शहरं
Join us  
Trending Stories
1
२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, दुबार मतदारावरही उचललं पाऊल
2
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
3
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
4
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
5
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
6
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
7
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
8
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
10
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
11
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
12
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
13
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
14
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
15
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
16
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
17
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
18
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
19
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
20
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर

औषधीयुक्त ‘जांभुळ’ झाड होतेय दुर्मिळ

By admin | Updated: June 17, 2016 00:42 IST

बहुऔषधी गुणयुक्त १०० वर्षांपेक्षा अधिक काळ जगणारा आणि इतरांनाही शतावरी करण्यात उपयुक्त ‘जांभुळ वृक्ष’ अलिकडे दुर्मिळ होत आहे.

आयुर्वेदात वृक्षाला मोठे महत्त्व : १०० वर्षांपेक्षा अधिक जगणारे झाडलाखांदूर : बहुऔषधी गुणयुक्त १०० वर्षांपेक्षा अधिक काळ जगणारा आणि इतरांनाही शतावरी करण्यात उपयुक्त ‘जांभुळ वृक्ष’ अलिकडे दुर्मिळ होत आहे. वाढती वृक्षतोड याचे प्रमुख कारण आहे. परिणामी, जांभुळ फळाचे दर्शनही दुर्मिळ होत आहे. जून महिना लागताच १०० रूपये किलो प्रमाणे ही फळे खरेदी करावी लागतात. जांभळाची फळे नव्हे तर पाने, फुले, साल, खोड आणि बियांचाही औषधी म्हणून उपयोग होतो. आयुर्वेदात या वृक्षाला मोठे महत्त्व आहे.मे व जून महिन्याच्या कालावधीत ‘डोंगराची काळी मैना’ म्हणून जांभुळाचे आगमन होते. जांभळात लोहाचे प्रमाण अधिक असते. मधुमेहाच्या आजारात हे फळ महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याने त्या रूग्णांसाठी ही फळे वरदानच ठरली आहेत. मधुमेहासोबतच रक्तदाब, कर्करोग, हृदयरोग, अस्थमा या आजारांतही जांभळाचे सेवन उपयुक्त ठरते. दररोज ४ ते ५ जांभळाचे सेवन केल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे शक्य होते. रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासह हिरड्यांचे आरोग्य उत्तम राखण्यात जांभळे महत्त्वाची भूमिका पार पाडतात. जांभळाची महती औषधी गुणधर्मावरच थांबत नाही तर जांभूळ हे उत्तम सौंदर्यप्रसाधक म्हणूनही काम करते. या फळापासून वाईन, व्हीनेगर, जेली, शरबत आदी तयार करण्यास अलिकडे सुरूवात झाली आहे. यातून नवीन उद्योगाची उभारणी होऊ लागली आहे. अशा उद्योगांकडून थेट जांभुळ खरेदी होत असल्याने त्याचा परिणाम खुल्या बाजारपेठेवर होऊ लागला आहे. यामुळे पूर्वी दिसणारी जांभळं आता बाजारात ठरावीक ठिकाणी दिसतात. या वृक्षाचे लाकूड टिकाऊ व पाणीरोधक असल्याने ते किमान १०० वर्षे टिकते. आता इमारती सिमेंटच्या असल्या तरी पूर्वी जांभुळ वृक्षाच्या राहत होत्या. बहुऔषधी, बहुपयोगी गुणधर्म जांभूळ झाडांसाठी अलिकडे कर्दनकाळ ठरला आहे. मानवाने निसर्गाकडून काही घेण्याच्या मोबदल्यात वृक्ष लागवड केली नाही. यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. (तालुका प्रतिनिधी)औषधी गुणधर्मच ठरला कर्दनकाळजांभूळ या वृक्षाचा औषधी व बहुपयोगी गुणधर्मच त्या वृक्षासाठी कर्दनकाळ ठरत असल्याचे दिसते. लाकूड व औषधासाठी वृक्षांची कटाई होते. पण जांभूळ वृक्षांची लागवड होताना दिसत नाही. यामुळे ग्रामीण भागातूनही हे वृक्ष दिसेनासे होत असल्याचेच चित्र पाहावयास मिळत आहे.