शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

मोरगाववासीयांचा तहसीलदारांसमोर ठिय्या आंदोलन

By admin | Updated: March 28, 2017 00:17 IST

धान्य घोटाळा संबंधी तालुका प्रसिद्ध आहे. आता तर धान्य दुकानदारांनी घोटाळ्याचा उच्चांक गाठला आहे.

‘त्या’ गावात मृत व्यक्तीही उचलतो शिधापत्रिकेवर धान्य : लग्नाविना झाली पत्नी, एकाच नावाने दोन कार्ड, अनेक बोगस कार्डमोहाडी : धान्य घोटाळा संबंधी तालुका प्रसिद्ध आहे. आता तर धान्य दुकानदारांनी घोटाळ्याचा उच्चांक गाठला आहे. मोरगाव येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानात एका वर्षापासून दोन मृत झालेले व्यक्ती शिधापत्रिकांवर धान्याची उचल करीत आहेत. तसेच काही काल्पनिक नावाच्या शिधापत्रिकाही तयार करण्यात आल्या आहेत. गावाची लोकसंख्याही वाढवून घेतली असल्याचे प्रकरण आज तहसील कार्यालयात मोरगाववासीयांनी लावून धरले. तहसीलदारासमोर ठिय्या आंदोलन झाले. अखेर तहसीलदारांनी नमते घेवून मोरगावचा धान्य दुकान मोहाडी येथे जोडला. तसेच तात्काळ चौकशी समिती गठीत करून आजच अहवाल सादर करण्याचे निर्देश तहसीलदार यांना दिले.मोहाडी नजीक असलेल्या मोरगाव येथे सरकारी स्वस्त धान्य दुकान आहे. महालगाव येथील मनिषा सिद्धार्थ रामटेके स्वस्त धान्य दुकान चालवितात. स्वस्त धान्य दुकान चालवितानी त्यांनी अनियमितता केली. यासंबंधी मोरगाव येथील काही व्यक्तींनी तहसील कार्यालयात माहिती अधिकार घातला. माहिती अधिकारातून तहसीलदारांनी माहिती दिशाभूल करणारी दिली. तिथूनच मोरगाव येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानात बऱ्याच भानगडी असल्याचा संशय बळावला. त्यानंतर ज्या काही बाबी उघडकीस आल्या. मोरगाव येथील गावाची लोकसंख्या ५९० आहे. पण शिधापत्रिकेच्या आकड्यात त्या गावची लोकसंख्या १०६९ असल्याचे दिसून आले. मोरगावात बीपीएल कार्डधारक १२६ त्यांची लोकसंख्या ६७५, अंत्योदय कार्डधारक ५६ लोकसंख्या ११०, एपिल कार्डधारक ७९ लोकसंख्या २७१, शुभ्र कार्डधारक ५ व लोकसंख्या १३ आहे. त्या गावात ४७९ अधिकची लोकसंख्या कुठून जुळवून घेण्यात आली. अंत्योदय मध्ये ५६ कार्डधारक आहेत म्हणजे एका कार्डामागे २ व्यक्ती येतात. ५६ शिधापत्रिकाधारकांमध्ये दोनच नावे म्हणजे कुटुंब प्रमुख व पती असेच समाविष्ट असतील तर त्या घरची मुले गेली कुठे? अंत्योदय ५६, बीपीएल १२६ यानुसार दरमहा धान्याची उचल केली जाते. प्रत्यक्षात १२ अंत्योदय व ६० बीपीएल शिधापत्रिकाधारकांना धान्य दिले जाते. उर्वरीत धान्य कुठे जातो असा सवाल गावकऱ्यांनी केला आहे. मोरगावात एकाच व्यक्तीची डी - १ मध्ये २ ते ३ वेळा नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. पती पत्नीचे वेगवेगळे शिधापत्रिकाही तयार करण्यात आल्या आहेत. डी-१ मध्ये गोरखनाथ भुते, सोमाबाई नत्थू शेंडे, शिवराम सोमा अतकरी, मिराबाई श्रीकृष्ण बोरकर, सरस्वता धनराज शेंडे, सुशिला बाजीराव डोंगरे अशी काल्पनिक असलेल्या नावाच्या शिधापत्रिका तयार करून धान्याची उचल केली गेली. एवढेच नाही तर एका वर्षापूर्वी हरिभाऊ मुका बोरकर, सारुबाई दलपत भोयर यांचे मृत्यू झाले आहे. या मृत व्यक्तींचीही नावे डी - १ मध्ये समाविष्ठ आहेत. एवढेच नाही तर त्या मृत व्यक्तींच्या नावे दर महिन्याकाठी धान्याची उचल केली जाते. वडीलांचे नाव बीपीएलमध्ये तर कुमारिका असलेली सरिता हारगुळे हिचे नाव राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत घालण्यात आले आहे. यापुढे जावून सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांनी लग्नापूर्वीच एका रेशमा नावाच्या मुलीला पत्नी बनवून रवी ढबाले यांचे शिधापत्रिकात लग्न लावून दिले. त्यानुसार धान्याची उचलही केली गेली. अंत्योदय योजना व राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत या दोन्ही योजनेत जकुबाई बळीराम भुते, सकुबाई शामराव भुते, कामुना सोमा भुते या महिलांची नावे समाविष्ट आहेत. पण आपले नाव त्या योजनेत आहे. याचा थांगपत्ताही महिलांना नाही. या तक्रारी संबंधात मोरगाववासीयांनी तहसीलदार धनंजय देशमुख यांच्या दालनात घेराव घातला होता. प्रारंभी ३ मार्च रोजी या समस्यांची चौकशी करून माहिती देण्यात येईल असे तहसीलदार धनंजय देशमुख यांनी सांगितले. वेळ मारून नेण्याचा बेत मात्र मोरगाववासीयांनी हाणून पाडला. तात्काळ दुकान काढून घ्या, चौकशी करा या मागणीसाठी महिलांसह पुरुषांनी तहसीलदाराच्या दालनातच ठिय्या मांडला. अखेर गावकऱ्यांचा रोष व संताप अनावर होताच. तहसीलदार व त्याच्या प्रशासनातील कारकून यांनी चर्चा करण्यासाठी वेळ मागितली. अखेर मोहाडी येथील राजू बावणे यांच्या दुकानाला मोरगावची दुकान जोडण्याचे घोषित केले. तसेच तात्काळ चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर प्रकरण थंड झाले. गावकरी आपल्या गावी परतले ते चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांना घेऊनच. वृत्त लिहिपर्यंत मोरगाव येथील स्वस्त धान्य दुकानाची चौकशी सुरु होती. तहसीलदार यांनी नायब तहसीलदार हरिभाऊ थोटे, अन्न निरीक्षक राहुल वानखेडे, सागर बावरे व कोतवाल चंदन नंदनवार यांची चौकशी समिती नेमली. तात्काळ चौकशीला जावून अहवाल आजच सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.बनावट शिधापत्रिका तहसीलमधून तयार करण्यात आल्या आहेत. असा आरोप करून अन्न विभागातील कारकुनांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)तहसीलदार भडकलेगावकऱ्यांनी तेच तेच प्रश्न विचारून तहसीलदाराचे डोके फिरविले. त्यामुळे तहसीलदार देशमुख भडकले. त्याला प्रतिउत्तर गावकऱ्यांनी चिडून जावून दिले. आमचा आवाज दाबता काय? असा प्रश्न विचारून गोंधळ घातला. थोडावेळ तहसीलदारांच्या दालनात काय झाले म्हणून अनेकांनी तिथे धाव घेतली होती.प्रकरणात कोणालाही पाठीशी घालणार नाही. नियमानुसार तीन दिवसात चौकशी होवून स्वस्त दुकानदार दोषी आढळला तर कठोर कारवाई करू.-धनंजय देशमुख, तहसीलदार, मोहाडी.