शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

‘आशां’चा जिल्हा परिषदेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 06:00 IST

महाराष्ट्र राज्य आशा कर्मचारी युनियन आयटक जिल्हा शाखेच्या वतीने आशा कर्मचाऱ्यांचा मोर्चा बसस्थानक भंडारा येथून काढून जिल्हापरिषदेवर नेण्यात आला. आशा कर्मचाऱ्यांना ज्या कामाचा कसलाच मोबदला मिळत नाही, ते काम आयुष्यमान भारत योजना असो की, निप्पी सायरप, आयपीएफ गोळया, स्किनिंग इत्यादी कामे असोत या सर्व कामांचा बहिष्कार केला जाईल,........

ठळक मुद्देअतिरिक्त कामांवर बहिष्काराचा इशारा : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र राज्य आशा कर्मचारी युनियन आयटक जिल्हा शाखेच्या वतीने आशा कर्मचाऱ्यांचा मोर्चा बसस्थानक भंडारा येथून काढून जिल्हापरिषदेवर नेण्यात आला. आशा कर्मचाऱ्यांना ज्या कामाचा कसलाच मोबदला मिळत नाही, ते काम आयुष्यमान भारत योजना असो की, निप्पी सायरप, आयपीएफ गोळया, स्किनिंग इत्यादी कामे असोत या सर्व कामांचा बहिष्कार केला जाईल, अशी घोषणा आशा कर्मचाऱ्यांच्या मोर्च्यासमोर युनियनचे अध्यक्ष शिवकुमार गणवीर यांनी केली.मोर्च्याचे नेतृत्व युनियनचे अध्यक्ष शिवकुमार गणवीर, आयटकचे जिल्हा सचिव हिवराज उके, जिल्हा संघटक राजू बडोले व जिल्हा सचिव सुनंदा दहिवले यांनी केले.आशा कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व केंद्रीय कामगार संघटनाच्या मागणीनुसार दरमहा १८ हजार रुपये किमान वेतन देण्यात यावे, शासकीय सेवेत सहभागी करण्यात यावे, अंगणवाडी कर्मचारी संपकाळात केलेल्या कामाचा मोबदला देण्यात यावे, राष्ट्रीय आरोग्य अभियान कायमपणे राबविण्यात यावे, प्रोमोटर्सच्या मोबदल्याचे प्रलंबित बिल द्या, स्टेशनरी पुरवा व विविध कागदपत्राच्या झेरॉक्सचे बिल द्या, ज्या कामाचा मोबदला देण्यात येत नाही ते काम ‘आशा’ कडून करवून घेवू नये, जसे एपीएल, महिलांचे बाळंतपण, आयुष्यमान भारत योजना, निप्पी सायरप, आयपीएफ गोळया वाटने, स्किनिंग करने आदी कामे या पुढे आशा कर्मचारी करणार नाही, प्रत्येक मिटींगचा ३०० रुपये भत्ता द्या, आशांना व त्यांच्या कुटूंबियांना आरोग्याच्या सर्व सुविधा द्या, आशांना मानधन दिल्या जाणाºया बँकेतून कर्ज पुरवठ्याची सोय करा व गोवर रुबेला कामाचा मोबदला द्या आदी मागण्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे देण्यात आले.सदर मागण्यांचे निवेदन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.लतिका गरुड यांनी स्विकारले. त्यांनी स्थानिक मागण्या मान्य करुन मानधन वाढीच्या मागणीचा शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले.शिष्टमंडळात शिवकुमार गणवीर, हिवराज उके, सुनंदा दहिवले, भूमिका वंजारी, आशिषा मेश्राम, साधना बडोले, सविता नारनवरे, डाकरे आदींचा समावेश होता.शेवटी शिवकुमार गणवीर यांनी झालेल्या चर्चेची माहिती दिली तर हिवराज उके यांनी समारोप केला. वामनराव चांदेवार, राजू बडोले व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. मोठया संख्येत जिल्ह्यातील आशा कर्मचारी मोर्च्यात प्रामुख्याने सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Morchaमोर्चा