शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ग्रामीण भागात जंगलातील रानभाज्यांना आला बहर; औषधी गुणधर्मामुळे शहरांमध्येही मोठी मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2022 17:35 IST

रानभाज्यांना ग्रामीण भागासह शहरांमध्येही मोठी मागणी आहे. पावसाळा सुरू होताच रानभाज्या येण्याचे प्रमाणही वाढले आहे.

ठळक मुद्देइतर भाज्यांच्या तुलनेत पौष्टिक: आरोग्यासाठी हितकारक, चविष्ट

किटाडी (भंडारा) : पावसाळा सुरू झाला आहे. हिरवाईने बहरलेल्या ग्रामीण भागातील जंगलातील विविध आरोग्यदायी, पौष्टिक, औषधीयुक्त, गुणकारी, चविष्ट रानभाज्यांना बहर आला आहे. सध्या जंगलातील वृक्षवेलींना नवीन पालवी फुटत आहे. या नवीन पालवीसोबतच रानभाज्यांचा हंगामही सुरू झाला आहे. रानभाज्यांमध्ये प्रामुख्याने कुड्याच्या फुलांचा समावेश असतो.

लाखनी तालुक्यातील किटाडी येथील जंगल शिवारात पावसाळ्यात हिरव्यागार, कोवळ्या, लुसलुशीत पालवीमध्ये हरदपरीची भाजी व कुड्याच्या झाडांना उमलणारी पांढरी शुभ्र फुले लक्ष वेधून घेत आहेत. नैसर्गिक बहुगुणी असलेल्या कुड्याच्या फुलांची चव थोडी कडवट व तुरट असली तरीही मानवी आरोग्यासाठी बहुउपयोगी असून फायदेशीर आहे. सध्या स्वयंपाकघरातून रानभाज्यांचा सुगंध दरवळत आहे.

निसर्गात उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यास मदत होते. आजच्या यांत्रिक युगात विविध रासायनिक खतांचा वापर करून शेतात हिरव्या भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. मात्र, रानभाजी जंगलात नैसर्गिकरित्या आपोआप उपलब्ध होत असल्याने रासायनिक खतांचा त्यात लवलेशही नसतो. रानभाज्यांना ग्रामीण भागासह शहरांमध्येही मोठी मागणी आहे. पावसाळा सुरू होताच रानभाज्या येण्याचे प्रमाणही वाढले आहे.

सुकवून ठेवली जातात कुड्याची फुले

ग्रामीण भागात रानभाज्यांचा हंगाम सुरू झाला की महिला वर्ग घोळक्याने जंगलात कुड्याची फुले तोडण्यासाठी जातात. पांढरी शुभ्र दिसणारी कुड्याची फुले कष्टाने तोडून घरी आणली जातात. त्यानंतर कुड्याची फुले व कळ्या व्यवस्थित खुडून साफ केली जातात व त्यांना परड्यावर किंवा कापडावर पसरवून उन्हात सुकविली जातात. आवडी-निवडीनुसार आवश्यकता वाटल्यास सुकविलेल्या कुड्याच्या फुलांची भाजी बनवितात.

बांधांवरील रानभाज्या गायब

पूर्वी पावसाळ्यात बांधात व धुऱ्यावर अनेक प्रकारच्या हिरव्यागार भाज्या उगवत होत्या. मात्र, अलीकडे शेतात किंवा धुऱ्यावर केरकचरा वाढू नये, यासाठी रासायनिक तणनाशक औषधींची फवारणी करतात. परिणामी, आहारातील हिरव्या भाज्या उगविण्याच्या अगोदरच नष्ट होत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीSocialसामाजिकbhandara-acभंडारा