शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू ग्रामीण भागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:37 IST

जिल्ह्यात आतापर्यंत ९५१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात भंडारा तालुक्यातील ४५२, मोहाडी तालुक्यातील ८८, तुमसर तालुक्यातील १०५, पवनी तालुक्यातील ...

जिल्ह्यात आतापर्यंत ९५१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात भंडारा तालुक्यातील ४५२, मोहाडी तालुक्यातील ८८, तुमसर तालुक्यातील १०५, पवनी तालुक्यातील ९८, लाखनी तालुक्यातील ७८, साकोली तालुक्यातील ८८ आणि लाखांदूर तालुक्यातील ४२ व्यक्तींचा समावेश आहे. यात शहर भागातील ३७४ आणि ग्रामीण भागातील ३७७ व्यक्तींचा समावेश आहे. सध्या गावागावांत कोरोना लसीकरण सुरू आहे; परंतु ग्रामीण जनता अफवांना बळी पडून लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे दिसत आहे.

बॉक्स

सर्वाधिक मृत्यू ६१ ते ७० वयोगटातील

जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू ६१ ते ७० वयोगटातील नागरिकांचे झाले आहे. या वयोगटातील २७७ जणांचा मृत्यू झाला. त्या खालोखाल ५१ ते ६० वयोगटातील २७३ जणांचा मृत्यू झाला. शून्य ते १० वयोगटात दोन, ११ ते २० वयोगटात दोन, २१ ते ३० वयोगटात २१, ३१ ते ४० वयोगटात ७७, ४१ ते ५० वयोगटात १६४, ७१ ते ८० वयोगटात १०७ आणि ८० च्या वरील २८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. विशेष म्हणजे महिलांपेक्षा मृतांमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक आहे.

बॉक्स

शहरातील व्यक्ती लसीकरणासाठी खेड्यात

शहरी भागातील लसीकरण केंद्रांवर गर्दी असल्याने अनेक जण आता गावखेड्यात लसीकरणासाठी जात असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. ग्रामीण भागात लसीकरण मोहीम सुरू केली आहे; परंतु जनतेचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे तेथे आलेल्या कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते. ही बाब शहरी व्यक्तींच्या लक्षात येताच त्यांनी आता लसीकरणासाठी ग्रामीण भागाकडे मोर्चा वळविला आहे. शहरी भागातील नागरिकांना लसीचे महत्त्व समजल्याने ते तत्काळ लस घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तर ग्रामीण भागात लसीकरणासाठी मनधरणी करूनही कुणी लस घेत नाही. नागरिकांनी लस घेण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.