शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार ठरतेय मृगजळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 22:27 IST

सन २०१७-१८ मध्ये जलयुक्त शिवार ही महत्वाकांक्षी योजना करडी परिसरातील कोरडा दुष्काळ संपविण्यासाठी, जलस्त्रोतांचे बळकटीकरण व पुनर्जिवन करण्यासाठी राबविण्यात आलेली आहे.

ठळक मुद्देकरडी परिसरात जलसंकट : सर्वांच्या पुढाकाराची गरज, वृक्ष संवर्धन व संगोपन मोलाचे

युवराज गोमासे ।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : सन २०१७-१८ मध्ये जलयुक्त शिवार ही महत्वाकांक्षी योजना करडी परिसरातील कोरडा दुष्काळ संपविण्यासाठी, जलस्त्रोतांचे बळकटीकरण व पुनर्जिवन करण्यासाठी राबविण्यात आलेली आहे. सन २०१५-१६ मध्ये ४ गावात ही योजना राबविण्यात आली. पुढील वर्षात तालुक्यातील २० गावे या योजनेत समाविष्ट आहेत. पंरतु, सध्यातरी योजना शासकीय यंत्रणापुरतीच योजना मर्यादीत असून डबके ठरु पाहत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने योजना लोकाभिमुख होण्यासाठी व सर्वांना लाभ मिळण्यासाठी योजनेला लोकचळवळीचे स्वरुप येणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांच्या पुढाकाराची आवश्यकता आहे.करडी परिसरातील दुष्काळी कोरडवाहू भागात जलयुक्त शिवार योजना मोठ्या प्रमाणात शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून सुरु आहे. लोकसहभागाचा येथे नामोनिशान नाही. लोकांची उदासिनता यासाठी कारणीभूत ठरतांना दिसत आहे. त्याचा परिणाम म्हणून परिसराला सतत दुष्काळाचे चटके बसत आहेत. मागील ४ वर्षांपासूनची नापिकी व भविष्यात होणाºया पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार ही लोकचळवळ झाल्याशिवाय गत्यंतर नाही, याची जाणीव होण्यासाठी प्रचार व प्रसाराबरोबर जाणीवजागृतीची व मानसिकता बदलविण्याची गरज आहे.वाढते तापमान, अनियमित पर्जन्यमानाचा फटका करडी परिसरताील कृषी क्षेत्रावर अधिकच जाणवत आहे. मागील तीन वर्षापासून दुबार पेरणी शेतकºयांना करावी लागत आहे. शेकडो हेक्टर शेती वेळेवर न आलेल्या पावसामुळे पडीत राहत आहे. रोवणीपर्यंतची शेतकºयांनी केलेली मेहनत व खर्च त्यामुळे वाया जात आहे. नैराश्यातून शेतकरी आत्महत्या होत आहेत. उन्हाळ्यात भिषण पाणी टंचाईचा सामना सर्वांना करावा लागतो. या सर्व बाबींचा विचार करता पाणी संकटावर मात करण्यासाठी वृक्ष लागवउीसाठी सामाजिक संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालये, प्रतिष्ठीत नागरिक व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे सर्वांच्या हिताचे ठरणारे आहे.शासन अनेक वर्षांपासून जलसंधारणाचे काम करत आहे. मात्र, अद्यापही पाणीटंचाईवर मात करता आली नाही. त्यामुळेच ही जलयुक्त शिवार योजना लोकचळवळ होऊन गावागावात शासन व जनतेच्या मदतीने तसेच सामाजिक संस्थाच्या श्रमदानातून जलसंधारणाची, नदी-नाले तलाव खोलीकरणाची कामे झाली पाहिजेत. ज्या गावातील ग्रामस्थ पाणी व सिंचन प्रश्नावर एकत्र आले त्या गावांचा आज चेहरामोहरा बदलून गेला आहे. या सर्व बाबींचा आदर्श डोळ्यासमोर घेण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये विविध सामाजिक संस्था व संघटनाबरोबर लोकसहभागातून ओढे, नाले, तलाव यांचे रुंदीकरण व खोलीकरणाची कामे युध्दा पातळीवर सुरु आहेत. यामुळे भविष्यातील पाण्याचा दुष्काळ संपविण्यास मोलाची मदत होणार आहे. जलयुक्त शिवार चळवळ लोकचळवळ झाली तरच शेतकºयांच्या माथी लागलेला दुष्काळाचा कलंक पुसला जाईल. विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होईल, बोरवेल्स खोदण्यात कायमची बंदी येईल व त्याचा फायदा निश्चितच शेतशिवाराला व पिकांना होईल. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नैसर्गिक तलाव, बोड्या जानेवारी महिन्यातच कोरड्या पडतात. उन्हाळ्यात पाण्याचा ठणठणाट असतो. पाण्यासाठी दाहिदिशा भटकण्याची वेळ नागरिकांवर येते. पाण्याचा दुष्काळ संपविण्याची क्षमता जलयुक्त शिवार आहे. गरज आहे तिला लोकाभीमुख करण्याची. तसे झाल्यास श्रमदानातून गावे पाणीदार होतील. दुष्काळाची चिंता मिटेल. जलयुक्त शिवार लोकचळवळी बरोबर ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही मोहीम सर्वस्तरातून राबविल्यास पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार नाही.