शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

भंडारा उपविभागात पूरनियंत्रणासाठी सूक्ष्म नियाेजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 05:00 IST

भंडारा तालुक्यात ३८ गावे वैनगंगा नदीच्या तीरावर आहे. त्यापैकी २९ गावे वैनगंगा, पाच गावे सुर नदी आणि चार गावे कन्हान नदीच्या तीरावर आहेत. त्यापैकी २७ गावांना पुराचा दरवर्षी फटका बसताे. पवनी तालुक्यात वैनगंगा नदी तीरावर ३३ गावे असून, या ३३ही गावांना दरवर्षी पुराचा सामना करावा लागताे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरात या दाेन तालुक्यांमध्ये हाहाकार उडाला हाेता. अनेक गावांचा संपर्क तुटला हाेता. प्रशासनाच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले हाेते.

ठळक मुद्दे७१ गावे नदी तीरावर : उपविभागीय अधिकाऱ्यांनी केली गावांची पाहणी

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैनगंगेच्या महापुराचा सर्वाधिक फटका भंडारा आणि पवनी या दाेन तालुक्यांना बसताे. गतवर्षी या दाेन तालुक्यांत भीषण परिस्थिती निर्माण झाली हाेती. ही परिस्थिती टाळण्यासाठी भंडारा उपविभागातील नदी तीरावर ७१ गावे असून, त्यापैकी ६० गावांना दरवर्षी पुराचा फटका बसताे. या गावांचे सूक्ष्म नियाेजन करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी रवींद्र राठाेड यांनी संभाव्य पूरबाधित गावांना भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली आहे. भंडारा उपविभागात भंडारा आणि पवनी तालुक्यांचा समावेश आहे. भंडारा तालुक्यात ३८ गावे वैनगंगा नदीच्या तीरावर आहे. त्यापैकी २९ गावे वैनगंगा, पाच गावे सुर नदी आणि चार गावे कन्हान नदीच्या तीरावर आहेत. त्यापैकी २७ गावांना पुराचा दरवर्षी फटका बसताे. पवनी तालुक्यात वैनगंगा नदी तीरावर ३३ गावे असून, या ३३ही गावांना दरवर्षी पुराचा सामना करावा लागताे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरात या दाेन तालुक्यांमध्ये हाहाकार उडाला हाेता. अनेक गावांचा संपर्क तुटला हाेता. प्रशासनाच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले हाेते. यावर्षी पुन्हा हीच परिस्थिती उद्भवू नये, यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या मार्गदर्शनात आपत्ती व्यवस्थापन विभागाने सूक्ष्म नियाेजन केले आहे. प्रत्येक उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना भेटी देण्याचे निर्देश दिले हाेते.भंडाराचे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठाेड आणि तहसीलदार अक्षय पाेयाम यांनी भंडारा तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेटी दिल्या. त्यात पिंडकेपार, काेरंभी, सालेबर्डी, खैरीपा, कारधा, सालेबर्डी सारसाळ, खापा, आझीमाबाद, करचखेडा, खमारी या गावांचा समावेश आहे. गावातील सरपंच, पाेलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला. नदीला पूर आल्यास काय करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामसेवकांनी गावकऱ्यांच्या संपर्कात राहून माहिती प्रशासनाला देण्याचे निर्देश दिले.

या गावांचा तुटताे पुरामुळे संपर्क- वैनगंगा आणि इतर नद्यांना येणाऱ्या पुरामुळे जिल्ह्यातील १८ गावांचा संपर्क तुटताे. त्यात भंडारा तालुक्यातील अर्जुनी काेरंभी, पिंडकेपार, सुरेवाडा, पवनी तालुक्यातील सावरगाव, पवना खुर्द या गावांचा समावेश आहे. यासाेबतच भंडारा तालुक्यातील गणेशपूर ते काेरंभी रस्ता, भिलेवाडा ते सुरेवाडा, सिंधी काॅलनी ते मेंढा रिंगराेड, कारधा बायपास हे मार्ग बंद हाेतात, तर पवनी तालुक्यातील नेरला ते सावरगाव, पहेला ते आंभाेरा, पवनी ते जुनाेना, मांगली ते वलनी आणि पवनी ते धानाेरी या गावांचा समावेश आहे. या गावांवर महसूल विभागाचे विशेष लक्ष राहणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पूरपरिस्थितीशी सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पूरबाधित गावांत समन्वय समिती स्थापन करण्यात आली. नागरिकांना संभाव्य धाेका वाटत असेल आणि सूचना मिळाल्यावर त्यांनी तात्पुरत्या निवाऱ्यांचा आश्रय घ्यावा. पूरपरिस्थितीच्या काळात प्रशासनाला सहकार्य करावे. अनेकदा घरातील महिला आणि लहान मुलांना सुरक्षितस्थळी पाठविले जाते. परंतु, पुरुष घरातच थांबताे. पूरपरिस्थितीत जीव वाचविणे महत्त्वाचे असते. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकाेरपणे पालन करावे.- रवींद्र राठाेड,  उपविभागीय अधिकारी भंडारा

 

टॅग्स :floodपूर