शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
4
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
5
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
6
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
7
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
8
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
9
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
10
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
11
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
12
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
13
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
14
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
15
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
17
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
18
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
19
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
20
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'

जिल्ह्यातील मालगुजारी तलाव निरूपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:44 PM

पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस येत असला तरी जिल्ह्यातील माजी मालगुजार तलावात पाणी साठविण्याची योजना नाही. ऐकेकाळी हजारो एकर शेतीला सिंचनाची सोय करून देणारे मालगुजारी तलाव शासन व संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे निरूपयोगी ठरत आहेत. दरवर्षी तलावातील गाळ काढण्यासाठी योजना आखण्यात येते. काही तलावात ही योजना यशस्वी होते तर काही तलाव भ्रष्टाचारामुळे पोखरत आहे.

ठळक मुद्देगाळ साचल्यामुळे साठवणूक कमी : तलावाच्या दुरूस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस येत असला तरी जिल्ह्यातील माजी मालगुजार तलावात पाणी साठविण्याची योजना नाही. ऐकेकाळी हजारो एकर शेतीला सिंचनाची सोय करून देणारे मालगुजारी तलाव शासन व संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे निरूपयोगी ठरत आहेत. दरवर्षी तलावातील गाळ काढण्यासाठी योजना आखण्यात येते. काही तलावात ही योजना यशस्वी होते तर काही तलाव भ्रष्टाचारामुळे पोखरत आहे.जिल्ह्यात शंभर वर्षापुर्वी जलसंघटनाची मोठी योजना होती. त्या काळातील मालगुजारांनी लोकसहभागातून मालगुजारी तलावांची निर्मिती केली. तालुक्यात अशा मालगुजारी तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र या मालगुजारी शिवनीबांध, कुंभली, गुढरी येथील लघुप्रकल्पाशिवाय जुन्या तलावाची संख्या मोठी आहे. एकोडी, चांदोरी, आमगाव, वलमाझरी, पिंडकेपार, पाथरी, सावरगाव, खंडाळा, उमरी, लवारी, सितेपार, सानगडी, केसलवाडा या गावामध्ये माजी मालगुजारी तलाव आहेत. जिल्ह्यात लघुपाटबंधारे विभागा अंतर्गत असलेल्या अध्यक्ष, लघु व जुन्या मामा तलावांची संख्या ६४ टक्के आहे. मध्यम प्रकल्पात चार तर लघुकालव्याची संख्या ३२ आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील लधु दोन हजार २६७ मामा तलावापैकी १६०२ मामा तलाव भंडारा जिल्ह्यात आहेत. पूर्वी अशा तलावाची मालकी परिसरातील मालगुजाराकडे होती. मात्र १९५० च्या संपत्ती हक्क कायद्यानुसार हे मामा तलाव शासनाकडे गेले आहेत.त्यामुळे तलावांचा सामान्य जनता व शेतकऱ्यांशी संबंध तुटला. महाराष्ट्र राज्य घोषित झाल्यानंतर शासनाने १९६३ मध्ये देखभाल व पाणीवाटप व्यवस्थापक करण्यासाठी नेमलेल्या बर्वे आयोगाच्या शिफारशीनुसार दुरूस्ती व पाणी वाटपावर पाणीकर आकारायचे ठरविण्यात आले. याला त्यावेळी जनतेनी विरोध केला होता. मात्र शासनाने त्याची दखल घेतली नाही. तेव्हापासून या तालुक्याची दुरावस्था झाली आहे.जिल्हा परिषदेला लघु पाटबंधारे विभागाकडे आलेले मालगुजारी तलाव रोहयोच्या कामापुरते उरले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात भरलेला तलाव दोन महिन्यातच रिकामा होतो. शयाकडे सिंचनाबरोबरच जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. शासनाने तलाव ताब्यात घेतले मात्र देखभाल दुस्स्तीकडे दुर्लक्ष केले. शासनाने जर तलावाचे खोदकाम मातीकाम जिर्ण पर्यायी दुरूस्ती गाळ काढणे याकडे लक्ष देवून -- केल्यास तलावाचे भाग्य उजळू शकते अन्यथा जिल्ह्यातील तलाव फक्त नकाशावरच राहतील यात शंका नाही.१५६ तलावांचे खोलीकरणलघुपाटबंधारे उपविभाग साकोली अंतर्गत साकोली तालुक्यात २४८, लाखांदूर तालुका १९० व लाखनी तालुक्यात १२७ मामा तलावांची संख्या आहे. यापैकी यावर्षी गाळ काढून तलाव खोलीकरण करण्यात तलावांची संख्या १५६ एवढी असून यात साकोली तालुक्यात ५८ लाखनी तालुक्यातील ५२ व लाखांदूर तालुक्यात ४६ तलावांचा समावेश आहे. उपविभागात एकूण ५६५ तलावापैकी फक्त १५६ तलावांचे खोलीकरण करण्यात आले. उर्वरित तलावाचे काम कधी होणार याचा नेम नाही.शासनाच्या योजनेनुसार तलावाची गाळ काढणे, खोलीकरण करणे हा उपक्रम सुरू आहे. सध्या पावसाळा असल्यामुळे काम बंद असले तरी पुढच्यावर्षी पुन्हा नव्याने काम सुरू होतील.-एस.एन. चाचेरे, प्रभारी उपविभागीय अभियंता.