शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

मातृत्व योजनेचे साडेसहा कोटींचे अनुदान थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 22:11 IST

केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयातर्फे राज्यातील भंडारा व अमरावती या दोनच जिल्ह्यांसाठी सुरू केलेल्या इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेला हरताळ फासला जात आहे.

ठळक मुद्देलाभार्थ्यांची परवड : बालमृत्यू थांबविण्याच्या उपाययोजनांना हरताळ

शिवशंकर बावनकुळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयातर्फे राज्यातील भंडारा व अमरावती या दोनच जिल्ह्यांसाठी सुरू केलेल्या इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेला हरताळ फासला जात आहे. एकट्या भंडारा जिल्ह्यातील लाभार्थ्यांचे सहा कोटी ६६ लाख रूपये शासनाकडे थकीत आहेत. बालमृत्यु, कुपोषण थांबवून गर्भवती महिलांचे पोषण करण्यासाठी ही योजना राबविली जाते. मात्र आता या योजनेऐवजी प्रधानमंत्री मातृवंदना ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र तीन वर्षांपासून लाभार्थी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहे.इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना महिला व बालकल्याण विभागाकडे होती. त्यावेळेस भंडारा जिल्ह्यात एप्रिल २०१६ ते ३० डिसेंबर २०१६ या कालावधीमध्ये ११ हजार ५५६ लाभार्थ्यांचे सहा कोटी ६६ लाख ३० हजार ४०० रूपये अनुदान थकीत आहे. दुर्गम भागातील लहान मुलांचे पोषण अधिक चांगल्या प्रकारे व्हावे, गर्भवतीच्या कुपोषणामुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढू नये यासाठी देशातील ५२ निवडक जिल्ह्यात ही योजना राबविली जाते.अंगणवाडी सेविकेमार्फत या योजनेची अंमलबजावणी केली जाते. राज्यातील भंडारा व अमरावती या दोन जिल्ह्याचा यात समावेश करण्यात आला. एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत मातृत्व सहयोग योजनेतून लाभार्थ्यांना दोन हप्त्यांमध्ये सहा हजार रूपये दिले जात होते. यात पहिला हप्ता गर्भधारनेचा तिसऱ्या महिन्यात व दुसरा हप्ता सर्व अटीची पूर्तता केल्यानंतर बाळंतपणानंतर सहा महिन्याच्या आत दिला होता. गर्भधारणा व स्तनदा काळातील गमावलेल्या मजुरीची भरपाई करणे हा या योजनेचा उद्देश आहे.प्रामुख्याने रोजगार व हातमजुरी करून उदरभरण करणाºया महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. परंतु भंडारा जिल्ह्यात तीन वर्षांपासून या योजनेचे अनुदान मिळाले नाही त्यामुळे अनेकांचा हिरमोळ झाला आहे.११ हजार ५५६ खाते निरंकभंडारा जिल्ह्यात एप्रिल २०१६ ते ३० डिसेंबर २०१६ या कालावधीतील ११ हजार ५५६ लाभार्थ्यांचे सहा कोटी ६६ लाख रूपयांचे अनुदान प्रलंबित आहे. यात भंडारा तालुका ९ लाख ४६ हजार ४००, मोहाडी तालुका ५२ लाख ३१ हजार, तुमसर तालुका १ कोटी ८२ लाख ६३ हजार, लाखनी तालुका ९९ लाख ४२ हजार ६००, साकोली तालुका ७३ लाख ४१ हजार, पवनी तालुका १ कोटी ९७ हजार, लाखांदूर तालुका ७ लाख ९१ हजार असे अनुदान रखडले आहे.योजनेच्या नावात बदलया योजनेच्या नावात बदल करून केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृवंदना योजना संपूर्ण देशात १ जानेवारी २०१७ पासून सुरू केली आहे. या योजनेसाठी राज्य शासनातर्फे ४० टक्के तर ६० टक्के केंद्रसरकारचा निधी राहणार आहे. या योजनेतून गर्भवती व स्तनदा मातांना सकस आहार मिळून नवजात बालकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे. त्यासाठी ही योजना कार्यान्वीत केली.मातृत्व सहयोग योजनेसाठी शासनाकडून अनुदान प्राप्त झाले नाही. त्यासाठी वरिष्ठ स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. अनुदान प्राप्त न झाल्याने लाभार्थ्यांना अर्थसहाय करता आले नाही.-मनिषा कुलसुंगे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण विभाग भंडारा.