शहरं
Join us  
Trending Stories
1
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
2
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
3
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
4
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
5
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
6
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
7
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
8
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
9
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
10
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
11
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
12
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
13
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
14
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
15
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
16
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
17
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
18
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
19
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
20
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

समस्यांचा डोंगर वाढतोय

By admin | Updated: November 7, 2015 00:30 IST

भंडारा धान उत्पादक जिल्हा आहे. जिल्ह्यात पिकावरील रोगराईमुळे व दुष्काळीमुळे धानाचे पीक धोक्यात आलेले आहे.

दुर्लक्षित भंडारा : शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांच्या समस्या सोडविण्याची मागणीभंडारा : भंडारा धान उत्पादक जिल्हा आहे. जिल्ह्यात पिकावरील रोगराईमुळे व दुष्काळीमुळे धानाचे पीक धोक्यात आलेले आहे. नापीकी झालेली असून शेतकरी अत्यंत संकटात सापडलेला आहे. भंडारा जिल्हा बहुजन समाज पार्टीतर्फे जिल्ह्यातील जनतेच्या समस्येकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले. शेतकऱ्यांच्या शेत मालाला खर्चाचा आधारावर मालाचा दर ठरविण्याचा हक्क आहे. त्यामुळे धानाला योग्य भाव मिळावा, अशी अपेक्षा आहे. दिवाळी सणापुर्वी हलक्या धानाचे पीक निघत असल्याने शासनाने धानाचे आधारभूत खरेदी केंद्र त्वरीत सुरू करावे, जेणे करून शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करणे व दिवाळी सण साजरा करणे सोईचे होईल. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पात नाग नदीद्वारे नागपूर शहरातील घाण पाणी येत असल्यामुळे गोसीखुर्द प्रकल्प व वैनगंगा नदीचे पाणी दुषीत झाले आहे ते पिण्याजोगे राहीले नाही. त्यामुळे नदी काठावरील गावांना तसेच भंंडारा, जवाहरनगर शहरातील नागरिकांच्या आरोग्यास दुषित पाण्यामुळे धोका उत्पन्न झालेला आहे. पिण्याकरीता शुद्ध पाणी मिळावे हा नागरिकांचा मुलभूत हक्क आहे. करीता प्रकल्पातील दूषित पाणी शुद्ध करण्यासाठी उपाय योजना करावी तसेच नाग नदीचे पाणी शुद्धीकरण करूनच प्रकल्पात सोडावे.गोसीखुर्द प्रकल्पात भंडारा जिल्ह्यातील ३२ गावातील शेत जमीन व घरे गेली आहेत. प्रकल्प ग्रस्तांना अजुनही काही पुनर्वासित गावाठाणात भुखंंड मिळालेले नाही. भुखंड न मिळाल्याने त्यांना मिळालेले घराचे शेत जमीनीचे पॅकेजचे पैसे खर्च झालेले आहेत. त्यांचे समोर घर कसे बांधावे असा प्रश्न निर्माण झालेला आहे. लवकर भुखंडाचे वाटप करावे व घर बांधून देण्याची व्यवस्था करावी तसेच काही गावठाणात नागरी सुविधाची कामे अपूर्ण आहेत. ते पूर्ण करावे व पडझड झालेल्या जीर्ण झालेल्या नागरी सुविधांचे दुरूस्ती करण्यात यावी.गोसीखुर्द प्रकल्पाच्या जून २०१३ च्या पॅकेज रक्कमांचे वाटप २ वर्षांचा कालावधी संपूनही पूर्ण झालेले नाही लहान सहान कारणास्तव अनेक प्रकल्प ग्रस्तांचे पॅकेज मोबदला अडवून ठेवला आहे. त्यावर त्वरीत तोडगा काढून पॅकेज रक्कमांचे वाटप करावे, निधी अभावी गोसीखुर्द व बावणथडी प्रकल्पाचे काम रखडलेले आहे ते पूर्ण करावे, या प्रकल्पांतर्गत उपसा सिंचन योजना व जलविद्युत प्रकल्पाची बांधकामे तातडीने पुर्ण करावी, गोसीखुर्द प्रकल्पात घरे व शेती गेली त्याचा अत्यंत कमी भाव व मोबदला मिळाल्याने प्रकल्प ग्रस्तांची पॅकेज अंतर्गत पाच लक्ष रूपये व नौकरीची मागणी आहे. प्रकल्प ग्रस्तांना पॅकेज अंतर्गत २ लक्ष ९० हजार रूपये मिळाले. उर्वरित २ लक्ष १० हजार व नौकरीच्या मागणीची पुर्तता करावी, शेतकऱ्यांच्या विकास व हिताकरीता असलेला स्वामीनाथन आयोगाचा अहवाल ४ आॅक्टोबर २००६ मध्ये सादर करण्यात आला. तो त्वरीत लागु करण्यात यावा, भंडारा जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय, महिला इंजिनीअरींग कॉलेज व नवोदय विद्यालय नाही त्याचे त्वरीत बांधकाम करण्यात यावे, प्रकल्पात मोठ्या प्रमाणात शेतजमिनी व घरे गेल्यामुळे शेतकऱ्यांची मुले बेरोजगार झाली. जिल्ह्यातील तरूणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत असून नोकरीकरिता इतरत्र भटकत आहेत, कंत्राटी पद्धतीच्या नौकऱ्या होतकरू युवकांना अपंग करणाऱ्या, मानसिकता खुजी करणाऱ्या व आर्थिकता कुचंबना करणाऱ्या आहेत. कंत्राटी पद्धती बंद करून पूर्ण वेतनावर युवकांना नौकरी द्यावी, मागील २ वर्षापासून ओबीसी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली नाही ती त्वरीत देण्यात यावी, शासन मुली व महिलांना सर्वच क्षेत्रात पुढे आणण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याअनुषंगाने ओबीसी वर्गातील मुलींना शिक्षण व नोकरीत क्रिमीलेअरची अट रद्द करावी, आदी मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देताना बसपाचे जिल्हाध्यक्ष त्र्यंबक घरडे, संजय नासरे, यशवंत वैद्य, कृष्णा गजभिये, प्रिया शहारे, नरेंद्र रामटेके, मुकूंद चहांदे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)