शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

सांसद ग्रामनंतर आता ‘आमदार ग्राम’ योजना

By admin | Updated: May 25, 2015 00:39 IST

केंद्र शासनाने आदर्श गाव साकारण्यासाठी मागीलवर्षी आदर्श ग्राम योजना लागू केली. सांसद आदर्श ग्राम योजनेच्या ....

गावांचा विकास होणार : स्वयंरोजगाराच्या संधीवर भरभंडारा: केंद्र शासनाने आदर्श गाव साकारण्यासाठी मागीलवर्षी आदर्श ग्राम योजना लागू केली. सांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यातील ग्रामपंचायती आदर्श ग्राम करण्यासाठी आमदार ग्राम योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सांसद ग्रामनंतर आता राज्य पातळीवर आमदार ग्राममध्ये गावांचा विकास होण्यास मदत होणार आहे.या योजनेची अंमलबजावणी सांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवरच होणार आहे. त्यानुसार प्रत्येक आमदार त्यांच्या मतदारसंघातून जुलै २०१९ पर्यंत तीन ग्रामपंचायती आदर्श आमदार ग्राम म्हणून विकसित करणार आहेत. आमदार ग्रामसाठी निवडण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या किमान एक हजार असावी. आमदारांना आपले स्वत:चे व आपल्या पतीचे किंवा पत्नीचे गाव निवडता येणार नाही, असा नियम गृहीत धरण्यात आला आहे. विधानसभा सदस्यांचा मतदारसंघ जर शहरी व ग्रामीण भागात विभागला गेला असेल तर ते मतदार संघाच्या ग्रामीण भागातून ग्रामपंचायतीची निवड करतील. विधानसभा सदस्यांचा मतदार संघ जर संपूर्ण शहरी असेल तर त्यांच्या सोयीच्यादृष्टीने त्याच जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीची निवड करू शकतील. या योजनेत केंद्र व राज्य शासनाच्या अस्तित्वात असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी करून गावाचा सर्वागीण विकास करण्यात येणार आहे. निवडलेल्या ग्रामपंचायतीमध्ये आमदार निधीतून घेण्यात येणाऱ्या कामासाठी राज्याकडून जोड निधीही देण्यात येणार आहे. भारत सरकारच्या संकेतस्थळाच्या धर्तीवर आमदार आदर्श योजनेच्या प्रभावी सह नियंत्रणासाठी राज्यस्तरावर वेब पोर्टलची निर्मिती करण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्रामविकास विभाग समन्वय विभाग म्हणून कार्य करेल.आमदार ग्राम योजनेसाठी राज्य सरकारने विविध उपक्रम आखले आहेत. यामध्ये ग्रामस्थांमध्ये उत्तम सवयी विकसीत करणे, बालके व महिलांमधील कुपोषणाविषयी जाणीव जागृती निर्माण करणे, गावकऱ्यांमध्ये व्यसनांच्या दुष्परिणामाबाबत जागृती करून सुदृढ आरोग्याच्या सवयी विकसीत करणे, सर्वांना किमान इयत्ता दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे, सामाजिक एकोपा व शांतताप्रिय सहजीवन असणारे ग्रामीण वातावरण तयार होण्यासाठी गावातील गुन्हेगारी, बेकारी, भेदभाव इत्यादी दूर करून युवक व स्वयंसहाय्यता समूहाचे ग्रामविकासात योगदान देण्याचे आदेशात नमुद आहे. तसेच गावाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शेती संबंधातील सेवांचा दर्जा उंचावणे पशूसंवर्धन, पाणलोट विकास लघु ग्रामोद्योग व बँक क्षेत्रातील विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देणे.याशिवाय युवकांना कौशल्यवृद्धी प्रशिक्षणे देऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, युवकांमध्ये ग्रामीण विकासासाठी संघटनात्मक कौशल्याची वृद्धी करणे, गावामध्ये सुसज्ज ग्रामपंचायत भवन, उत्तम दजार्चे रस्ते, पूर्णवेळ वीज, अन्य सार्वजनिक सेवा सुविधा इंटरनेट सुविधा इत्यादी पायाभूत सुविधा विकसीत करणे, गावाच्या पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड, सार्वजनिक घन कचऱ्याचे व्यवस्थापन तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन व संवर्धन करणे, निवडलेल्या ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छताविषयी विविध कार्यक्रम घनकचरा विल्हेवाट, सेंद्रिय कचऱ्याचे कंपोस्टिंग करून खत वापरण्याची योजना इत्यादी कार्यक्रम प्राधान्याने राबविण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतीत सांडपाण्यावर प्रक्रिया करून तयार होणाऱ्या शुद्ध पाण्याचा फेरफार शेतीसाठी करण्यात येणार आहे. केंद्रशासनाच्या सांसद ग्रामनंतर राज्य शासनाने आदर्श आमदार ग्राम योजना अंमलात आणल्याने जिल्ह्यातील विधानपरिषदेसह चार आमदार २०१९ पर्यत ग्रामपंचायतींचा कायापालट करतील. यामुळे गावाचा विकास होण्यास मदत होणार एवढे मात्र निश्चित आहे. (नगर प्रतिनिधी)