शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

मोदींनी केली शेतकऱ्यांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 22:45 IST

मागील लोकसभा पोटनिवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन सत्ता काबीज केली. सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांची अवस्था दयनीय केली. कोणत्याही शेतमालाला भाव नाही. त्यामुळे अधिक उत्पन्न मिळवूनही शेतकरी आर्थिक टंचाईत सापडला आहे.

ठळक मुद्देराजू शेट्टी : साकोलीत शेतकरी संघटनेची एल्गार सभा

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : मागील लोकसभा पोटनिवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन सत्ता काबीज केली. सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांची अवस्था दयनीय केली. कोणत्याही शेतमालाला भाव नाही. त्यामुळे अधिक उत्पन्न मिळवूनही शेतकरी आर्थिक टंचाईत सापडला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. याला मोदी सरकार जबाबदार आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी केला.स्थानिक होमगार्ड परेड ग्राऊंडवर शेतकरी संघटनेच्या एल्गार सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर शेतकरी संघटनेचे नेते चंद्रकांत वानखडे, गजानन अहमदाबादकर, उत्तमराव पोपळे, जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार, अ‍ॅड.जांभुळे, सुशिला मोराडे, माजी आमदार सेवक वाघाये, सदाशिव वलथरे, अविनाश ब्राम्हणकर, मदन रामटेके, जि.प. सदस्य होमराज कापगते, अशोक कापगते, प्रभाकर सपाटे, प्रदीप मासूरकर, देवानंद पवार, विनोद पटोले उपस्थित होते.यावेळी खा.शेट्टी म्हणाले, मोदींनी अच्छे दिनचे स्वप्न दाखवित सत्तेवर आले आणि शेतकºयांसह सर्वसामान्यांची पिळवणूक करीत आहेत. नोटबंदी करून लोकांना रांगेत उभे केले. निरव मोदी व विजय माल्ल्यासारख्या कर्ज बुडव्यांवर कारवाई केली नाही. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे.पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. मागीलवर्षी पाकीस्तानातून कांदा आयात केला व यावर्षी साखर. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना संपविण्याचे काम मोदी सरकार करीत असल्याची टिकाही त्यांनी केली. प्रास्ताविक प्रशांत पवार यांनी केले.संचालन जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते यांनी तर आभारप्रदर्शन शेतकरी संघटनेचे अंतराम खोटेले यांनी केले. कार्यक्रमाला हेमकृष्ण वाडीभस्मे, उमेश भुरे, सुरेशसिंह बघेले, विनायक देशमुख, दिलीप मासूरकर, जया भुरे, ओम गायकवाड, विष्णू रणदिवे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.