आले. मात्र तुमसर तालुक्यात चित्र वेगळेच आहे.

ठाकचंद मुंगुसमारे यांची माहिती : श्रेयासाठी केविलवाणी धडपड लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : अनेक वर्षापासून रेंगाळलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलने केली जातात. हे आजवर पाहण्यात आले. मात्र तुमसर तालुक्यात चित्र वेगळेच आहे. जी कामे अगोदरच झाले आहेत त्याच कामासाठी सत्तेत सहभागी असणारे आंदोलने करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार करीत आहे, अशी माहिती जिल्हा रायुकाँ कोषाध्यक्ष ठाकचंद मुंगुसमारे यांनी दिलीे. गत काही दिवसांपूर्वी तालुक्यातील नाकाडोंगरी येथे शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यात आष्टी जि.प. क्षेत्रातील झालेल्या कामांची परत मागणी करण्यात आली. जिल्ह्यात त्यांच्याच पक्षांचा पालकमंत्री असताना सहज कामे करता येत असताना यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. आंदोलने व्हायलाच पाहिजे. मात्र कोणती मागणी करायला पाहिजे वा कोणती नाही याचे भान असणे आवश्यक आहे. केवळ जनतेची दिशाभूल करून आपल्यामुळेच शक्य झाले असा सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरु आहे. आष्टी जि.प. क्षेत्रातील ज्या मागण्यांसाठी आंदोलने झाले. ते पाणी करसाठी झाले. परंतु या अगोदरच जि.प. सदस्या संगिता ठाकचंद मुंगुसमारे, संगीता सोनवाने, सभापती शुभांगी राहांगडाले यांच्या संयुक्त प्रयत्नाने जि.प. मध्ये ठराव घेवून शासनाकडून अनुदान मिळविण्यासाठी सन २०१५-२०१६ चे गोबरवाही प्रादेशिक नळ पाणी पुरवठाचे बिले हे १८०० रुपयाऐवजी १३२० रुपये प्रमाणे पाणी पट्टी कर घेण्यात आले. तसेच संपूर्ण जि.प. क्षेत्रात दर सोमवार एच.पी. गॅस ही सिहोरा येथील एजंसीकडून पुरविण्यात यते. पाथरी ते धुटेरा व लोभी ते चांदमारा रस्ता मंजुरीकरिता संगिता मुंगुसमारे यांनी क्षेत्राचे आमदार चरण वाघमारे यांच्याकडे सतत पाठपुरावा केले. आमदार वाघमारे यांनी त्या कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समाविष्ठ करून प्रस्ताव मंजुरीसाठी शासनास पाठविले आहे. ते लवकरच मंजूर होणार असल्याचे आश्वासन आ.वाघमारे यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे आष्टी ते आंजनबिहरी व धुटेरा ते पुलपुट्टा या दोन्ही ठिकाणी बावनथडी नदीवर पुल बांधण्यासंदर्भातही शासन दरबारी प्रस्ताव पाठविला आहे. हे सर्व असताना याच मुद्यांना उपस्थित करून आंदोलन केले गेले. शासनात हे सत्तेत सहभागी आहेत. मात्र शासनाचे सर्व यांचेच असताना या अगोदरच सर्व समस्या सोडवून घ्यायला पाहिजे होते. जे कामे झाले आहेत किंवा होण्याच्या मार्गावर असताना आंदोलनाचा पिल्लू बाहेर काढून ती कामे आम्हीच केली हे भासवून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. श्रेय जर लाटायचेच असतील तर आधी ते कार्य करून दाखवावे असा टोला ठाकचंद मुंगुसमारे यांनी लावला आहे.