शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘मार्च एंडिंग’ने बळीराजा दुखावला

By admin | Updated: March 29, 2015 01:00 IST

निसर्ग कोपला तर सारं काही क्षणात मातीमोल होतं याचा प्रत्यक्ष अनुभव आज बळीराजा अनुभवत आहे.

निलागोंदी : निसर्ग कोपला तर सारं काही क्षणात मातीमोल होतं याचा प्रत्यक्ष अनुभव आज बळीराजा अनुभवत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गारपीट, वादळवारा, पाऊस व ढगाळ वातावरण यामूळे गावागावांत आजार बळावत आहेत.वर्षभर शेतकरी काबाडकष्ट करतो. जीवाचे रान करतो. मुलांच्या शिक्षणाची तुटपुंज्या खर्चात सोय लावण्याचा नेहमी प्रयत्न करतो, परंतु त्याला त्याच्या कुटुंबीयांचे स्वप्न पूर्ण करता येत नाहीअवकाळी पावसाने शेतातील उन्हाळी धानपीक, चणा, गहू, उडीद, इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात भाजीपाला मातीमोल भावात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यात कुटुंबाचा उदरनिर्वाह ही मुख्य जबाबदारी पूर्ण करताना मुला-मुलींचे विवाह सोहळे पूर्ण कसे करायचे, असा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. यातच आर्थिक टंचाई असताना बँकाचा कर्जवसुलीचा फटका शेतकऱ्याचा जीवघेणा ठरत आहे. बँकेकडून घेतलेले कर्ज ३१ मार्चपर्यंत शून्य व्याज दराने फेडायचे कसे, असा प्रश्न त्याला पडला असताना तो जीवाचा आटापिटा करतो आहे. खासगी सावकाराकडे जाऊन सावकार नो क्रेडिट नावाखाली परत फरतो. बँकेचे आधीचेच कर्ज डोक्यावर असल्याने बळीराजा आर्थिक विंवचनेत कुचल्या जात आहे.शेती उत्पादनावर आधारित गोडाऊनची सोय नसल्याने भाजीपाला व इतर धान्य साठवणूक करण्याची सोय नसल्याने शेतीचे वाण बेभाव विकावे लागत असल्याने शेतकऱ्याला योग्य भाव मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.निवडणुकीपूर्वी विविध पक्षांचे नेते शेतकऱ्याला आश्वासनाची माळ घालतात, परंतु निवडून आल्यावर ती आपोआपच केव्हा सुकून जाते ते मात्र न उलगडणारे एक कोडेच असते. शेतकरी या दुष्काळाच्या विळख्यातून सतत बाहेर पडण्याची स्वप्न पाहत असतो. पण त्याचेच स्वप्न केवळ हवेत विरुन जातात. धानाला योग्य भाव नसल्याने शेतकऱ्याने साठवून ठेवलेली धान्याची कोठारे तशीच पडून आहेत. यामुळे कुटुंबाची स्वप्ने तो पूर्ण करु शकत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करायला आज कुणाजवळ वेळही नाही ही आजच्या शेतकऱ्याची शोकांतिका आहे. व्यापाऱ्याला धान विकल्यावरही नकदी भावाने चुकारे मिळत नसल्याने ३१ मार्चपूर्वी कर्ज भरायचे कसे हा आर्थिक संकट शेतकऱ्यावर दडपण वाढवत असून कुटुंबाची दैनावस्था होण्यास कारणीभूत ठरत आहे. बँकेचे कर्ज, सावकाराचे कर्ज, मुलामुलीचे लग्न, नातेवाईक मंडळीकडे असणारे लग्न व त्यासाठी करावयाचे खर्च, कौटुंबिक खर्च, शिक्षणाचा खर्च या सर्व खर्चाला आज शेतकरी कंटाळला असला, तरी आशेवर किती दिवस काढायचे, असा सवाल शेतकरी करीत आहे. शेतकऱ्याचा कोणी वाली आहे का? त्याने शेतकऱ्याचे अश्रू पुसून दिलासा द्यावा, अशी मागणी या परिसरातील शेतकरी बंधंूनी केली आहे. (वार्ताहर)