शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

यांत्रिकीकरणात लोहारांचा भाता थंडावला

By admin | Updated: May 11, 2015 00:18 IST

अस्मानी संकटाच्या माऱ्याने संपूर्ण पीक शेतकऱ्यांच्या हाती आले नाही. याचा फटका शेतीपूरक व्यवसाय व शेतीशी ....

शेतीचे उत्पादन घटल्याने परिस्थिती : परंपरागत व्यवसायावर अवकळाभंडारा : अस्मानी संकटाच्या माऱ्याने संपूर्ण पीक शेतकऱ्यांच्या हाती आले नाही. याचा फटका शेतीपूरक व्यवसाय व शेतीशी निगडित व्यवसायांवरही पडला आहे. शेतीत वाढत्या यांत्रिकीकरणामुळे लोहार कुटुंबीयांचा भाता थंडावला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.यंदाच्या अत्यल्प पावसाने खरीप हंगाम हातचा गेला. रबी हंगामातही अवकाळी पाऊस आणि तुरळक गारपिटीचा तडाखा बसला. यामुळे शेतीसह पूरक व जोड उद्योगधंदे ऱ्हासाच्या मार्गावर आहेत. शेती निगडित अवजारे तयार करणाऱ्या लोहार कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आली आहे. भात्यासमोर तासन्तास बसून ऐरणीच्या देवाला स्मरत अवजारे घडवून लोहारा समाज पोटासाठी चार घास गोळा करतो. गावोगाव परिभ्रमण करत पाल ठोकून निवारा मांडणारे लोहार बांधव शेतकऱ्यांसाठी विळा, कोयते, कुऱ्हाडी, वखर व डवऱ्याची पास, कोळपी, कुदळ आदी अवजारे निर्मिती व दुरुस्ती करून उदरनिर्वाह चालवित असतात. एका गावातील कामे संपली की दुसऱ्या गावात अशी मजल दरमजल करीत ही कुटुंबे रोजगाराच्या मागे फिरत जातात. भंडारा तालुक्यात या समाजाची ५-१० कुटुंबे वास्तव्यास आहेत. ही सर्व कुटुंबे अनेक वषार्पासून भंडारा येथील घटक बनली आहेत. परिसरातल्या शेतकऱ्यांची अवजारे तयार करून किंवा दुरुस्त्या करून ही कुटुंबे आपला उदरनिर्वाह चालवितात. परंतु यावर्षी शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतीच्या अवजाराची कामे बंद आहेत. ऐन पेरणीच्या कालावधीत फार थोडी चिल्लर कामेच आता शेतकरीवर्ग करतील, असे निराशाजनक मत त्यांनी व्यक्त केले. बैलगाड्यांची लाकडी चाकेही आता इतिहास जमा होवून त्यांची जागा लोखंडी चाकांनी घेतली आहे. पूर्वी या लाकडी चाकांवर असलेल्या लोखंडी येटाची दुरुस्तीची कामेही लोहार कुटुंब करीत होते. यांत्रिकी करणामुळे निश्चितच लोहारांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. (नगर प्रतिनिधी)