शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा उपविभागात पूरनियंत्रणासाठी सूक्ष्म नियाेजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 05:00 IST

भंडारा तालुक्यात ३८ गावे वैनगंगा नदीच्या तीरावर आहे. त्यापैकी २९ गावे वैनगंगा, पाच गावे सुर नदी आणि चार गावे कन्हान नदीच्या तीरावर आहेत. त्यापैकी २७ गावांना पुराचा दरवर्षी फटका बसताे. पवनी तालुक्यात वैनगंगा नदी तीरावर ३३ गावे असून, या ३३ही गावांना दरवर्षी पुराचा सामना करावा लागताे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरात या दाेन तालुक्यांमध्ये हाहाकार उडाला हाेता. अनेक गावांचा संपर्क तुटला हाेता. प्रशासनाच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले हाेते.

ठळक मुद्दे७१ गावे नदी तीरावर : उपविभागीय अधिकाऱ्यांनी केली गावांची पाहणी

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैनगंगेच्या महापुराचा सर्वाधिक फटका भंडारा आणि पवनी या दाेन तालुक्यांना बसताे. गतवर्षी या दाेन तालुक्यांत भीषण परिस्थिती निर्माण झाली हाेती. ही परिस्थिती टाळण्यासाठी भंडारा उपविभागातील नदी तीरावर ७१ गावे असून, त्यापैकी ६० गावांना दरवर्षी पुराचा फटका बसताे. या गावांचे सूक्ष्म नियाेजन करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी रवींद्र राठाेड यांनी संभाव्य पूरबाधित गावांना भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली आहे. भंडारा उपविभागात भंडारा आणि पवनी तालुक्यांचा समावेश आहे. भंडारा तालुक्यात ३८ गावे वैनगंगा नदीच्या तीरावर आहे. त्यापैकी २९ गावे वैनगंगा, पाच गावे सुर नदी आणि चार गावे कन्हान नदीच्या तीरावर आहेत. त्यापैकी २७ गावांना पुराचा दरवर्षी फटका बसताे. पवनी तालुक्यात वैनगंगा नदी तीरावर ३३ गावे असून, या ३३ही गावांना दरवर्षी पुराचा सामना करावा लागताे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरात या दाेन तालुक्यांमध्ये हाहाकार उडाला हाेता. अनेक गावांचा संपर्क तुटला हाेता. प्रशासनाच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले हाेते. यावर्षी पुन्हा हीच परिस्थिती उद्भवू नये, यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या मार्गदर्शनात आपत्ती व्यवस्थापन विभागाने सूक्ष्म नियाेजन केले आहे. प्रत्येक उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना भेटी देण्याचे निर्देश दिले हाेते.भंडाराचे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठाेड आणि तहसीलदार अक्षय पाेयाम यांनी भंडारा तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेटी दिल्या. त्यात पिंडकेपार, काेरंभी, सालेबर्डी, खैरीपा, कारधा, सालेबर्डी सारसाळ, खापा, आझीमाबाद, करचखेडा, खमारी या गावांचा समावेश आहे. गावातील सरपंच, पाेलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला. नदीला पूर आल्यास काय करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामसेवकांनी गावकऱ्यांच्या संपर्कात राहून माहिती प्रशासनाला देण्याचे निर्देश दिले.

या गावांचा तुटताे पुरामुळे संपर्क- वैनगंगा आणि इतर नद्यांना येणाऱ्या पुरामुळे जिल्ह्यातील १८ गावांचा संपर्क तुटताे. त्यात भंडारा तालुक्यातील अर्जुनी काेरंभी, पिंडकेपार, सुरेवाडा, पवनी तालुक्यातील सावरगाव, पवना खुर्द या गावांचा समावेश आहे. यासाेबतच भंडारा तालुक्यातील गणेशपूर ते काेरंभी रस्ता, भिलेवाडा ते सुरेवाडा, सिंधी काॅलनी ते मेंढा रिंगराेड, कारधा बायपास हे मार्ग बंद हाेतात, तर पवनी तालुक्यातील नेरला ते सावरगाव, पहेला ते आंभाेरा, पवनी ते जुनाेना, मांगली ते वलनी आणि पवनी ते धानाेरी या गावांचा समावेश आहे. या गावांवर महसूल विभागाचे विशेष लक्ष राहणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पूरपरिस्थितीशी सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पूरबाधित गावांत समन्वय समिती स्थापन करण्यात आली. नागरिकांना संभाव्य धाेका वाटत असेल आणि सूचना मिळाल्यावर त्यांनी तात्पुरत्या निवाऱ्यांचा आश्रय घ्यावा. पूरपरिस्थितीच्या काळात प्रशासनाला सहकार्य करावे. अनेकदा घरातील महिला आणि लहान मुलांना सुरक्षितस्थळी पाठविले जाते. परंतु, पुरुष घरातच थांबताे. पूरपरिस्थितीत जीव वाचविणे महत्त्वाचे असते. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकाेरपणे पालन करावे.- रवींद्र राठाेड,  उपविभागीय अधिकारी भंडारा

 

टॅग्स :floodपूर