शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

गोसेतून दररोज लाखो लिटर पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 23:51 IST

पवनी तालुक्यात गोसेखुर्द प्रकल्प आहे. या प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा देण्यात आला आहे. प्रकल्पाची एकूण पाणी साठवण क्षमता ११४६.०८ दलघमी आहे. तर उपयुक्त प्रकल्पीय साठा ७४०.१७ दलघमी आहे. मात्र विविध कारणांनी गत काही वर्षांपासून या प्रकल्पाचा जलस्तर अधिकाधिक २४३.९०० मीटरपर्यंत वाढविली जाते.

ठळक मुद्देजल साठविण्याचा प्रश्न : वैनगंगेची पातळी वाढली की उघडले जातात दरवाजे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली की, पूर नियंत्रणासाठी गोसे प्रकल्पाचे ३३ दरवाजे उघडले जातात. गत महिनाभरात या प्रकल्पातून सुमारे तीन हजार ५०० दशलक्ष घनमीटर पाणी वाहून गेले. एकीकडे शासन पाण्याचा थेंब न् थेंब वाचविण्यासाठी विविध उपाययोजना करीत असताना जलसंचयाची पुरेशी व्यवस्था नसल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाहून जात आहे.पवनी तालुक्यात गोसेखुर्द प्रकल्प आहे. या प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा देण्यात आला आहे. प्रकल्पाची एकूण पाणी साठवण क्षमता ११४६.०८ दलघमी आहे. तर उपयुक्त प्रकल्पीय साठा ७४०.१७ दलघमी आहे. मात्र विविध कारणांनी गत काही वर्षांपासून या प्रकल्पाचा जलस्तर अधिकाधिक २४३.९०० मीटरपर्यंत वाढविली जाते. यावर्षीही एवढाच जलस्तर ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे प्रकल्पात पाणी अतिरिक्त झाले की दरवाजे उघडून सोडल्या जाते. सध्या या प्रकल्पात उपयुक्त पाणी साठा ४३४.७५ दलघमी आहे. वैनगंगेच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होते आणि हेच अतिरिक्त होणारे पाणी सोडले जाते.पाण्याचा थेंब न् थेंब जमिनीत मुरविण्यासाठी प्रशासन विविध मोहिमा आखत आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून घरावरील छताचे पाणी जमिनीत मुरविले जात आहे. तर दुसरीकडे लाखो लिटर पाणी अतिरिक्त होत असल्याने नदीपात्रात सोडले जात आहे. या प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसंचय करण्यासाठी सध्यातरी कोणत्याही उपाययोजना दिसत नाही. सध्या प्रशासनाच्या वतीने दररोज दरवाजे उघडून पाणी सोडण्याचा प्रकार सुरु आहे. यामुळे लाखो लिटर पाणी दररोज नदीपात्रात वाहून जात आहे.महिनाभरात वाहून गेले तीन हजार ५०० दलघमी पाणीवैनगंगा नदीचा जलस्तर वाढल्याने ३१ जुलै रोजी सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले. त्यावेळी ५८६८ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. ३ आॅगस्ट रोजी २० दरवाजे अर्धा मीटरने तर १३ दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले. त्यावेळी ४८७६ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. ४ आॅगस्ट रोजी १८ दरवाजातून १९४७ क्युमेक्स, ५ आॅगस्ट रोजी ४ गेटमधून ४३६ क्युमेक्स, ८ आॅगस्ट रोजी ३३ गेटमधून ४५३८.७४ क्युमेक्स, ९ आॅगस्ट रोजी ३३ गेटमधून ६९४५ क्युमेक्स, १० आॅगस्ट रोजी १७ गेटमधून १८४३ क्युमेक्स, ११ आॅगस्ट रोजी ३३ गेटमधून ३६०२ क्युमेक्स, १४ आॅगस्ट रोजी २९ गेटमधून ३१६५ क्युमेक्स, १६ आॅगस्ट रोजी २१ गेटमधून २३०० क्युमेक्स, २३ आॅगस्ट रोजी १३ गेटमधून १४४५.६० क्युमेक्स, २६ आॅगस्ट रोजी २१ गेटमधून २३४३ क्युमेक्स, २७ आॅगस्ट रोजी ३३ गेटमधून ३६८२ क्युमेक्स आणि २८ आॅगस्ट रोजी २७ गेटमधून ३०१२ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. महिनाभरात अतिरिक्त ठरलेले सुमारे ३ हजार ५०० दशलक्ष घनमीटर पाणी प्रकल्पातून सोडून देण्यात आले. पूर नियंत्रणासाठी पाणी सोडल्याशिवाय प्रकल्प प्रशासनाला पर्याय नाही.

टॅग्स :Damधरण