शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

धानाच्या लक्षावधी क्विंटलची भरडाई रखडणार

By admin | Updated: December 2, 2014 23:00 IST

शासकीय आधारभूत केंद्रांवर खरेदी केलेल्या धानाची भरडाई करणाऱ्या भातगिरणीमालकांच्या वाहतूक भाड्याची थकबाकी, भरडाईचे दर वाढविण्याबाबत सरकारची उदासीनता आणि अन्य समस्या सोडविण्यासाठी अन्न

भंडारा : शासकीय आधारभूत केंद्रांवर खरेदी केलेल्या धानाची भरडाई करणाऱ्या भातगिरणीमालकांच्या वाहतूक भाड्याची थकबाकी, भरडाईचे दर वाढविण्याबाबत सरकारची उदासीनता आणि अन्य समस्या सोडविण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांनी हतबलता दर्शविली आहे. राज्य सरकारची आर्थिक स्थिती खालावल्याचे कारण पुढे करीत या समस्या निकाली काढण्यासाठी असमर्थतता दर्शविल्यामुळे राईस मिलर्सनी सहकार्य करण्यासाठी नकार दिला आहे. परिणामी, मागील काही वर्षांपासून गोदामात पडून असलेल्या धानाची भरडाई रखडणार असल्याचे संकेत आहेत. पूर्व विदर्भातील भातगिरणीमालकांचे प्रश्न, थकबाकी, धानाची भरडाई या मुद्यांवर अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीला राईस मिलर्ससह पुरवठा विभाग आणि पणन महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. शासकीय केंद्रांवरील धानाची भरडाई करण्यासाठी केवळ १० रुपये प्रतिक्विंटल दर दिला जात असून त्यात वाढ करावी, वाहतूक भाड्याची कोट्यवधीची थकबाकी अदा करावी, लादलेला भुर्दंड आणि व्याजांचा विषय निकाली काढावा, यासह अन्य मागण्यांवर या बैठकीत चर्चा झाली. त्यावेळी शासनाची आर्थिक स्थिती खालावल्याचे कारण समोर करीत सदर समस्या सोडविण्याबाबत प्रधान सचिवांनी हात झटकल्याचे समजते. मात्र, मागीलवर्षी खरेदी केलेल्या आणि गोदामात पडून असलेल्या धानाची भरडाई करून देण्याच्या सूचना देण्यास ते विसरले नाहीत. प्रश्न निकाली काढल्या जात नसतील तर भातगिरणीमालकांनी सहकार्य का करावे? असा प्रश्न उपस्थित करीत येथील काही राईस मिलर्सनी जुन्या धानाच्या भरडाईस नकार दिल्याचीही माहिती आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील गोदामांमध्ये गेल्या वर्षीचा सुमारे ३ ते ४ लाख क्विंटल धान साठविल्यामुळे त्याचा भुर्दंड सहकारी संस्थांवर बसत आहे.दरम्यान, राईस मिलर्सच्या वाहतूक भाड्याची थकबाकी आणि अन्य समस्यांसंदर्भात अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांनी बैठक बोलवली आहे. आधारभूत केंद्र चालिवणाऱ्या सहकारी संस्थांचे वाटोळे करणाऱ्या शासनाचे राईस मिल उद्योगाकडेही कायम दुर्लक्ष होत असून कित्येक भातगिरण्या बंद पडल्या आहेत. भरडाई आणि वाहतूक भाड्याची कोट्यवधी रुपयांची थकबाकी सरकारने अदा केली नाही तोपर्यंत शासकीय केंद्रांवरील धानाची भरडाई केली जाणार नाही. असा इशारा भातगिरणी मालकांनी दिला आहे. (प्रतिनिधी)