शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

विजयी प्रमाणपत्र गळ्यात घालून सदस्य पोहोचले तहसीलमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2022 05:00 IST

जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक दोन टप्प्यात झाली. १९ जानेवारी रोजी निकाल घोषित झाला. जिल्हा परिषदेचे ५२ व पंचायत समितीच्या १०४ सदस्यांना विजयी प्रमाणपत्र देण्यात आले. लवकरच सत्ता स्थापन होईल अशी अपेक्षा होती. मात्र सत्ता स्थापनेच्या ना जिल्हा परिषदेत हालचाली दिसत ना पंचायत समितीत. नवनिर्वाचित सदस्यांची लोकशाहीत थट्टा केली जात असल्याचा आरोप नवनिर्वाचित सदस्य करीत आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जिल्हा परिषदपंचायत समिती निवडणुकीचा निकाल लागून तब्बल दोन महिने झाले. सत्ता स्थापनेचा तिढा मात्र अद्यापही कायम आहे. निवडून आलेल्या सदस्यांमध्ये असंतोष खदखदत असून याचाच प्रत्यय मंगळवारी तुमसरमध्ये आला. विजयी प्रमाणपत्र चक्क गळ्यात घालून काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपचे नवनिर्वाचित सदस्य तहसीलमध्ये पोहोचले. प्रशासनाचे लक्ष वेधत शासनाला निवेदन पाठविले. जिल्हा परिषदपंचायत समितीची निवडणूक दोन टप्प्यात झाली. १९ जानेवारी रोजी निकाल घोषित झाला. जिल्हा परिषदेचे ५२ व पंचायत समितीच्या १०४ सदस्यांना विजयी प्रमाणपत्र देण्यात आले. लवकरच सत्ता स्थापन होईल अशी अपेक्षा होती. मात्र सत्ता स्थापनेच्या ना जिल्हा परिषदेत हालचाली दिसत ना पंचायत समितीत. नवनिर्वाचित सदस्यांची लोकशाहीत थट्टा केली जात असल्याचा आरोप नवनिर्वाचित सदस्य करीत आहेत. प्रशासकांच्या हाती सत्ता असल्याने सदस्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. यामुळे संतप्त झालेले काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य रमेश पारधी, पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे, कंचनलाल कटरे, नरेंद्र गेडाम, राष्ट्रवादीचे हिराचंद पुरामकर व भाजपच्या पंचायत समिती सदस्य सुशीला पटले यांनी थेट तहसील कार्यालय गाठले. गळ्यात विजय प्रमाणपत्र घालून अभिनव निषेध  नायब तहसीलदार पेंदाम यांना निवेदन सदर करण्यात आले.

...तर सदस्यत्वाचे राजीनामे देऊ- राज्य शासनाकडून सत्तास्थापनेसंबंधी अधिसूचना जाहीर झाली नाही. जनतेने निवडून दिल्यानंतर त्यांची कामे करता येत नसली तर विजयी प्रमाणपत्राचे करायचे काय, असा प्रश्न सदस्यांना पडला आहे. केवळ प्रमाणपत्र घेऊन करायचे काय, असा सवाल सदस्य विचारत आहेत. सत्ता स्थापनेची अधिसूचना निघाली नाही तर आपले राजीनामे जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा इशारा या सदस्यांनी दिला. एवढेच नाहीतर जिल्हाधिकारी कार्यालयावर नवनियुक्त सदस्यांसह नागरिकांचा मोर्चा काढण्यात  येईल, असेही या निवेदनात म्हटले आहे.

विकासकामांना खीळ- निवडणूक होऊनही जिल्हा परिषद व पंचायत समितीत प्रशासक राज सुरू आहे. अधिकारी आपल्या मर्जीने काम करीत आहेत. नागरिक निवडून आलेल्या सदस्यांकडे तक्रारी, कामे घेऊन येत आहेत. मात्र नागरिकांचे काम वेळेवर होत नाही. शासनाच्या विकासकामांना व विविध योजनांना खीळ बसत आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कुणाचाच वचक नाही. नवनियुक्त सदस्यांना कार्यालयात मनस्ताप सहन करावा लागतो. आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गंभीर दखल घेऊन प्रशासक राज संपुष्टात आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषदpanchayat samitiपंचायत समिती