शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात जंगलातील रानभाज्यांना आला बहर; औषधी गुणधर्मामुळे शहरांमध्येही मोठी मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2022 17:35 IST

रानभाज्यांना ग्रामीण भागासह शहरांमध्येही मोठी मागणी आहे. पावसाळा सुरू होताच रानभाज्या येण्याचे प्रमाणही वाढले आहे.

ठळक मुद्देइतर भाज्यांच्या तुलनेत पौष्टिक: आरोग्यासाठी हितकारक, चविष्ट

किटाडी (भंडारा) : पावसाळा सुरू झाला आहे. हिरवाईने बहरलेल्या ग्रामीण भागातील जंगलातील विविध आरोग्यदायी, पौष्टिक, औषधीयुक्त, गुणकारी, चविष्ट रानभाज्यांना बहर आला आहे. सध्या जंगलातील वृक्षवेलींना नवीन पालवी फुटत आहे. या नवीन पालवीसोबतच रानभाज्यांचा हंगामही सुरू झाला आहे. रानभाज्यांमध्ये प्रामुख्याने कुड्याच्या फुलांचा समावेश असतो.

लाखनी तालुक्यातील किटाडी येथील जंगल शिवारात पावसाळ्यात हिरव्यागार, कोवळ्या, लुसलुशीत पालवीमध्ये हरदपरीची भाजी व कुड्याच्या झाडांना उमलणारी पांढरी शुभ्र फुले लक्ष वेधून घेत आहेत. नैसर्गिक बहुगुणी असलेल्या कुड्याच्या फुलांची चव थोडी कडवट व तुरट असली तरीही मानवी आरोग्यासाठी बहुउपयोगी असून फायदेशीर आहे. सध्या स्वयंपाकघरातून रानभाज्यांचा सुगंध दरवळत आहे.

निसर्गात उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यास मदत होते. आजच्या यांत्रिक युगात विविध रासायनिक खतांचा वापर करून शेतात हिरव्या भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. मात्र, रानभाजी जंगलात नैसर्गिकरित्या आपोआप उपलब्ध होत असल्याने रासायनिक खतांचा त्यात लवलेशही नसतो. रानभाज्यांना ग्रामीण भागासह शहरांमध्येही मोठी मागणी आहे. पावसाळा सुरू होताच रानभाज्या येण्याचे प्रमाणही वाढले आहे.

सुकवून ठेवली जातात कुड्याची फुले

ग्रामीण भागात रानभाज्यांचा हंगाम सुरू झाला की महिला वर्ग घोळक्याने जंगलात कुड्याची फुले तोडण्यासाठी जातात. पांढरी शुभ्र दिसणारी कुड्याची फुले कष्टाने तोडून घरी आणली जातात. त्यानंतर कुड्याची फुले व कळ्या व्यवस्थित खुडून साफ केली जातात व त्यांना परड्यावर किंवा कापडावर पसरवून उन्हात सुकविली जातात. आवडी-निवडीनुसार आवश्यकता वाटल्यास सुकविलेल्या कुड्याच्या फुलांची भाजी बनवितात.

बांधांवरील रानभाज्या गायब

पूर्वी पावसाळ्यात बांधात व धुऱ्यावर अनेक प्रकारच्या हिरव्यागार भाज्या उगवत होत्या. मात्र, अलीकडे शेतात किंवा धुऱ्यावर केरकचरा वाढू नये, यासाठी रासायनिक तणनाशक औषधींची फवारणी करतात. परिणामी, आहारातील हिरव्या भाज्या उगविण्याच्या अगोदरच नष्ट होत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीSocialसामाजिकbhandara-acभंडारा