शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

गायत्री महायज्ञात नाना पटोले यांचा विवाह संस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2017 00:19 IST

खासदार नाना पटोले यांच्या लग्नाचा २६ वा वाढदिवस २४ कुंडीय गायत्री महायज्ञात साजरा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खासदार नाना पटोले यांच्या लग्नाचा २६ वा वाढदिवस २४ कुंडीय गायत्री महायज्ञात साजरा करण्यात आला. यामध्ये खासदार नाना पटोले व त्यांच्या पत्नी मंगला पटोले यांचा हिंदू पद्धतीने विवाह संस्कार करून त्यांच्याकडून लग्नाच्या अटी व शर्ती वदविण्यात आल्या. दोघांनीही समाज कार्यासाठी तसेच पीडित, दलित, आदिवासी व इतर मागासवर्गीय तसेच सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी उर्वरित आयुष्य घालविण्याची साक्ष दिली. यावेळी उपस्थित जनसमुदायाने या दांम्पत्यावर पुष्पवृष्टी व आशीर्वादाचा वर्षाव केला.स्व.फाल्गूनराव पटोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित श्रीराम कथामृतच्या चवथ्या दिवशी शांतीकुंज हरिद्वारच्या तत्वावधानात व गायत्री शक्तीपीठ, गोंदियाच्या वतीने सुकळी येथे २४ कुंडीय गायत्री महायज्ञाचे डॉ.विपीन बैस व गोविंद येळे (सेवानिवृत्त डीएफओ) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले. या २४ कुंडीय गायत्री महायज्ञ व प्रज्ञा पुराणाचे याप्रसंगी आयोजन जनहिताकरिता व पर्यावरण संतुलनासाठी करण्यात आले होते. या यज्ञाच्या माध्यमातून भंडारा - गोंदिया जिल्ह्यातील लोकांचा विकास व्हावा व सर्वसामान्य जनतेची दिवसेंदिवस प्रगती व्हावी अशी मंगलमय कामना करण्यात आली. याप्रसंगी भरतराव कोरे गुरुजी व पवनरेखा चोपलाल पटले यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला.श्रीराम कथामृतच्या पाचव्या दिवशी प्रजापिता ब्रम्हकुमारी द्वारा संगीतमय गीताज्ञान आयोजित करण्यात आले. तर सहाव्या दिवशी जगतगुरु नरेंद्रचार्य महाराज भक्तसेवा मंडळ यांच्यावतीने भक्तीमय कार्यक्रम सादर करण्यात आला. याप्रसंगी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते देखील हजर होते. २९ मे ते ४ जूनपर्यंत आयोजित श्रीराम कथामृत सप्ताहाच्या निमित्ताने गुरुदेव आश्रम मोझरीचे सर्वाधिकारी प्रकाशपंत वाघ महाराज यांनी दररोज सकाळी व सायंकाळी उपस्थित भाविकांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची प्रासंगिकता व इतर साधुसंतांच्या विचाराने अवगत करून श्रीराम चरित्र महिमाच्या रुपाने बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किन्धा कांड, सुंदरकांड, लंकाकांड व रामायण महात्मे तुलसी विल आणि फलश्रूती ने सुकळी येथे सकाळी व सायंकाळी येणारे भाविकजन मंत्रमुग्ध झाले. या भव्यदिव्य कार्यक्रमाच्या निमित्ताने सुकळी या गावाला जणूकाही धार्मिक यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.