शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

धूळ प्रदुषण लपविण्यासाठी शहरातील रस्त्यांवर ओतले करोडो लिटर पाणी

By युवराज गोमास | Updated: November 20, 2023 14:23 IST

जिल्हा प्रशासनाचे लक्तरे वेशीवर : नागरिकांत असंतोष

भंडारा : 'शासन आपल्या दारी' उपक्रमांतर्गत शहरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री दाखल होणार असल्याने जिल्हा प्रशासन अलर्ट होते. दिवाळीपूर्वी नागरिकांनी आपआपल्या घर व परिसराची स्वच्छता केली असताना प्रशासनाने दिवाळीनंतर शहरातील रस्त्यांची, नाले, गटारांची व रस्त्यांच्या कडांची स्वच्छता केली. दुर्गंधीयुक्त घनकचरा तातडीने उचलून विल्हेवाट लावली.

शहरात सातत्याने धूळ प्रदुषण असतांना प्रशासन कमालीचे दुर्लक्ष करून होते. शहरात अनेक वर्षांपासून नागरिकांना दुषीत पाणी प्यावे लागत आहे. शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते. परंतु, राज्यकर्ते शहरात येण्यापूर्वीच सकाळीच अनेक टँकरच्या माध्यमातून करोडो लिटर पाणी रस्त्यांवर ओतून आपले पाप लपविण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केल्याचा संतोष नागरिकांत व्यक्त होत आहे.

भंडारा शहरात गत दोन वर्षांपासून प्रचंड धूळ पदुषण आहे. रोज स्वच्छता न केल्यास घरात धुळीचा थर साचतो. स्वच्छ कपडे घालून बाहेर पडताच कपडे मळतात. पांढरे कपडे लाल झालेले दिसून येताच. शहरात धुळ पदुषणाचा स्तर सातत्याने वाढता आहे. परंतु, नगर पालिका प्रशासन व जिल्हा पदुषण नियंत्रण विभाग याकडे डोळेझाक करून आहे.

हिरवेगार व स्वच्छ सुंदर शहराचे स्वप्न भंगलेभंडारा शहरात धूळ प्रदुषणामुळे श्वसन व डोळ्यांचे आजार वाढीस लागले आहे. अनेकांचा दमा विकाराने ग्रासले आहे. हिरवेगार शहराचे स्वप्न धुळीस मिळाल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. अरूंद रस्त्यांवर अतिक्रमणे वाढली असून वाहतुकीची कोंडी नेहमीची बाब झाली आहे. फुटपाथ व्यावसायिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे.

अंतर्गत रस्त्यांचे बेहालशहरात पावसाळ्यापर्यंत गटार लाइन टाकण्यासाठी अंतर्गत सर्व पक्के सिमेंट रोड व डांबरीकरण रस्ते खोदण्यात आले. पाईप लाइन टाकल्यानंतर केवळ मातीने बुजविण्याचे आले. त्यामुळे संपूर्ण पावसाळा नागरिकांना चिखलातून काढावा लागला. अद्यापही अनेक रस्ते मजबूत करण्यात आलेले नाही. त्यामुळे शहरात धुळीचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे.

शहरात स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी वर्षभरापासून मिळत नाही. अनेकांच्या नळाला दूषीत पाणी पुरवठा होत आहे. वर्षभर स्वच्छतेचा अभाव असतो. रस्त्यांची दूरवस्था आहे. प्रचंड धुळीचा त्रास सहन करावा लागतो आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाने केवळ एक दिवसासाठी करोडे लिटर पाणी रस्त्यांवर ओतणे चुकीचे व दुर्भाग्यपूर्ण आहे.- भगीरथ धोटे, नागरिक, भंडारा.

हा जिल्हा प्रशासनाचा दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. शहरात रोड-रस्त्यांचे बेहाल आहे. दुषीत पाणी पुरवठा होत आहे. गटार लाइनचे काम अद्यापही अपूर्ण आहेत. शहरात धुळीचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. परंतु, यावर उपाययोजना होत नाही.- गोपाल सेलोकर, नागरिक, भंडारा.

टॅग्स :Waterपाणी