शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील चुरीने वाहनधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 05:01 IST

धुळे ते कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने रस्त्यावर जड वाहनांची वर्दळ असते. एरवी रेल्वेने जाणारी जड वाहतूक कोरोना संसर्गामुळ ट्रेलर, ट्रकच्या सहाय्याने होत आहे. परिणामी दुरुस्ती झालेले खड्डे पुन्हा उघडे पडून मोठ्या आकाराचे खड्डे होत आहेत. यात नवीन खड्ड्यांची भर पडत आहे. मात्र खड्डे बुजविणे, उखडणे पुन्हा बुजविणे हेच सत्र किती वर्ष चालणार, रस्ता रुंदीकरण होणार की खासगी कंत्राटदाराचे दुरुस्तीच्या नावाखाली कंत्राट काढण्याचे काम सातत्याने सुरू आहे.

ठळक मुद्देअपघाताला निमंत्रण : खड्डे बुजविण्याची नागरिकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राष्ट्रीय महार्गावर संततधार पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. महामार्गावरील खरबी (नाका) ते मुजबी पर्यंत पावसामुळे रस्त्यावरील चुरी विखुरली असून रस्त्यावर खड्डे वाढल्याने अपघाताची भीती वाढली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.धुळे ते कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने रस्त्यावर जड वाहनांची वर्दळ असते. एरवी रेल्वेने जाणारी जड वाहतूक कोरोना संसर्गामुळ ट्रेलर, ट्रकच्या सहाय्याने होत आहे. परिणामी दुरुस्ती झालेले खड्डे पुन्हा उघडे पडून मोठ्या आकाराचे खड्डे होत आहेत. यात नवीन खड्ड्यांची भर पडत आहे. मात्र खड्डे बुजविणे, उखडणे पुन्हा बुजविणे हेच सत्र किती वर्ष चालणार, रस्ता रुंदीकरण होणार की खासगी कंत्राटदाराचे दुरुस्तीच्या नावाखाली कंत्राट काढण्याचे काम सातत्याने सुरू आहे. रस्त्यावरील खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांना खड्डे दिसत नाही. त्यामुळे अपघातात वाढ झाली आहे.राष्ट्रीय महामार्गावरील मुजबी ते भंडारा नाकापर्यंत मोठाले खड्डे पडल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांना वाहन चालविणे त्रासदायक झाले आहे. गत तीन दिवसापासून पाऊस पडल्याने ठिकठिकाणी अपघाताचा धोका वाढला आहे. खड्डे बुजविणे आवश्यक झाले असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधी लक्ष देण्याची मागणी ठाणा, खरबी येथील मदनपाल गोस्वामी, लोकेश चव्हाण, बादल मेहर, विशु पिंपळशेंडे, निखिल तिजारे, बाळू पडोळे यांनी एका निवेदनातून केली आहे.संततधार पावसाचा परिणामगत तीन दिवसांपासून परिसरात संततधार पाऊस पडत असल्याने नदीनाले ओसंडून वाहत आहेत. लॉकडाऊननंतर अनेक ठिकाणी असलेली बंदी उठविल्याने रस्त्यावरील वाहनांची वर्दळ वाढली आहे. परिणामी जड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्यावर खड्याचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावरील चुरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला साचल्याने दुचाकीधारकांना वाहन चालविणे कठीण होत आहे. त्यातच वाढलेल्या खड्यांमुळे अपघाताची भीती वाढली आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग