लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : उन्हाळा आला की वर्षानुवर्षे पाणीटंचाईचा सामना मोहाडीकरांना करावा लागायचा. दोन - तीन दिवसाआड नळाला पाणी यायचे. पाण्यासाठी भटकंती करावी लागायची. मात्र नगरपंचायतीने आता मोहगाव देवी पुलाजवळ बंधारा बांधून हा पाणी प्रश्न सोडविला. पेंचचे पाणी त्यात अडविले जाणार असल्याने गुरवारपासून नागरिकांना मुबलक पाणी मिळणार आहे.मोहाडी शहराची नळयोजना पूर्वीच्या लोकसंख्येनुसार सूर नदीवर तयार करण्यात आली. आता लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नव्हते. परंतु दुसरा मार्ग नसल्याने त्यावरच तहान भागविली जात होती. त्यातच सूर नदी डिसेंबर महिन्यापासूनच कोरडी पडते. त्यामुळे नळ योजनेच्या विहिरीला पाणी उपलब्ध होत नाही. नागरिकांना दोन-तीन दिवसाआड पाणी मिळते. यावर उपाय करण्यासाठी मोहाडी नगरपंचायतीने पेंच प्रकल्पाचे पाणी सूर नदीत सोडण्याची मागणी केली. नगराध्यक्ष गीता बोकडे व उपाध्यक्ष सुनील गिºहेपुंजे यांनी वारंवार पाठपुरावा केला. अखेर जिल्हा प्रशासन अधिकारी सुधीर गवळी यांनी लक्ष घातले आणि शेवटी पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आले. सदर पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधण्यात आला. यामुळे मोहाडीची पाणीटंचाई संपुष्टात येईल.युद्धपातळीवर बांधला बंधारातीन दिवसापूर्वी पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आले. नगरपंचायतीला पत्र प्राप्त होताच युद्ध पातळीवर बंधारा बांधण्यात आला. १२ फुट उंच, २० फुट रुंद आणि २६० फुट लांब पाळीवर पॉलीथीन व ग्रीन शेड नेटचा वापर करून हा बंधारा बांधण्यात आला आहे.
मोहाडीवासीयांना आता मिळणार मुबलक पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 05:00 IST
मोहाडी शहराची नळयोजना पूर्वीच्या लोकसंख्येनुसार सूर नदीवर तयार करण्यात आली. आता लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नव्हते. परंतु दुसरा मार्ग नसल्याने त्यावरच तहान भागविली जात होती. त्यातच सूर नदी डिसेंबर महिन्यापासूनच कोरडी पडते. त्यामुळे नळ योजनेच्या विहिरीला पाणी उपलब्ध होत नाही. नागरिकांना दोन-तीन दिवसाआड पाणी मिळते.
मोहाडीवासीयांना आता मिळणार मुबलक पाणी
ठळक मुद्देसूर नदीत बंधारा : नागरिकांची भटकंती थांबणार, नगरपंचायतीचा पुढाकार