शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

महिनाभरापासून मंडळ कृषी कार्यालय कुलूपबंद

By admin | Updated: September 4, 2015 00:16 IST

सिहोरा येथील लघु पाटबंधारे विभागाच्या रिकाम्या वसाहतीत मंडळ कृषी कार्यालयाचे महिनाभरापुर्वी स्थानांतरण करण्यात आले असले तरी, ...

भाडेतत्वाची आडकाठी : आधी कार्यालयाचे स्थानांतरण करा, नंतरच भाडे निश्चिती प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणीरंजित चिंचखेडे चुल्हाडसिहोरा येथील लघु पाटबंधारे विभागाच्या रिकाम्या वसाहतीत मंडळ कृषी कार्यालयाचे महिनाभरापुर्वी स्थानांतरण करण्यात आले असले तरी, कार्यालय कुलूप बंद असल्याने शेतकऱ्यांची वाताहत सुरू झाली आहे.सिहोरा परिसरात चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप करण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाची निर्मिर्ती करण्यात आली आहे. या विभागात कर्मचाऱ्यांचे वास्तव्यासाठी वसाहतीचे बांधकाम करण्यात आले आहे. भंगारात तथा वसाहत जीर्ण होण्यापेक्षा या इमारतीचा उपयोग शेतकऱ्यांच्या हितासाठी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी आ. चरण वाघमारे यांना केली होती. त्याप्रमाणे जागा आणि इमारतअभावी सिहोऱ्याचा मंडळ कृषी कार्यालयाचा प्रशासकीय कारभार ७ कि़मी. अंतरावरील हरदोली गावातून होत असल्याने या कार्यालयाचे स्थानांतरण रिकाम्या वसाहतीत करण्याचे नियोजन तयार केले गेले. पाटबंधारे आणि कृषी विभाग राज्य शासनाच्या अखत्यारीत असल्याने स्थानांतरणात आडकाठी येणार नाही, अशी खबरदारी घेण्यात आली.पाटबंधारे विभागाच्या वसाहतीत एका खोलीला प्रशासकीय कामकाज करिता कृषी विभागाने रंगरंगोटी तथा स्वच्छता केली. १ जुलैला आ. चरण वाघमारे यांचे हस्ते या वसाहतीत मंडळ कृषी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. सिहोरा गावात कृषी कार्यालयाचे स्थानांतरण झाल्याचा परिसरात गवगवा करण्यात आला. पाणलोट योजनेच्या अध्यक्ष आणि सचिवांनी ही आनंदाची माहिती गावा ंगावात पेरली. या माहितीने शेतकरी सुखावला असता पाटबंधारे विभागाने 'ये तेरा घर, ये मेरा घर'चा फार्मूला उपस्थित केला. दुपारी १२ वाजता कार्यालयाचे उद्घाटन झाले असता सायंकाळी ५ वाजता पाटबंधारे विभागाने स्वत:चे कुलूप मंडळ कृषी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीला ठोकले. भाडे तत्वाचे कारण पुढे करण्यात आले. यामुळे गेल्या महिनाभरापासून कागदी घोडे नाचविले जात आहेत. या खोल्याचे भाडे आता सार्वजनिक बांधकाम विभाग ठरविणार आहे. तिन्ही विभागात कागदोपत्री देवाण घेवाण सुरू झाली आहे. जिल्हास्तरावर असे पत्रव्यवहार केले जाणार असल्याची माहिती तिन्ही विभागाची यंत्रणा सांगत सुटली आहे. परंतु या पत्रव्यवहार आणि स्थानांतरणाला अनेक महिण्याचा कालावधी लागणार असल्याचे सुतोवाच करण्यात येत आहे. यामुळे शेतकरी तिघांच्या भांडणात अडकला आहे. सिहोऱ्यात मंडळ कृषी कार्यालय असल्याचे कारणावरून शेतकरी याच ठिकाणी महत्वपूर्ण कार्यायासाठी धाव घेत आहेत. परंतु कार्यालय सदैव कुलूप दिसत असल्याने माघारी परतत आहेत. पुन्हा नंतर हरदोली गावाला गाठावे लागत आहे. दुहेरी त्रास आता सोसण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. आधी मंडळ कृषी कार्यालयाचे स्थानांतरण करा. नंतर भाडे निश्चित करणारी प्रक्रिया पूर्ण करा, असा सूर परिसरात आहे. परंतु यात यंत्रणा भांडण करण्याचे स्थितीत नाही. स्थानांतरणाचे आ. वाघमारे यांचे निर्देश असतानाही भाडे तत्वाची आडकाठी आडवी आली आहे. दरम्यान शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे सुरू झाल्याने विरोधकानी उद्घाटनाचा फार्स करण्यात आल्याची कुजबूज सुरू केली आहे. यामुळे परिसरात राजकीय वातारण तापू लागले आहे.