शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
3
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
4
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
5
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
6
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
7
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
8
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
9
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
10
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
11
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
12
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
13
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
14
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
15
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
16
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
17
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
18
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
19
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
20
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!

प्रत्येक धर्म देतो मैत्रीचा संदेश

By admin | Updated: May 17, 2016 00:21 IST

अनेक अवयव मिळून शरीर तयार होते. यामध्ये शरीराच्या प्रत्येक अवयवाला जसे महत्व आहे,...

भदन्त संघरत्न माणके : विश्वशांतीसाठी संगितीचे आयोजन पवनी : अनेक अवयव मिळून शरीर तयार होते. यामध्ये शरीराच्या प्रत्येक अवयवाला जसे महत्व आहे, तसे सर्वच धर्म हे विश्वशांतीचे अवयव असून प्रत्येकाला सारखे महत्व आहे. यातून जगाला मैत्रीचा संदेश दिल्या जातो म्हणून महासमाधीभूमी संगीती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, असे प्रतिपादन पय्या मेत्ता संघाचे अध्यक्ष भदन्त संघरत्न माणके यांनी व्यक्त केले. ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून बोलत होते.भदन्त माणके म्हणाले, संपूर्ण देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२५ वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात येत आहे. हा जयंती उत्सव केवळ मिरवणूका यासाठी नसून बाबासाहेबांच्या विचारांवर चिंतन करण्यासाठी आहे. बाबासाहेबांनी स्वत:च्या कुटूंबापेक्षा अनेक कुटूंबियांच्या हितांना महत्व दिले. याची कारणे आपण स्वत: मध्ये शोधली पाहिजेत, असा सल्ला भदन्त संघरत्न माणके यांनी दिला. महासमाधीभूमी रुयाळ (सिंदपूरी) येथे पय्या मेत्ता संघ बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर १२५ वी जयंती महोत्सव समितीद्वारा महासमाधीभूमी संगीती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथे सर्वधर्माच्या प्रार्थना देण्यासाठी सर्व धर्मिय धर्मगुरुंना निमंत्रित करण्यात आले. यामध्ये बौध्द धमार्चे भदन्त संघरत्न माणके, भदन्त सदानंद महास्थवीर, ख्रिश्चन धमार्चे रोशन मिश्रा, हिंदू धमार्चे नरेश परमानंदजी, मुस्लीम धमार्चे मौलाना शौकत साहब, शिख धमार्चे प्रकाशसिंगजी, गुरुदेव सेवा मंडळाचे ज्ञानेश्वरजी रक्षक यांचा समावेश होता. उपस्थितांनी धमार्ची प्रार्थना देवून मनोगतातून एकतेमधून विश्वशांतीचा संदेश दिला. कार्यक्रमाचे उदघाटन भदन्त सदानंद महास्थवीर यांनी तर कार्यक्रमाची अध्यक्षता धम्मदूत भदन्त संघरत्न माणके यांनी भूषविली. विशेष अतिथी म्हणून आमदार रामचंद्र अवसरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन पंचभाई, काँगेसचे ज्येष्ठ नेते अशफाकभाई पटेल उपस्थित होते. कार्यक्रमात बाबासाहेबांच्या विविध विषयातील दृष्टीक्षेपावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीत पाली भाषेचे महत्व, महिला चळवळ, विधी व न्याय, संतांचा प्रभाव, सामाजिक कार्य, पत्रकारिता, बौध्द संस्कृती, मुलनिवासी, विद्यार्थी, युवक व समता सैनिक दल या विषयांचा समावेश होता. यात वक्ते म्हणून प्रा.निलिमा चव्हाण, अ‍ॅड. वसंत खापर्डे, ज्ञानेश्वर रक्षक, मिलींद फुलझेले, सत्यजित चंद्रीकापूरे, सखाराम झोडे यांनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थित धर्मगुरुंचा तथा अतिथींचा प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन अ‍ॅड.महेंद्र गोस्वामी, धम्मानंद मेश्राम,अरविंद धारगावे, जयराज नाईक, यांनी तर आभार प्रदर्शन मनोहर मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धम्मानंद मेश्राम,अरविंद धारगावे, शिलमंजू सिंव्हगडे, ?ड. महेंद्र गोस्वामी, मनोहर मेश्राम, अचल मेश्राम, अरुण गोडांणे, भारत वासनिक, ?ड. गौतम उके, जयराज नाईक इत्यादींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)