शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
8
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
9
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
10
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
11
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
12
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
13
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
14
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
15
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
16
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
17
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
18
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
19
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
20
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक

सहा शहिदांच्या स्मृती तुमसरकरांच्या कायम स्मरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 22:18 IST

भारतीय स्वातंत्र्य संग्राम चळवळीत तुमसर शहरासह तालुक्यातील स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी शहीद दिनी आंदोलन करून प्राणाचे बलिदान दिले. तुमसर व मोहाडी तालुक्यातील सर्वात जास्त स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची शासन दप्तरी नोंद आहे. तुमसर स्वातंत्र्य युद्धातील मुख्य केंद्र होते.

ठळक मुद्देशहीद दिन विशेष : स्वातंत्र्यापूर्वीच १९२९ साली फडकला तिरंगा, महात्मा गांधींनी दिली होती भेट

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भारतीय स्वातंत्र्य संग्राम चळवळीत तुमसर शहरासह तालुक्यातील स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी शहीद दिनी आंदोलन करून प्राणाचे बलिदान दिले. तुमसर व मोहाडी तालुक्यातील सर्वात जास्त स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची शासन दप्तरी नोंद आहे. तुमसर स्वातंत्र्य युद्धातील मुख्य केंद्र होते. तुमसरातून धान्य बाहेर जात होते ते जाऊ नये म्हणून येथील प्रमुख कार्यकर्त्यांनी सत्याग्रह सुरू केला होता. ही ऐतिहासिक घटना तुमसरात घडली. या घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. तुमसरात सहा जण शहीद झाल्याची घटना देशात गाजली.धान्य विरोधात बापूराव पेंढारकर, कृष्णअप्पा दाजोट्या व छोटू पहेलवान यांना अटक करून त्यांच्यावर ब्रिटीशांनी खटला भरला. प्रसिद्ध बॅरिस्टर नरकेसरी अभ्यंकर यांनी पुढाकार घेऊन त्यांची सुटका केली. महात्मा गांधीनी सुरू केलेल्या अहसहकार आंदोलनात कर्मवीर बापूजी र.रा. पाठक यांनी वकीली सोडली. राष्ट्रीय शिक्षण मिळावे म्हणून तुमसरात लोकमान्य टिळक राष्ट्रीय विद्यालयाची स्थापना १९२० मध्ये केली. राष्ट्रीय शाळेची जबाबदारी माकडे गुरूजीकडे देण्यात आली. येथे स्वातंत्र्याची प्रेरणा देणारे शिक्षण बुधराम गुरूजी, वैरागडे गुरूजी, जोशी गुरूजी, मो.प. दामले, रामअण्णा गुरूजी सातत्याने दिले. त्यामुळे तुमसर व तुमसर विभागात इंग्रजांच्या विरोधात अनेक चळवळींना धार आली.महाराष्ट्रात येण सत्याग्रहात तुमसरचे विनायक पेंढारकर यांना ३ महिन्याची सक्त मजूरीची शिक्षा झाली. येवरडा तुरूंगात नियमांना विरोध केल्याने त्यांना शिक्षा सुनाविण्यात आली. प्रकृतीवर त्याचा विपरीत परिणाम झाला होता. १९२३ मध्ये झेंडा सत्याग्रहात तुमसरचे मो.प. दामले, लक्ष्मण समरीत, सिहोऱ्याचे गोपीचंद पाटील तुमसर यांनी सत्याग्रहात भाग घेतला. सायमन कमीशनवर बहिष्कार संदर्भात सन १९२७ मध्ये महात्मा गांधी, जमनालाल बजाज, डॉ. लोहीया तुमसरात आले होते. त्यांचा मुक्काम सेठ फत्तेचंद मोर यांच्या घरी होता. महात्मा गांधीनी राष्ट्रीय विद्यालयाला भेट दिली.तुमसर नगरपरिषदेवर तिरंगा झेंडा फडकविण्याकरीता सेठ नरसिंगदास मोर यांनी २ आॅक्टोबर १९२९ ला नोटीस दिली होती. त्याकरिता झेंड्याकरीता युद्धमंडळ स्थापन करण्यात आले होते. मो.प. दामले, सचिव वासुदेव कोंडेवार तथा सदस्यांनी मोर्चेबांधणी केली. वामनराव जोशी यांचे हस्ते तिरंगाध्वज नगर परिषदेवर प्रथमच फडकला.१९३० मध्ये जंगल सत्याग्रहात पोलिसांनी लाठीचार्ज व धरपकड केली. पोलीस घोडे व हत्तीवर बसून आणण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या वानरसेना स्थापन करण्यात आल्या होत्या. १० आॅगस्ट १९४२ रोजी पोलिसांनी १४ नेत्यांविरोधात अटक वारंट काढला होता. काही नेते भूमिगत झाले होते. तुमसर पोलीस ठाण्यासमोर कार्यकर्ते तिरंगाध्वज लावण्याकरिता गेले होते. मिरवणूक अडवून पोलिसांनी गोळभबाळ केला त्यात श्रीराम रामजी धुर्वे, भदुजी रामाजी नोंदासे, श्रीहरी काशीनाथ फाये करडी, पांडूरंग परसराम सोनवाल, भुवाजी बालाजी वानोरे, राजाराम पेकू धुर्वे हे सहा जण मृत्युमुखी पडले. ब्रिटीशांनी सेनेला तुमसरात पाचारण केले होते. दामले गुरूजी, वासुदेव कोंडेवार, आनंदराव चकोले, नारायणराव कारेमोरे, भोले यांना पकडून तुरूंगात डांबले.सन १९९० मध्ये भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद तुमसर येथे आले होते. त्यांनी सहा शहीदांच्या स्मारकाकरिता जागा देवून शहीद स्मारकाचे भूमीपूजन केले होते. तुमसरात मोतीलाल नेहरू, महात्मा भगवान दासजी पंडित सुंदरलाल, आचार्य कृपलानी, डॉ. पट्टीमोसिता रामय्या, जयप्रकाश नारायण, क्रांतीवीर नाना पाटील, काकासाहेब गाडगीळ आदी नेत्यांनी भेटी दिल्या आहेत.