शहरं
Join us  
Trending Stories
1
११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
2
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
3
काल हिडमाचा खात्मा, आज ‘टेक शंकर’सह 7 नक्षलवादी ठार; आंध्र-ओडिशा सीमेजवळ भीषण चकमक
4
संरक्षण, विमा आणि धातू क्षेत्रातील 'या' ५ कंपन्यांचे शेअर्स येणार तेजीत! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज
5
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
6
‘ही मुलगी आमच्या मुलाची नाही’, सासू-सासरे सारखा घ्यायचे संशय, संतप्त सुनेने केलं भयंकर कृत्य
7
Rinku Singh Century In Ranji Trophy : टी-२० स्टार रिंकू सिंहचा रेड बॉल क्रिकेटमध्ये शतकी धमाका!
8
आता काळ बदलतोय! घर सांभाळण्यासाठी कपलने ठेवला 'होम मॅनेजर'; महिन्याला १ लाख पगार
9
हृदयद्रावक! डीजेवर नाचताना हवेत गोळीबार; नवरदेवाच्या मित्राच्या मुलीने गमावला जीव
10
५४ तास विपरीत महालक्ष्मी राजयोग: ५ राशींना ४ पट लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अकल्पनीय फायदा!
11
'इंग्लिश विंग्लिश'मधली छोटी मुलगी आता दिसते सुंदर; अभिनेत्रीचं अरेंज मॅरेज ठरलं; म्हणाली...
12
रशियाने भारताला दिली एक खतरनाक ऑफर, पाकिस्तानचं टेन्शन वाढलं, आली डोळे पांढरे होण्याची वेळ
13
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
14
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
15
Numerology 2026: अंकशास्त्रानुसार २०२६ हे इच्छापूर्तीचे वर्ष? कोणते बदल केले पाहिजेत?
16
एक गावात अन् दुसरी शहरात, एका कॉलनं पतीचं गुपित उघडलं; २ बायकांचा धनी जेलमध्ये गेला, काय घडलं?
17
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
18
Nashik: नाशकात कडाक्याच्या थंडीत भल्या पहाटे सैन्यभरतीसाठी तरुणाई मैदानात!
19
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
20
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
Daily Top 2Weekly Top 5

सहा शहिदांच्या स्मृती तुमसरकरांच्या कायम स्मरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 22:18 IST

भारतीय स्वातंत्र्य संग्राम चळवळीत तुमसर शहरासह तालुक्यातील स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी शहीद दिनी आंदोलन करून प्राणाचे बलिदान दिले. तुमसर व मोहाडी तालुक्यातील सर्वात जास्त स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची शासन दप्तरी नोंद आहे. तुमसर स्वातंत्र्य युद्धातील मुख्य केंद्र होते.

ठळक मुद्देशहीद दिन विशेष : स्वातंत्र्यापूर्वीच १९२९ साली फडकला तिरंगा, महात्मा गांधींनी दिली होती भेट

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भारतीय स्वातंत्र्य संग्राम चळवळीत तुमसर शहरासह तालुक्यातील स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी शहीद दिनी आंदोलन करून प्राणाचे बलिदान दिले. तुमसर व मोहाडी तालुक्यातील सर्वात जास्त स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची शासन दप्तरी नोंद आहे. तुमसर स्वातंत्र्य युद्धातील मुख्य केंद्र होते. तुमसरातून धान्य बाहेर जात होते ते जाऊ नये म्हणून येथील प्रमुख कार्यकर्त्यांनी सत्याग्रह सुरू केला होता. ही ऐतिहासिक घटना तुमसरात घडली. या घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. तुमसरात सहा जण शहीद झाल्याची घटना देशात गाजली.धान्य विरोधात बापूराव पेंढारकर, कृष्णअप्पा दाजोट्या व छोटू पहेलवान यांना अटक करून त्यांच्यावर ब्रिटीशांनी खटला भरला. प्रसिद्ध बॅरिस्टर नरकेसरी अभ्यंकर यांनी पुढाकार घेऊन त्यांची सुटका केली. महात्मा गांधीनी सुरू केलेल्या अहसहकार आंदोलनात कर्मवीर बापूजी र.रा. पाठक यांनी वकीली सोडली. राष्ट्रीय शिक्षण मिळावे म्हणून तुमसरात लोकमान्य टिळक राष्ट्रीय विद्यालयाची स्थापना १९२० मध्ये केली. राष्ट्रीय शाळेची जबाबदारी माकडे गुरूजीकडे देण्यात आली. येथे स्वातंत्र्याची प्रेरणा देणारे शिक्षण बुधराम गुरूजी, वैरागडे गुरूजी, जोशी गुरूजी, मो.प. दामले, रामअण्णा गुरूजी सातत्याने दिले. त्यामुळे तुमसर व तुमसर विभागात इंग्रजांच्या विरोधात अनेक चळवळींना धार आली.महाराष्ट्रात येण सत्याग्रहात तुमसरचे विनायक पेंढारकर यांना ३ महिन्याची सक्त मजूरीची शिक्षा झाली. येवरडा तुरूंगात नियमांना विरोध केल्याने त्यांना शिक्षा सुनाविण्यात आली. प्रकृतीवर त्याचा विपरीत परिणाम झाला होता. १९२३ मध्ये झेंडा सत्याग्रहात तुमसरचे मो.प. दामले, लक्ष्मण समरीत, सिहोऱ्याचे गोपीचंद पाटील तुमसर यांनी सत्याग्रहात भाग घेतला. सायमन कमीशनवर बहिष्कार संदर्भात सन १९२७ मध्ये महात्मा गांधी, जमनालाल बजाज, डॉ. लोहीया तुमसरात आले होते. त्यांचा मुक्काम सेठ फत्तेचंद मोर यांच्या घरी होता. महात्मा गांधीनी राष्ट्रीय विद्यालयाला भेट दिली.तुमसर नगरपरिषदेवर तिरंगा झेंडा फडकविण्याकरीता सेठ नरसिंगदास मोर यांनी २ आॅक्टोबर १९२९ ला नोटीस दिली होती. त्याकरिता झेंड्याकरीता युद्धमंडळ स्थापन करण्यात आले होते. मो.प. दामले, सचिव वासुदेव कोंडेवार तथा सदस्यांनी मोर्चेबांधणी केली. वामनराव जोशी यांचे हस्ते तिरंगाध्वज नगर परिषदेवर प्रथमच फडकला.१९३० मध्ये जंगल सत्याग्रहात पोलिसांनी लाठीचार्ज व धरपकड केली. पोलीस घोडे व हत्तीवर बसून आणण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या वानरसेना स्थापन करण्यात आल्या होत्या. १० आॅगस्ट १९४२ रोजी पोलिसांनी १४ नेत्यांविरोधात अटक वारंट काढला होता. काही नेते भूमिगत झाले होते. तुमसर पोलीस ठाण्यासमोर कार्यकर्ते तिरंगाध्वज लावण्याकरिता गेले होते. मिरवणूक अडवून पोलिसांनी गोळभबाळ केला त्यात श्रीराम रामजी धुर्वे, भदुजी रामाजी नोंदासे, श्रीहरी काशीनाथ फाये करडी, पांडूरंग परसराम सोनवाल, भुवाजी बालाजी वानोरे, राजाराम पेकू धुर्वे हे सहा जण मृत्युमुखी पडले. ब्रिटीशांनी सेनेला तुमसरात पाचारण केले होते. दामले गुरूजी, वासुदेव कोंडेवार, आनंदराव चकोले, नारायणराव कारेमोरे, भोले यांना पकडून तुरूंगात डांबले.सन १९९० मध्ये भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद तुमसर येथे आले होते. त्यांनी सहा शहीदांच्या स्मारकाकरिता जागा देवून शहीद स्मारकाचे भूमीपूजन केले होते. तुमसरात मोतीलाल नेहरू, महात्मा भगवान दासजी पंडित सुंदरलाल, आचार्य कृपलानी, डॉ. पट्टीमोसिता रामय्या, जयप्रकाश नारायण, क्रांतीवीर नाना पाटील, काकासाहेब गाडगीळ आदी नेत्यांनी भेटी दिल्या आहेत.