शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

पाण्यापेक्षाही दूध झाले स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:02 IST

कर्जाच्या खाईत खितपत पडलेल्या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर दुष्काळाचे भीषण संकट आहे.

ठळक मुद्देदुधाला १९ रूपये दर : शेतकऱ्यांमध्ये शासनाप्रती असंतोष

राहुल भुतांगे ।आॅनलाईन लोकमततुमसर : कर्जाच्या खाईत खितपत पडलेल्या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर दुष्काळाचे भीषण संकट आहे. अशातच शासनाने दुधाचे दर ६ रूपयाने कमी करून पाण्यापेक्षाही दुध स्वस्त करून शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ दाखविल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटत आहे.एकीकडे शासन गोरक्षणावर भरमसाठ पैसा खर्च करीत आहे तर दुसरीकडे चाऱ्यांच्या किंमती भयावह वाढविल्या आहेत. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकºयांना शेती परवडण्यासारखी राहिलेली नाही. आधीच धानाला कमी भाव आहे. त्यातही यावर्षी दुष्काळामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला असताना शासनाने दुधाचे दर २५ रूपयांवरून १९ रूपये करून ६ रूपयांनी घटविले आहे. बाजारात मिनरल वॉटर २० रूपयाला मिळते. ईथे शासनाने पाण्यापेक्षाही दुधाचे दर कमी करून टाकल्याने शेतकºयांच्या कष्टाची थट्टा सुरू आहे. परिणामी शेतकऱ्यांत असंतोष धुमसत आहे. दुधाला योग्य दर मिळवून द्यावा, अशी अपेक्षा गोपालक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.केंद्र व राज्य शासन हे उद्योगपतीचे असून शेतकरी विरोधी आहे. दुधाला योग्य दर मिळवून देण्यासाठी व दुध संकलनाकरिता शासकीय व्यवस्था करण्याकरिता काँग्रेसतर्फे आंदोलन उभारण्यात येणार आहे.- प्रमोद तितिरमारे, शेतकरी तथा प्रदेश सचिव काँग्रेस कमिटी.