शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

बसस्थानक खड्ड्यांच्या विळख्यात

By admin | Updated: April 23, 2016 00:35 IST

प्रवासी हेच आमचे दैवत, असे घोषवाक्य असणाऱ्या एस.टी. महामंडळाकडूनच प्रवाशांची गैरसोय केली जात आहे.

प्रवाशांची कुचंबना : वारंवार केली जाते डागडुजी, जिल्ह्याच्या मुख्यालयात व्यवस्थेला खिंडारभंडारा : प्रवासी हेच आमचे दैवत, असे घोषवाक्य असणाऱ्या एस.टी. महामंडळाकडूनच प्रवाशांची गैरसोय केली जात आहे. जिल्ह्याच्या मुख्यालयात असलेल्या भंडारा बसस्थानकात खड्ड्यांची भरमार आहे. बसस्थानकात प्रवेश केल्यावर बस खड्ड्यातून जात असल्याने प्रवाशांना त्याचा फटका बसतो. बसस्थानक परिसराच्या सभोवताल दुर्गंधीही पसरली असल्याने या समस्येपासून मुक्त करण्याचे आवाहन आगार व्यवस्थापनासमोर आहे. शहरातील बसस्थानकावर २४ तास प्रवाशांची वर्दळ असते. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या भंडारा बसस्थानकात खड्डे आणि दुर्गंधीमुळे प्रवाशी व एस.टी. कामगारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बसस्थानक परिसरात सर्वत्र खड्डेच खड्डे असल्याने त्याचा फटका सर्वांनाच बसतो. बसस्थानकाच्या इन आणि आऊट प्रवेशद्वारावरील मार्गावरील डांबर उखडलेले असल्याने गिट्टी सर्वत्र पसरली आहे. बसस्थानकात प्रवेश करताच मोठा खड्डा प्रवाशांचे स्वागत करतो. सहा महिन्यापूर्वी बसस्थानकातील खड्यांची डागडुजी करण्यात आली होती. मात्र पळसाला पाने तीनच या म्हणीप्रमाणे स्थिती पूर्ववत झाली. पुन्हा मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाल्याने डागडुजीच्या निर्माण कार्य व गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोट्यवधींचे महसूल देणाऱ्या भंडारा आगाराच्या या मुख्य बसस्थानकातील समस्या मोठी आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुटीला प्रारंभ झाला असल्याने प्रवाशांची मोठी वर्दळ आहे. बसस्थानकात पिण्याचे पाणी व विजेची समस्या नाही. परंतु स्वच्छतेबाबत उदासीनता दिसून येते. फलाट व प्रवाशी बसत असलेल्या ठिकाणी स्वच्छता दिसून येते. परंतु बसस्थानकाच्या सभोवताल स्वच्छतेच्या मोहीमेला हरताळ फासलेला दिसतो. जुन्या बसस्थानक परिसरात दुर्गंधीयुक्त वातावरण आहे. येथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून येते. बसस्थानकात पुरुष व महिला प्रसाधन गृह असले तरी पुरुष मंडळी जुन्या बसस्थानक परिसरात मुतारीसाठी जातात. त्यामुळे दुर्गंधीयुक्त वातावरण पसरलेले आहे. यासाठी सर्वस्वी आगार प्रशासन जबाबदार नसले तरी तेवढीच जबाबदारी नागरिकांचीही आहे. नागरिकांनाच मुख्य बसस्थानक स्वच्छ ठेवायचे असेल त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. एस.टी. महामंडळालाही नागरिकांचे तद्वतच प्रवाशांचेही सहकार्य अपेक्षित आहे. बसस्थानकात प्रवेश केल्यानंतर चुकून पाय खड्यात पडला तर दवाखान्याचे दर्शन महामंडळाच्या कृपेने घ्यावे लागले तर यात नवल नको. वयोवृद्ध नागरिक, महिला, लहान मुले, शालेय विद्यार्थी अशा हजारो नागरिकांची बसस्थानकावर रोजची ये जा असते. मागील एक महिन्यापासून अधूनमधून अवकाळी पावसानेही हजेरी लावली आहे. बसस्थानकात खड्डे पडल्याने त्यात पाणी साचत असते. पाणी साचल्यावर हे खड्डे किती खोल आहेत याचा अंदाज पादचारी प्रवाशांना तसेच बसचालकांना येत नाही. यामुळे खड्ड्यात पडणे किंवा बस अचानक खड्ड्यातून गेल्याने बसचेही नुकसान होते. प्रवाशांच्या अंगावर घाण पाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय घाणीमुळे दुर्गंधीचीही समस्या आहे. बसस्थानक व छत्रपती शिवाजी संकूल यामध्ये मोठा नाला आहे. या नाल्याचीही साफसफाई कित्येक महिन्यांपासून झालेली नाही. त्यामुळे बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर दुर्गंधीचा विळखा कायम आहे. बसस्थानकाच्या दुरवस्थेबाबत स्थानिक आगारव्यवस्थापनाने विभागीय नियंत्रकांना कळविले आहे. बसस्थानकात असलेल्या खड्यांची दुरुस्तीबाबतही वरिष्ठांना कळविण्यात आले आहे. वेळोवेळी थातूरमातूर डागडुजी करून वेळ काढली जाते. मात्र त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढला जात नाही. डागडुजी करण्यात मलीदा लाटण्याचा प्रकार तर होत नसावा, अशी शंकाही वारंवार व्यक्त करण्यात येते. बसस्थानकातील खड्डे हे अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहे. महामंडळाच्या प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन खड्डे दुरुस्त करावे तसेच स्वच्छता मोहीम राबविणे आवश्यक आहे. अपंग, महिला, लहान मुले, युवती असे अनेक जण बसचा प्रवास करण्यासाठी बसस्थानकात येतात. त्यांना येथे असुविधांचा सामना करावा लागतो. राज्य परिवहन महामंडळाने याची दखल घेऊन त्या उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)