शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

‘आशां’चा जिल्हा परिषदेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 06:00 IST

महाराष्ट्र राज्य आशा कर्मचारी युनियन आयटक जिल्हा शाखेच्या वतीने आशा कर्मचाऱ्यांचा मोर्चा बसस्थानक भंडारा येथून काढून जिल्हापरिषदेवर नेण्यात आला. आशा कर्मचाऱ्यांना ज्या कामाचा कसलाच मोबदला मिळत नाही, ते काम आयुष्यमान भारत योजना असो की, निप्पी सायरप, आयपीएफ गोळया, स्किनिंग इत्यादी कामे असोत या सर्व कामांचा बहिष्कार केला जाईल,........

ठळक मुद्देअतिरिक्त कामांवर बहिष्काराचा इशारा : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र राज्य आशा कर्मचारी युनियन आयटक जिल्हा शाखेच्या वतीने आशा कर्मचाऱ्यांचा मोर्चा बसस्थानक भंडारा येथून काढून जिल्हापरिषदेवर नेण्यात आला. आशा कर्मचाऱ्यांना ज्या कामाचा कसलाच मोबदला मिळत नाही, ते काम आयुष्यमान भारत योजना असो की, निप्पी सायरप, आयपीएफ गोळया, स्किनिंग इत्यादी कामे असोत या सर्व कामांचा बहिष्कार केला जाईल, अशी घोषणा आशा कर्मचाऱ्यांच्या मोर्च्यासमोर युनियनचे अध्यक्ष शिवकुमार गणवीर यांनी केली.मोर्च्याचे नेतृत्व युनियनचे अध्यक्ष शिवकुमार गणवीर, आयटकचे जिल्हा सचिव हिवराज उके, जिल्हा संघटक राजू बडोले व जिल्हा सचिव सुनंदा दहिवले यांनी केले.आशा कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व केंद्रीय कामगार संघटनाच्या मागणीनुसार दरमहा १८ हजार रुपये किमान वेतन देण्यात यावे, शासकीय सेवेत सहभागी करण्यात यावे, अंगणवाडी कर्मचारी संपकाळात केलेल्या कामाचा मोबदला देण्यात यावे, राष्ट्रीय आरोग्य अभियान कायमपणे राबविण्यात यावे, प्रोमोटर्सच्या मोबदल्याचे प्रलंबित बिल द्या, स्टेशनरी पुरवा व विविध कागदपत्राच्या झेरॉक्सचे बिल द्या, ज्या कामाचा मोबदला देण्यात येत नाही ते काम ‘आशा’ कडून करवून घेवू नये, जसे एपीएल, महिलांचे बाळंतपण, आयुष्यमान भारत योजना, निप्पी सायरप, आयपीएफ गोळया वाटने, स्किनिंग करने आदी कामे या पुढे आशा कर्मचारी करणार नाही, प्रत्येक मिटींगचा ३०० रुपये भत्ता द्या, आशांना व त्यांच्या कुटूंबियांना आरोग्याच्या सर्व सुविधा द्या, आशांना मानधन दिल्या जाणाºया बँकेतून कर्ज पुरवठ्याची सोय करा व गोवर रुबेला कामाचा मोबदला द्या आदी मागण्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे देण्यात आले.सदर मागण्यांचे निवेदन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.लतिका गरुड यांनी स्विकारले. त्यांनी स्थानिक मागण्या मान्य करुन मानधन वाढीच्या मागणीचा शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले.शिष्टमंडळात शिवकुमार गणवीर, हिवराज उके, सुनंदा दहिवले, भूमिका वंजारी, आशिषा मेश्राम, साधना बडोले, सविता नारनवरे, डाकरे आदींचा समावेश होता.शेवटी शिवकुमार गणवीर यांनी झालेल्या चर्चेची माहिती दिली तर हिवराज उके यांनी समारोप केला. वामनराव चांदेवार, राजू बडोले व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. मोठया संख्येत जिल्ह्यातील आशा कर्मचारी मोर्च्यात प्रामुख्याने सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Morchaमोर्चा