शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात जंगलातील रानभाज्यांना आला बहर; औषधी गुणधर्मामुळे शहरांमध्येही मोठी मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2022 17:35 IST

रानभाज्यांना ग्रामीण भागासह शहरांमध्येही मोठी मागणी आहे. पावसाळा सुरू होताच रानभाज्या येण्याचे प्रमाणही वाढले आहे.

ठळक मुद्देइतर भाज्यांच्या तुलनेत पौष्टिक: आरोग्यासाठी हितकारक, चविष्ट

किटाडी (भंडारा) : पावसाळा सुरू झाला आहे. हिरवाईने बहरलेल्या ग्रामीण भागातील जंगलातील विविध आरोग्यदायी, पौष्टिक, औषधीयुक्त, गुणकारी, चविष्ट रानभाज्यांना बहर आला आहे. सध्या जंगलातील वृक्षवेलींना नवीन पालवी फुटत आहे. या नवीन पालवीसोबतच रानभाज्यांचा हंगामही सुरू झाला आहे. रानभाज्यांमध्ये प्रामुख्याने कुड्याच्या फुलांचा समावेश असतो.

लाखनी तालुक्यातील किटाडी येथील जंगल शिवारात पावसाळ्यात हिरव्यागार, कोवळ्या, लुसलुशीत पालवीमध्ये हरदपरीची भाजी व कुड्याच्या झाडांना उमलणारी पांढरी शुभ्र फुले लक्ष वेधून घेत आहेत. नैसर्गिक बहुगुणी असलेल्या कुड्याच्या फुलांची चव थोडी कडवट व तुरट असली तरीही मानवी आरोग्यासाठी बहुउपयोगी असून फायदेशीर आहे. सध्या स्वयंपाकघरातून रानभाज्यांचा सुगंध दरवळत आहे.

निसर्गात उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यास मदत होते. आजच्या यांत्रिक युगात विविध रासायनिक खतांचा वापर करून शेतात हिरव्या भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. मात्र, रानभाजी जंगलात नैसर्गिकरित्या आपोआप उपलब्ध होत असल्याने रासायनिक खतांचा त्यात लवलेशही नसतो. रानभाज्यांना ग्रामीण भागासह शहरांमध्येही मोठी मागणी आहे. पावसाळा सुरू होताच रानभाज्या येण्याचे प्रमाणही वाढले आहे.

सुकवून ठेवली जातात कुड्याची फुले

ग्रामीण भागात रानभाज्यांचा हंगाम सुरू झाला की महिला वर्ग घोळक्याने जंगलात कुड्याची फुले तोडण्यासाठी जातात. पांढरी शुभ्र दिसणारी कुड्याची फुले कष्टाने तोडून घरी आणली जातात. त्यानंतर कुड्याची फुले व कळ्या व्यवस्थित खुडून साफ केली जातात व त्यांना परड्यावर किंवा कापडावर पसरवून उन्हात सुकविली जातात. आवडी-निवडीनुसार आवश्यकता वाटल्यास सुकविलेल्या कुड्याच्या फुलांची भाजी बनवितात.

बांधांवरील रानभाज्या गायब

पूर्वी पावसाळ्यात बांधात व धुऱ्यावर अनेक प्रकारच्या हिरव्यागार भाज्या उगवत होत्या. मात्र, अलीकडे शेतात किंवा धुऱ्यावर केरकचरा वाढू नये, यासाठी रासायनिक तणनाशक औषधींची फवारणी करतात. परिणामी, आहारातील हिरव्या भाज्या उगविण्याच्या अगोदरच नष्ट होत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीSocialसामाजिकbhandara-acभंडारा