शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
8
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
9
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
10
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
11
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
12
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
13
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
14
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
15
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
16
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
17
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
18
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
19
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
20
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी

जिल्ह्यातील मालगुजारी तलाव निरूपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 23:46 IST

पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस येत असला तरी जिल्ह्यातील माजी मालगुजार तलावात पाणी साठविण्याची योजना नाही. ऐकेकाळी हजारो एकर शेतीला सिंचनाची सोय करून देणारे मालगुजारी तलाव शासन व संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे निरूपयोगी ठरत आहेत. दरवर्षी तलावातील गाळ काढण्यासाठी योजना आखण्यात येते. काही तलावात ही योजना यशस्वी होते तर काही तलाव भ्रष्टाचारामुळे पोखरत आहे.

ठळक मुद्देगाळ साचल्यामुळे साठवणूक कमी : तलावाच्या दुरूस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस येत असला तरी जिल्ह्यातील माजी मालगुजार तलावात पाणी साठविण्याची योजना नाही. ऐकेकाळी हजारो एकर शेतीला सिंचनाची सोय करून देणारे मालगुजारी तलाव शासन व संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे निरूपयोगी ठरत आहेत. दरवर्षी तलावातील गाळ काढण्यासाठी योजना आखण्यात येते. काही तलावात ही योजना यशस्वी होते तर काही तलाव भ्रष्टाचारामुळे पोखरत आहे.जिल्ह्यात शंभर वर्षापुर्वी जलसंघटनाची मोठी योजना होती. त्या काळातील मालगुजारांनी लोकसहभागातून मालगुजारी तलावांची निर्मिती केली. तालुक्यात अशा मालगुजारी तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र या मालगुजारी शिवनीबांध, कुंभली, गुढरी येथील लघुप्रकल्पाशिवाय जुन्या तलावाची संख्या मोठी आहे. एकोडी, चांदोरी, आमगाव, वलमाझरी, पिंडकेपार, पाथरी, सावरगाव, खंडाळा, उमरी, लवारी, सितेपार, सानगडी, केसलवाडा या गावामध्ये माजी मालगुजारी तलाव आहेत. जिल्ह्यात लघुपाटबंधारे विभागा अंतर्गत असलेल्या अध्यक्ष, लघु व जुन्या मामा तलावांची संख्या ६४ टक्के आहे. मध्यम प्रकल्पात चार तर लघुकालव्याची संख्या ३२ आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील लधु दोन हजार २६७ मामा तलावापैकी १६०२ मामा तलाव भंडारा जिल्ह्यात आहेत. पूर्वी अशा तलावाची मालकी परिसरातील मालगुजाराकडे होती. मात्र १९५० च्या संपत्ती हक्क कायद्यानुसार हे मामा तलाव शासनाकडे गेले आहेत.त्यामुळे तलावांचा सामान्य जनता व शेतकऱ्यांशी संबंध तुटला. महाराष्ट्र राज्य घोषित झाल्यानंतर शासनाने १९६३ मध्ये देखभाल व पाणीवाटप व्यवस्थापक करण्यासाठी नेमलेल्या बर्वे आयोगाच्या शिफारशीनुसार दुरूस्ती व पाणी वाटपावर पाणीकर आकारायचे ठरविण्यात आले. याला त्यावेळी जनतेनी विरोध केला होता. मात्र शासनाने त्याची दखल घेतली नाही. तेव्हापासून या तालुक्याची दुरावस्था झाली आहे.जिल्हा परिषदेला लघु पाटबंधारे विभागाकडे आलेले मालगुजारी तलाव रोहयोच्या कामापुरते उरले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात भरलेला तलाव दोन महिन्यातच रिकामा होतो. शयाकडे सिंचनाबरोबरच जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. शासनाने तलाव ताब्यात घेतले मात्र देखभाल दुस्स्तीकडे दुर्लक्ष केले. शासनाने जर तलावाचे खोदकाम मातीकाम जिर्ण पर्यायी दुरूस्ती गाळ काढणे याकडे लक्ष देवून -- केल्यास तलावाचे भाग्य उजळू शकते अन्यथा जिल्ह्यातील तलाव फक्त नकाशावरच राहतील यात शंका नाही.१५६ तलावांचे खोलीकरणलघुपाटबंधारे उपविभाग साकोली अंतर्गत साकोली तालुक्यात २४८, लाखांदूर तालुका १९० व लाखनी तालुक्यात १२७ मामा तलावांची संख्या आहे. यापैकी यावर्षी गाळ काढून तलाव खोलीकरण करण्यात तलावांची संख्या १५६ एवढी असून यात साकोली तालुक्यात ५८ लाखनी तालुक्यातील ५२ व लाखांदूर तालुक्यात ४६ तलावांचा समावेश आहे. उपविभागात एकूण ५६५ तलावापैकी फक्त १५६ तलावांचे खोलीकरण करण्यात आले. उर्वरित तलावाचे काम कधी होणार याचा नेम नाही.शासनाच्या योजनेनुसार तलावाची गाळ काढणे, खोलीकरण करणे हा उपक्रम सुरू आहे. सध्या पावसाळा असल्यामुळे काम बंद असले तरी पुढच्यावर्षी पुन्हा नव्याने काम सुरू होतील.-एस.एन. चाचेरे, प्रभारी उपविभागीय अभियंता.