शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
6
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
7
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
8
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
9
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
10
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
11
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
12
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
13
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
14
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
17
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
18
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
19
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
20
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...

कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू ग्रामीण भागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:37 IST

जिल्ह्यात आतापर्यंत ९५१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात भंडारा तालुक्यातील ४५२, मोहाडी तालुक्यातील ८८, तुमसर तालुक्यातील १०५, पवनी तालुक्यातील ...

जिल्ह्यात आतापर्यंत ९५१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात भंडारा तालुक्यातील ४५२, मोहाडी तालुक्यातील ८८, तुमसर तालुक्यातील १०५, पवनी तालुक्यातील ९८, लाखनी तालुक्यातील ७८, साकोली तालुक्यातील ८८ आणि लाखांदूर तालुक्यातील ४२ व्यक्तींचा समावेश आहे. यात शहर भागातील ३७४ आणि ग्रामीण भागातील ३७७ व्यक्तींचा समावेश आहे. सध्या गावागावांत कोरोना लसीकरण सुरू आहे; परंतु ग्रामीण जनता अफवांना बळी पडून लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे दिसत आहे.

बॉक्स

सर्वाधिक मृत्यू ६१ ते ७० वयोगटातील

जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू ६१ ते ७० वयोगटातील नागरिकांचे झाले आहे. या वयोगटातील २७७ जणांचा मृत्यू झाला. त्या खालोखाल ५१ ते ६० वयोगटातील २७३ जणांचा मृत्यू झाला. शून्य ते १० वयोगटात दोन, ११ ते २० वयोगटात दोन, २१ ते ३० वयोगटात २१, ३१ ते ४० वयोगटात ७७, ४१ ते ५० वयोगटात १६४, ७१ ते ८० वयोगटात १०७ आणि ८० च्या वरील २८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. विशेष म्हणजे महिलांपेक्षा मृतांमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक आहे.

बॉक्स

शहरातील व्यक्ती लसीकरणासाठी खेड्यात

शहरी भागातील लसीकरण केंद्रांवर गर्दी असल्याने अनेक जण आता गावखेड्यात लसीकरणासाठी जात असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. ग्रामीण भागात लसीकरण मोहीम सुरू केली आहे; परंतु जनतेचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे तेथे आलेल्या कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते. ही बाब शहरी व्यक्तींच्या लक्षात येताच त्यांनी आता लसीकरणासाठी ग्रामीण भागाकडे मोर्चा वळविला आहे. शहरी भागातील नागरिकांना लसीचे महत्त्व समजल्याने ते तत्काळ लस घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तर ग्रामीण भागात लसीकरणासाठी मनधरणी करूनही कुणी लस घेत नाही. नागरिकांनी लस घेण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.