शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

जलयुक्त शिवार ठरतेय मृगजळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 22:27 IST

सन २०१७-१८ मध्ये जलयुक्त शिवार ही महत्वाकांक्षी योजना करडी परिसरातील कोरडा दुष्काळ संपविण्यासाठी, जलस्त्रोतांचे बळकटीकरण व पुनर्जिवन करण्यासाठी राबविण्यात आलेली आहे.

ठळक मुद्देकरडी परिसरात जलसंकट : सर्वांच्या पुढाकाराची गरज, वृक्ष संवर्धन व संगोपन मोलाचे

युवराज गोमासे ।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : सन २०१७-१८ मध्ये जलयुक्त शिवार ही महत्वाकांक्षी योजना करडी परिसरातील कोरडा दुष्काळ संपविण्यासाठी, जलस्त्रोतांचे बळकटीकरण व पुनर्जिवन करण्यासाठी राबविण्यात आलेली आहे. सन २०१५-१६ मध्ये ४ गावात ही योजना राबविण्यात आली. पुढील वर्षात तालुक्यातील २० गावे या योजनेत समाविष्ट आहेत. पंरतु, सध्यातरी योजना शासकीय यंत्रणापुरतीच योजना मर्यादीत असून डबके ठरु पाहत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने योजना लोकाभिमुख होण्यासाठी व सर्वांना लाभ मिळण्यासाठी योजनेला लोकचळवळीचे स्वरुप येणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांच्या पुढाकाराची आवश्यकता आहे.करडी परिसरातील दुष्काळी कोरडवाहू भागात जलयुक्त शिवार योजना मोठ्या प्रमाणात शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून सुरु आहे. लोकसहभागाचा येथे नामोनिशान नाही. लोकांची उदासिनता यासाठी कारणीभूत ठरतांना दिसत आहे. त्याचा परिणाम म्हणून परिसराला सतत दुष्काळाचे चटके बसत आहेत. मागील ४ वर्षांपासूनची नापिकी व भविष्यात होणाºया पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार ही लोकचळवळ झाल्याशिवाय गत्यंतर नाही, याची जाणीव होण्यासाठी प्रचार व प्रसाराबरोबर जाणीवजागृतीची व मानसिकता बदलविण्याची गरज आहे.वाढते तापमान, अनियमित पर्जन्यमानाचा फटका करडी परिसरताील कृषी क्षेत्रावर अधिकच जाणवत आहे. मागील तीन वर्षापासून दुबार पेरणी शेतकºयांना करावी लागत आहे. शेकडो हेक्टर शेती वेळेवर न आलेल्या पावसामुळे पडीत राहत आहे. रोवणीपर्यंतची शेतकºयांनी केलेली मेहनत व खर्च त्यामुळे वाया जात आहे. नैराश्यातून शेतकरी आत्महत्या होत आहेत. उन्हाळ्यात भिषण पाणी टंचाईचा सामना सर्वांना करावा लागतो. या सर्व बाबींचा विचार करता पाणी संकटावर मात करण्यासाठी वृक्ष लागवउीसाठी सामाजिक संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालये, प्रतिष्ठीत नागरिक व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे सर्वांच्या हिताचे ठरणारे आहे.शासन अनेक वर्षांपासून जलसंधारणाचे काम करत आहे. मात्र, अद्यापही पाणीटंचाईवर मात करता आली नाही. त्यामुळेच ही जलयुक्त शिवार योजना लोकचळवळ होऊन गावागावात शासन व जनतेच्या मदतीने तसेच सामाजिक संस्थाच्या श्रमदानातून जलसंधारणाची, नदी-नाले तलाव खोलीकरणाची कामे झाली पाहिजेत. ज्या गावातील ग्रामस्थ पाणी व सिंचन प्रश्नावर एकत्र आले त्या गावांचा आज चेहरामोहरा बदलून गेला आहे. या सर्व बाबींचा आदर्श डोळ्यासमोर घेण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये विविध सामाजिक संस्था व संघटनाबरोबर लोकसहभागातून ओढे, नाले, तलाव यांचे रुंदीकरण व खोलीकरणाची कामे युध्दा पातळीवर सुरु आहेत. यामुळे भविष्यातील पाण्याचा दुष्काळ संपविण्यास मोलाची मदत होणार आहे. जलयुक्त शिवार चळवळ लोकचळवळ झाली तरच शेतकºयांच्या माथी लागलेला दुष्काळाचा कलंक पुसला जाईल. विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होईल, बोरवेल्स खोदण्यात कायमची बंदी येईल व त्याचा फायदा निश्चितच शेतशिवाराला व पिकांना होईल. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नैसर्गिक तलाव, बोड्या जानेवारी महिन्यातच कोरड्या पडतात. उन्हाळ्यात पाण्याचा ठणठणाट असतो. पाण्यासाठी दाहिदिशा भटकण्याची वेळ नागरिकांवर येते. पाण्याचा दुष्काळ संपविण्याची क्षमता जलयुक्त शिवार आहे. गरज आहे तिला लोकाभीमुख करण्याची. तसे झाल्यास श्रमदानातून गावे पाणीदार होतील. दुष्काळाची चिंता मिटेल. जलयुक्त शिवार लोकचळवळी बरोबर ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही मोहीम सर्वस्तरातून राबविल्यास पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार नाही.