शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

नीट न देता मेडिकल प्रवेश; तज्ज्ञ, विद्यार्थ्यांना काय वाटते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:44 IST

तज्ज्ञ म्हणतात नीट हवीच : विद्यार्थ्यांच्या बुद्धिकौशल्याला फाटा फोडू नये भंडारा : तमीळनाडू राज्यात नीट परीक्षेच्या २४ तासांपूर्वी एका ...

तज्ज्ञ म्हणतात नीट हवीच : विद्यार्थ्यांच्या बुद्धिकौशल्याला फाटा फोडू नये

भंडारा : तमीळनाडू राज्यात नीट परीक्षेच्या २४ तासांपूर्वी एका विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित राज्य सरकारने नीट न देता मेडिकलला प्रवेश देण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. या संदर्भात जिल्ह्यातील शिक्षणतज्ज्ञ मात्र सहमत नाहीत. विद्यार्थ्यांच्या बुद्धिकौशल्याला कधीही फाटा फोडू नये, अशी वैचारिक प्रतिक्रियाही या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

नीट ही परीक्षा केंद्र पातळीवर होत असल्याने मेडिकल क्षेत्रात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण परीक्षा आहे. विद्यार्थ्यांना या वर्षी परीक्षा न देता निकाल दिल्यामुळे बुद्धिकौशल्याची चाचपणी करणे अत्यंत गरजेचे आहे. परिणामी महाराष्ट्र नीट न देता मेडिकलला प्रवेश द्यावा काय अशी चर्चा सुरु झाली आहे. याचा सरळ सरळ फटका बुद्धिवंत व गुणवंत विद्यार्थ्यांना बसू शकतो. त्यांच्या बुद्धिकौशल्याला आयते कोलित देऊन त्यांच्यातील गुणांना विकसित न होऊ देण्याचा हा प्रयत्न राहील, असेही बोलले जात आहे.

काय आहे तमीळनाडू सरकारचा धक्कादायक निर्णय?

n तमीळनाडू राज्याने केंद्राची नीट परीक्षा नको अशी विरोधी आणि सत्ताधारी पक्षांनी मागणी केली होती. त्याचाच परिणाम म्हणून दोन दिवसांपूर्वी या राज्याने नीट परीक्षेतून राज्यातील विद्यार्थ्यांना सूट देणारे विधायक तमीळनाडू विधानसभेत मांडून ते पारितही केले. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशासाठी केंद्राची नीट परीक्षेची गरज नाही असाच या कायद्याचा सरळसरळ अर्थ काढला जात आहे. त्याच धर्तीवर अशीच मागणी अन्य राज्य सरकारही घेऊन विधेयक सादर करतील आणि अनेक राज्यांनी असा निर्णय घेतला तर केंद्रीय परीक्षांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल, असेही तज्ज्ञांना वाटत आहे.

धक्कादायक निर्णय

नीट परीक्षा ही केंद्रामार्फत घेण्यात येत असते. वैद्यकीय क्षेत्रात जाण्यासाठी विद्यार्थीदशेतील अत्यंत महत्त्वपूर्ण टर्निंग पाॅइंट आहे. नीट परीक्षा झालीच पाहिजे, असे माझे प्रांजळ मत आहे. या वर्षी कोरोनामुळे बारावीची परीक्षाही झाली नाही. परिणामी विद्यार्थ्यांच्या बुद्धिकौशल्याचे इत्थंभूत आकलन पूर्णपणे झाले असे म्हणता येणार नाही. त्यामुळे नीट परीक्षा देऊनच बुद्धिवंतांनी वैद्यकीय क्षेत्रात गेले पाहिजे. मानसिक व शैक्षणिक पातळीवर विद्यार्थ्यांचे संतुलन व कलाकौशल्य परीक्षेतून समोर येत असते. त्यामुळे अशा परीक्षेला फाटा न फोडता त्या प्रामाणिकतेने घ्याव्यात असेच आमचे खरे मत आहे. तमीळनाडू राज्य सरकारचा निर्णय योग्य नाही.

-डाॅ.विकास ढोमणे, प्राचार्य जे.एम. पटेल महाविद्यालय, भंडारा

तमीळनाडू सरकारने नीट परीक्षा न देण्याबाबत घेतलेला निर्णय चुकीचा आहे असे आम्हाला वाटते. गुणवंत विद्यार्थी खऱ्या अर्थाने या परीक्षेची चातकाप्रमाणे वाट पाहत असतात. परीक्षाच होत नसेल तर बेसिक शिक्षणाचा पायाही कच्चा राहू शकतो. त्यामुळे अन्य राज्य सरकारने असा कुठलाही निर्णय घेऊ नये, असे आम्हा विद्यार्थ्यांना वाटत आहे.

-एक विद्यार्थी

विद्यार्थ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

कोरोनामुळे बारावीची परीक्षा झाली नाही. अंतर्गत मूल्यमापनावर बुद्धिकौशल्याचा कस लावून गुण देण्यात आले. आरोग्यासारख्या विषयावर अवलंबून असलेल्या नीट परीक्षा व्हायलाच हवी, असे माझे प्रामाणिक मत आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा कुठेही लाॅस होऊ नये याचीही खबरदारी प्रत्येक राज्य सरकारने घेणे गरजेचे आहे. तमीळनाडू राज्य सरकारचा निर्णय चुकला असेच मला वाटते. नीट परीक्षा व्हायलाच हवी.

-अशोक पारधी,

कार्याध्यक्ष, मुख्याध्यापक संघ विदर्भ.