शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

धूळ प्रदुषण लपविण्यासाठी शहरातील रस्त्यांवर ओतले करोडो लिटर पाणी

By युवराज गोमास | Updated: November 20, 2023 14:23 IST

जिल्हा प्रशासनाचे लक्तरे वेशीवर : नागरिकांत असंतोष

भंडारा : 'शासन आपल्या दारी' उपक्रमांतर्गत शहरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री दाखल होणार असल्याने जिल्हा प्रशासन अलर्ट होते. दिवाळीपूर्वी नागरिकांनी आपआपल्या घर व परिसराची स्वच्छता केली असताना प्रशासनाने दिवाळीनंतर शहरातील रस्त्यांची, नाले, गटारांची व रस्त्यांच्या कडांची स्वच्छता केली. दुर्गंधीयुक्त घनकचरा तातडीने उचलून विल्हेवाट लावली.

शहरात सातत्याने धूळ प्रदुषण असतांना प्रशासन कमालीचे दुर्लक्ष करून होते. शहरात अनेक वर्षांपासून नागरिकांना दुषीत पाणी प्यावे लागत आहे. शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते. परंतु, राज्यकर्ते शहरात येण्यापूर्वीच सकाळीच अनेक टँकरच्या माध्यमातून करोडो लिटर पाणी रस्त्यांवर ओतून आपले पाप लपविण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केल्याचा संतोष नागरिकांत व्यक्त होत आहे.

भंडारा शहरात गत दोन वर्षांपासून प्रचंड धूळ पदुषण आहे. रोज स्वच्छता न केल्यास घरात धुळीचा थर साचतो. स्वच्छ कपडे घालून बाहेर पडताच कपडे मळतात. पांढरे कपडे लाल झालेले दिसून येताच. शहरात धुळ पदुषणाचा स्तर सातत्याने वाढता आहे. परंतु, नगर पालिका प्रशासन व जिल्हा पदुषण नियंत्रण विभाग याकडे डोळेझाक करून आहे.

हिरवेगार व स्वच्छ सुंदर शहराचे स्वप्न भंगलेभंडारा शहरात धूळ प्रदुषणामुळे श्वसन व डोळ्यांचे आजार वाढीस लागले आहे. अनेकांचा दमा विकाराने ग्रासले आहे. हिरवेगार शहराचे स्वप्न धुळीस मिळाल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. अरूंद रस्त्यांवर अतिक्रमणे वाढली असून वाहतुकीची कोंडी नेहमीची बाब झाली आहे. फुटपाथ व्यावसायिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे.

अंतर्गत रस्त्यांचे बेहालशहरात पावसाळ्यापर्यंत गटार लाइन टाकण्यासाठी अंतर्गत सर्व पक्के सिमेंट रोड व डांबरीकरण रस्ते खोदण्यात आले. पाईप लाइन टाकल्यानंतर केवळ मातीने बुजविण्याचे आले. त्यामुळे संपूर्ण पावसाळा नागरिकांना चिखलातून काढावा लागला. अद्यापही अनेक रस्ते मजबूत करण्यात आलेले नाही. त्यामुळे शहरात धुळीचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे.

शहरात स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी वर्षभरापासून मिळत नाही. अनेकांच्या नळाला दूषीत पाणी पुरवठा होत आहे. वर्षभर स्वच्छतेचा अभाव असतो. रस्त्यांची दूरवस्था आहे. प्रचंड धुळीचा त्रास सहन करावा लागतो आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाने केवळ एक दिवसासाठी करोडे लिटर पाणी रस्त्यांवर ओतणे चुकीचे व दुर्भाग्यपूर्ण आहे.- भगीरथ धोटे, नागरिक, भंडारा.

हा जिल्हा प्रशासनाचा दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. शहरात रोड-रस्त्यांचे बेहाल आहे. दुषीत पाणी पुरवठा होत आहे. गटार लाइनचे काम अद्यापही अपूर्ण आहेत. शहरात धुळीचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. परंतु, यावर उपाययोजना होत नाही.- गोपाल सेलोकर, नागरिक, भंडारा.

टॅग्स :Waterपाणी