शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
7
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
8
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
9
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
10
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
11
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
12
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
13
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
14
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
15
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
16
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
17
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
18
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
19
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
20
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर

जलयुक्त शिवार ठरतेय मृगजळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 22:27 IST

सन २०१७-१८ मध्ये जलयुक्त शिवार ही महत्वाकांक्षी योजना करडी परिसरातील कोरडा दुष्काळ संपविण्यासाठी, जलस्त्रोतांचे बळकटीकरण व पुनर्जिवन करण्यासाठी राबविण्यात आलेली आहे.

ठळक मुद्देकरडी परिसरात जलसंकट : सर्वांच्या पुढाकाराची गरज, वृक्ष संवर्धन व संगोपन मोलाचे

युवराज गोमासे ।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : सन २०१७-१८ मध्ये जलयुक्त शिवार ही महत्वाकांक्षी योजना करडी परिसरातील कोरडा दुष्काळ संपविण्यासाठी, जलस्त्रोतांचे बळकटीकरण व पुनर्जिवन करण्यासाठी राबविण्यात आलेली आहे. सन २०१५-१६ मध्ये ४ गावात ही योजना राबविण्यात आली. पुढील वर्षात तालुक्यातील २० गावे या योजनेत समाविष्ट आहेत. पंरतु, सध्यातरी योजना शासकीय यंत्रणापुरतीच योजना मर्यादीत असून डबके ठरु पाहत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने योजना लोकाभिमुख होण्यासाठी व सर्वांना लाभ मिळण्यासाठी योजनेला लोकचळवळीचे स्वरुप येणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांच्या पुढाकाराची आवश्यकता आहे.करडी परिसरातील दुष्काळी कोरडवाहू भागात जलयुक्त शिवार योजना मोठ्या प्रमाणात शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून सुरु आहे. लोकसहभागाचा येथे नामोनिशान नाही. लोकांची उदासिनता यासाठी कारणीभूत ठरतांना दिसत आहे. त्याचा परिणाम म्हणून परिसराला सतत दुष्काळाचे चटके बसत आहेत. मागील ४ वर्षांपासूनची नापिकी व भविष्यात होणाºया पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार ही लोकचळवळ झाल्याशिवाय गत्यंतर नाही, याची जाणीव होण्यासाठी प्रचार व प्रसाराबरोबर जाणीवजागृतीची व मानसिकता बदलविण्याची गरज आहे.वाढते तापमान, अनियमित पर्जन्यमानाचा फटका करडी परिसरताील कृषी क्षेत्रावर अधिकच जाणवत आहे. मागील तीन वर्षापासून दुबार पेरणी शेतकºयांना करावी लागत आहे. शेकडो हेक्टर शेती वेळेवर न आलेल्या पावसामुळे पडीत राहत आहे. रोवणीपर्यंतची शेतकºयांनी केलेली मेहनत व खर्च त्यामुळे वाया जात आहे. नैराश्यातून शेतकरी आत्महत्या होत आहेत. उन्हाळ्यात भिषण पाणी टंचाईचा सामना सर्वांना करावा लागतो. या सर्व बाबींचा विचार करता पाणी संकटावर मात करण्यासाठी वृक्ष लागवउीसाठी सामाजिक संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालये, प्रतिष्ठीत नागरिक व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे सर्वांच्या हिताचे ठरणारे आहे.शासन अनेक वर्षांपासून जलसंधारणाचे काम करत आहे. मात्र, अद्यापही पाणीटंचाईवर मात करता आली नाही. त्यामुळेच ही जलयुक्त शिवार योजना लोकचळवळ होऊन गावागावात शासन व जनतेच्या मदतीने तसेच सामाजिक संस्थाच्या श्रमदानातून जलसंधारणाची, नदी-नाले तलाव खोलीकरणाची कामे झाली पाहिजेत. ज्या गावातील ग्रामस्थ पाणी व सिंचन प्रश्नावर एकत्र आले त्या गावांचा आज चेहरामोहरा बदलून गेला आहे. या सर्व बाबींचा आदर्श डोळ्यासमोर घेण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये विविध सामाजिक संस्था व संघटनाबरोबर लोकसहभागातून ओढे, नाले, तलाव यांचे रुंदीकरण व खोलीकरणाची कामे युध्दा पातळीवर सुरु आहेत. यामुळे भविष्यातील पाण्याचा दुष्काळ संपविण्यास मोलाची मदत होणार आहे. जलयुक्त शिवार चळवळ लोकचळवळ झाली तरच शेतकºयांच्या माथी लागलेला दुष्काळाचा कलंक पुसला जाईल. विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होईल, बोरवेल्स खोदण्यात कायमची बंदी येईल व त्याचा फायदा निश्चितच शेतशिवाराला व पिकांना होईल. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नैसर्गिक तलाव, बोड्या जानेवारी महिन्यातच कोरड्या पडतात. उन्हाळ्यात पाण्याचा ठणठणाट असतो. पाण्यासाठी दाहिदिशा भटकण्याची वेळ नागरिकांवर येते. पाण्याचा दुष्काळ संपविण्याची क्षमता जलयुक्त शिवार आहे. गरज आहे तिला लोकाभीमुख करण्याची. तसे झाल्यास श्रमदानातून गावे पाणीदार होतील. दुष्काळाची चिंता मिटेल. जलयुक्त शिवार लोकचळवळी बरोबर ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही मोहीम सर्वस्तरातून राबविल्यास पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार नाही.