शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

बाजारपेठ पडली ओस

By admin | Updated: November 15, 2016 00:24 IST

देशाच्या चलनातून नोटा बंद केल्याने नागरिकांना मोठा आर्थिक प्रश्न भेडसावत आहे.

नोटा बंदचा फटका : बँकासह एटीएमही बंदभंडारा : देशाच्या चलनातून नोटा बंद केल्याने नागरिकांना मोठा आर्थिक प्रश्न भेडसावत आहे. आज गुरुनानक जयंती असल्याने बँक बंद होत्या. त्यामुळे बँक व एटीएममधूनही पैसे उपलब्ध झाले नसल्याने नागरिकांची परिस्थिती कोंडीत सापडल्यागत झाली. बँक बंद असल्याने याचा परिणाम बाजारपेठेवरही दिसून आला. भंडारा शहरातील बाजारपेठेत सोमवारला शुकशुकाट दिसून आला. दिवाळीनंतरही बाजारपेठेत खरेदीदारांची रेलचेल होती. मात्र चलनी नोटा बंद झाल्याने याचा विपरित परिणाम बाजारपेठेवर दिसू लागला आहे. सोमवारला बँक बंद असल्यामुळे सदर प्रतिनिधीने शहरातील बाजारपेठेत फेरफटका मारला असता शुकशुकाट दिसून आला. लाखो रूपयांची उलाढाल होणाऱ्या बाजारपेठेतील ‘गल्ला’ अर्ध्यापेक्षाही कमीवर आला होता.८ नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० रूपयांची नोट बंद करण्याची घोषणा केली. त्यामुळे नागरिकांकडे पैसा असूनही त्याचा वापर बंद झाला. पैशाचा विनियोग करता यावा, यासाठी शासनाने मुदत दिली आहे. चलनी नोटा बंद केल्याने नागरिकांना २००० रूपयांची व १०० रूपयांचा नोटा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र या नोटांचा तुटवडा भरून निघालेला नाही. बँकामध्ये पैशांची अदलाबदल करून मिळत असले तरी हक्काच्या पैशाचा वापर करण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे. नागरिकांना सुविधा देण्याच्या दृष्टीने शनिवार व रविवारला सुटीच्या दिवशी बँकीग व्यवहार सुरू ठेवले होते. परंतु पाहिजे त्या प्रमाणात पैसे उपलब्ध न झाल्यामुळे नागरिकांची ओरड सुरुच आहे. (शहर प्रतिनिधी)पैशासाठी नागरिकांची वणवणबँक व एटीएम केंद्रातून मोजकी रक्कम मिळत असल्याने नागरिक हतबल झाले आहे. सोमवारला बँका बंद असल्याने आर्थिक व्यवहार कोलमडला. काही एटीएम केंद्रातून पैसे मिळत असल्याची माहिती होताच अनेकांनी केंद्र गाठले. मात्र तिथे पोहचेपर्यंत तेथील रक्कम संपल्यामुळे अनेकांना निराश होऊन परतावे लागले. स्टेट बँकेच्या मिस्कीनटँक शाखेतील एटीएममधून पैसा मिळत असल्याने नागरिकांची रांग लागली होती.आर्थिक अर्धांगवायुचा झटकासोमवार आठवड्याचा पहिला दिवस असला तरी गुरुनानक जयंतीमुळे बँका बंद होत्या. अगोदरच पैशाची चणचण असताना बँक व एटीएम बंद असल्यामुळे नागरिकांना जणू ‘आर्थिक अर्धांगवायू’ चा झटका बसल्याची परिस्थिती उद्भवली. आज बँका बंद असल्या तरी अनेकांना याची कल्पना नसल्याने त्यांनी सकाळीच बँक गाठली. कित्येकजण लवकर नंबर लागावा या हेतूने रांगेत उभेही झाले. बँकेचा वेळ निघून गेल्यावरही बँक सुरु न झाल्यामुळे आज बँक बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांना आल्यापावली परतावे लागले.