शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

घडाईपेक्षा मढाईच अधिक

By admin | Updated: November 24, 2015 00:39 IST

अड्याळमध्ये कधी नव्हे इतक्या प्रमाणात धान पिकावर किडीने आक्रमण केले.

व्यथा शेतकऱ्यांची : बळीराजा सापडला आर्थिक संकटात विशाल रणदिवेअड्याळअड्याळमध्ये कधी नव्हे इतक्या प्रमाणात धान पिकावर किडीने आक्रमण केले. हातचे पिक जाऊ नये, यासाठी येथील शेतकऱ्यांनी तन मन धन पणाला लावले तरीही पालथ्या घागरीवर पाणी पडल्यासारखे शेवटी डोळ्यात भरणारे पिक अश्रू देऊन गेला. अड्याळमध्ये कुणाला एकरी २ पोते, ५ पोते आलेच तरी सुधारित पैसेवारी ६५ पैसे दाखविली आहे. ५० टक्क्यापेक्षा कमी पैसेवारी असलेल्या जिल्ह्यांना दुष्काळाचे लाभ देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त यादीतून बेपत्ता आहे. अड्याळ गावाची सुधारित पैसेवारी ६५ ठळक अक्षरात दाखविली आहे. पैसेवारीचे आकडे गावातील पिक परिस्थिती समाधानकारक असल्याचे सांगत असले तरी वास्तव मात्र वेगळेच आहे. आजही आणेवारी काढण्याची पद्धत जुनीच आहे. त्यामुळे खरे चित्र कागदावर दिसत नाही. अड्याळमध्ये दर्शविलेल्या पैसेवारीनुसार पिकपरिस्थितीनुसार शेतकऱ्यांची ओरड सुरूच आहे परंतु या हाकेला धावणारे नेतृत्व करणारे उपलब्ध होत नसल्याने येथील शेतकरी नुसता गरजत आहे परंतु बरसला नाही. पिक परिस्थिती समाधानकारक असती तर एवढी ओरड खरचं असती का त्यामुळे सरकारी यंत्रणा खरच किती गंभीर आहे यावरून लक्षात येते.धान उत्पादकांचा खंबीर वालीच शोधूनही सापडत नसल्यामुळे येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. धान उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध सोयी सवलती पदरात पाडून धानाला उत्पादन खचाृवर आधारित भाव मिळण्यासाठी शासनदरबारी भांडणाच्या दमदार नेतृत्वाची आज गरज आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात सत्ताधारी पक्ष नेते मंडळींनी शेतकरी हिताची ग्वाही दिली. आज इथे यायला शेतकऱ्यांची अवस्था जाणून घ्यायलाही या लोकप्रतिनिधींकडे वेळ नाही. किडीने शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिरावला आहे. कधी ओला तर कधी कोरडा, रोगराई आणि सिंचनाची सोय नसल्याने अनेकदा शेतकऱ्यांना पिक घेताना सामोरे जावे लागत आहे. यावर शासनाने वेळीच उपाययोजना करून त्यांना आर्थिक मोबदला द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.