शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

घडाईपेक्षा मढाईच अधिक

By admin | Updated: November 24, 2015 00:39 IST

अड्याळमध्ये कधी नव्हे इतक्या प्रमाणात धान पिकावर किडीने आक्रमण केले.

व्यथा शेतकऱ्यांची : बळीराजा सापडला आर्थिक संकटात विशाल रणदिवेअड्याळअड्याळमध्ये कधी नव्हे इतक्या प्रमाणात धान पिकावर किडीने आक्रमण केले. हातचे पिक जाऊ नये, यासाठी येथील शेतकऱ्यांनी तन मन धन पणाला लावले तरीही पालथ्या घागरीवर पाणी पडल्यासारखे शेवटी डोळ्यात भरणारे पिक अश्रू देऊन गेला. अड्याळमध्ये कुणाला एकरी २ पोते, ५ पोते आलेच तरी सुधारित पैसेवारी ६५ पैसे दाखविली आहे. ५० टक्क्यापेक्षा कमी पैसेवारी असलेल्या जिल्ह्यांना दुष्काळाचे लाभ देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त यादीतून बेपत्ता आहे. अड्याळ गावाची सुधारित पैसेवारी ६५ ठळक अक्षरात दाखविली आहे. पैसेवारीचे आकडे गावातील पिक परिस्थिती समाधानकारक असल्याचे सांगत असले तरी वास्तव मात्र वेगळेच आहे. आजही आणेवारी काढण्याची पद्धत जुनीच आहे. त्यामुळे खरे चित्र कागदावर दिसत नाही. अड्याळमध्ये दर्शविलेल्या पैसेवारीनुसार पिकपरिस्थितीनुसार शेतकऱ्यांची ओरड सुरूच आहे परंतु या हाकेला धावणारे नेतृत्व करणारे उपलब्ध होत नसल्याने येथील शेतकरी नुसता गरजत आहे परंतु बरसला नाही. पिक परिस्थिती समाधानकारक असती तर एवढी ओरड खरचं असती का त्यामुळे सरकारी यंत्रणा खरच किती गंभीर आहे यावरून लक्षात येते.धान उत्पादकांचा खंबीर वालीच शोधूनही सापडत नसल्यामुळे येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. धान उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध सोयी सवलती पदरात पाडून धानाला उत्पादन खचाृवर आधारित भाव मिळण्यासाठी शासनदरबारी भांडणाच्या दमदार नेतृत्वाची आज गरज आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात सत्ताधारी पक्ष नेते मंडळींनी शेतकरी हिताची ग्वाही दिली. आज इथे यायला शेतकऱ्यांची अवस्था जाणून घ्यायलाही या लोकप्रतिनिधींकडे वेळ नाही. किडीने शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिरावला आहे. कधी ओला तर कधी कोरडा, रोगराई आणि सिंचनाची सोय नसल्याने अनेकदा शेतकऱ्यांना पिक घेताना सामोरे जावे लागत आहे. यावर शासनाने वेळीच उपाययोजना करून त्यांना आर्थिक मोबदला द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.